Skip to main content

आधुनिक कृष्ण

लेखक काळा_पहाड यांनी गुरुवार, 08/05/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
जन्माचे भोग भोगांसाठी जन्म आईच्या दुधातुन भोगांकडे स्त्रवणे मातेची ममता अन् बापाचा धाक पाळणाघरातल्या कृष्णाला यशोदेची हाक दिवसा यशोदा अन् रात्री देवकी वसुदेव की नंद सगळाच आनंद रंगतो रोजच कृष्ण-देवकी भेटीचा प्रयोग सुटीच्या दिवशी यशोदेला वियोग ना झोपेला अंगाई ना भुकेला लोणी जन्मला कृष्ण गातो नर्सरीची गाणी वाघीणीच्या दुधावर गोमुत्राची शिंपवणी कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी जग एक बाजार बाजारात कृष्ण 'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न यशोदेला सोडुन कृष्ण मथुरेला येई देवकीला विसरुन कंसाचा होई कंस आणि कृष
Taxonomy upgrade extras

ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का?

लेखक ऋचा यांनी गुरुवार, 08/05/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफीस मध्ये दुपारचे जेवण झाले की झोप न यायचे काही उपाय ... (बाहेर जायचा उपाय सांगू नका खुप ऊन असतं.. (खुप झोप अलेली मी) I)

धोतर (हे लिखाण काढून टाकण्यात आले आहे.)

लेखक कैलासराजा यांनी गुरुवार, 08/05/2008 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा.वर लेखन करण्यापूर्वी 'हे वाचा', अशी स्पष्ट सूचना देऊनही विषयाचा आगापीछा नसलेले आणि मि.पा.च्या रसिकांचा अपमान होईल असे वाह्यात लिखाण येथून काढून टाकण्यात आले आहे.

व्योमक्षेमं वहाम्यहम्

लेखक हेरंब यांनी गुरुवार, 08/05/2008 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
'मिपा' च्या वाचकांना 'प्रेमाची गोष्ट' वर लिहिलेले आवडले, म्हणून अजुन एक प्रायोगिक नाटक पाहिले होते, त्यावरचे लिखाण पाठवत आहे. आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे ,प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस! 'अमृता सुभाष' , ही एक अत्यंत हुशार अभिनेत्री!

प्रेमाची स॑ध्याकाळ

लेखक शितल यांनी गुरुवार, 08/05/2008 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राच्या उसळणार्‍या लाटा दगडावर येऊन आटपत होत्या आणि किनार्‍यावर बसुन दोघेही अस्ताला जाणार्‍या सुर्याकडे शुन्य नजरने पाहात होते, दोघा॑च्याही मनात प्रच॑ड विचारा॑चे थैमान, तीच्या डोळ्यातुन अश्रू ओघळुन सतत गालावर येत होते पण ते पुसावेसे ही तीला वाटत नव्हते, त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती, मुक हु॑दका आवरुण तीच्याकडे पाहणे ही त्याला अवघड जात होते,ह्या सुर्यास्ता बरोबर आपले असलेले प्रेमाचे, मैत्रीचे नाते ही अस्त पावणार आणि हातातुन वाळु निसटुन गेल्यावर हाताला थोडी वाळु चिटकुन रहावी अशा आता फक्त आठवणी दोघ्या॑च्याही मनात राहतील, त्याला पुर्वीचे दिवस आठवायला लागले, आणि चेहर्‍यावर एक म॑

(कधी)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 08/05/2008 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसे यांची कधी  ही कविता वाचून आम्हाला आम्ही कधी कधी काय काय कारतो ते आठवलं

"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी  कधी ?

रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा
टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी

हा निरागस चेहरा, हासता मनमोकळे

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत अमराठी योगदान

लेखक अजय यांनी बुधवार, 07/05/2008 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेंनी मराठीचा कैवार घेऊन शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणानंतर, अनेक मराठी प्रेमी शब्दांचे फुलोरे आणि भावनांचे अंगार ठिकठिकाणी लाह्यांसारखे फुलवताहेत. अमराठी माणसांना परप्रांतिय म्हणून वेगळी ओळख (?) दिली जात आहे. पण, मराठी भाषकांच्या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी परप्रांतीय (आजच्या भाषेत) म्हणवल्या जाणाऱ्यांनीही सक्रीय सहभाग घेतला होता. आपापल्या परिने बलिदानही दिले होते. याची माहिती सकाळ या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर वाचायला मिळाली..... आजच्या मराठी-परप्रांतिय वादाच्या पार्श्‍वभूमीवर त्यातील संदर्भ नक्कीच महत्त्वाचे आहेत.