महाराष्ट्राची जिवनरेखा........
महाराष्ट्राची जिवनरेखा........ नाही पणती नाही चिरा !!
कालच्या लोकसत्ता मधील या बातमीने लक्ष वेधुन घेतले. याचा घोषवारा असा होता की ३१ मे ला आपल्या एस्.टी ला ६० वर्षे पुर्ण होणार आहेत. मात्र म.रा.प.म. आणी राज्य शासन यांना याचे अजिबात सोयर सुतक नाही. वाईट वाटले ही बातमी वाचुन.
१ जुन १९४८ ला पुणे - अहमदनगर मार्गावर एस्.टी ची पहिली बस धावली. तेव्हापासुन आजपर्यंत आपल्या असंख्य बसेसद्वारे महाराष्ट्राच्या काना़कोपर्यात पोहचलेले एस्.टी चे जाळे अचंबीत करणारे आहे.
लहाणपणी एस्.टी शी माझे जिव्हाळ्याचे नाते होते.
मिसळपाव