Skip to main content

नाती

लेखक एककिनारा यांनी गुरुवार, 12/06/2008 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
कधितरी मनात उगच विचार येउन जातो,ख्ररच कोनी असत का कुनाच की नाती फक्त मानायला असतात?

**** इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता ****

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 12/06/2008 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस मी अविनाश धर्माधिकारींचे "अस्वस्थ दशकाची डायरी" नावाचे एक अतिशय जबरदस्त पुस्तक वाचत होतो. आज ते पुस्तक संपुर्णपणे वाचुन, समजून व पचवून पुर्ण झाले. साधरणता १९८० ते १९९० च्या दशकातल्या देशाच्या सुरक्षेला धोकादायक घटना, सामाजीक आंदोलने, राजकीय उलथापालथ व या सर्वात सामान्य माणसाचा सहभाग ह्या सर्व बाबींचा अभ्यास धर्माधिकारींनी आपल्या नजरेतुन व जवळपास स्वत: त्या घटना जवळून पाहून अतिशय समर्पक पद्धतीने केला आहे.

तुझ्या घरासमोरचा रस्ता...

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 11/06/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या घरासमोरचा रस्ता, अजून तसाच वळतो का गं? कोपर्‍यावरचा गुलमोहर, अजून तसाच जळतो का गं? तसाच आहे का गं अजून, नदीकाठचा काळा पत्थर? हात हातात घेता क्षणीच, सूर्य तसाच ढळतो का गं? डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? पार आणखी पिंपळ तिथला, अजून आहे तसाच तेथे? मनात येता उत्कट काही, तसाच तो सळसळतो का गं? वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? -अविनाश ओगले

मराठी कलाकारांनी दिल्ली दणाणून सोडली!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 11/06/2008 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधे मराठी कलाकारांनी आपली ठसठशीत मोहोर उमटवली. वाचा सविस्तर बातमी इ-सकाळला. मधुर भांडारकर, दिलिप प्रभावळकर, स्वानंद किरकिरे, अमोल पालेकर, नीना कुलकर्णी, आरती अंकलीकर, अशोक पत्की, अनिल पलांडे इ. प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!! चतुरंग

भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास

लेखक भोचक यांनी बुधवार, 11/06/2008 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता.

मक्‍याचा खरवस

लेखक योगिता_ताई यांनी बुधवार, 11/06/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - एक वाटी मक्‍याचे दाणे, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी बारीक केलेला गूळ, वेलचीपूड, केशर. कृती - मक्‍याचे दाणे व दूध एकत्र मिक्‍सरमधून वाटून घ्यावे. त्यात गूळ विरघळवून घ्यावा. वेलचीपूड व केशर घालावे. एरवी खरवसासाठी चीक उकडून घेतो त्याप्रमाणे शिटी न लावता कुकरमध्ये उकडून घ्यावे. गार झाल्यावर वड्या कापाव्यात. सध्या जवळजवळ वर्षभर स्वीटकॉर्न उपलब्ध असल्याने झटपट करता येण्याजोगा हा पदार्थ आहे. लहान मुलांनाही आवडेल.

उद्या संत तात्याबा पुण्यात!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 11/06/2008 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, उद्या आम्ही काही महत्वाच्या कामाकरता पुण्यात येत आहोत. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी आम्हाला थोडी सवड मिळेल. तेव्हा मिसळपाव डॉट कॉमचे तंत्रविभाग प्रमूख नीलकांत यांची भेट घेणार आहोत. त्याचप्रमाणे आमचे काही मित्र धमाल मुलगा, डॉ दाढे, आनंदयात्री, पेठकरशेठ, इनोबा यांचीही भेट घ्यायची आमची इच्छा आहे. अर्थात, सदर मंडळींना आपापले उद्योगधंदे आहेत याची आम्हाला कल्पना आहे त्यामुळे कुणावरही सक्ति नाही. 'पुरेपूर कोल्हापूर' या नावाचे एक हॉटेल पुण्यात आहे. संध्याकाळचे भोजन आम्ही त्या हॉटेलात घेऊ. वरील मंडळींनी आम्हाला तेथे जेवायची कंपनी दिली तर आम्हाला आनंद होईल...!

संडे स्पेशल (खव्याच्या पोळ्या)

लेखक स्वाती राजेश यांनी बुधवार, 11/06/2008 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
खव्याच्या पोळ्या साहित्यः १/२ किलो खवा २ वाट्या कणिक, कणिक भाजायला ३ टे.स्पून तूप २ मोठे चमचे खसखस ७-८ वेलदोड्याची पूड ४ वाट्या पिठीसाखर ४ वाट्या कणिक, १ चिमूट मीठ १ वाटी मैदा १ वाटी बारीक रवा १२ टे.स्पून तेल तांदुळाची पिठी १.प्रथम कढईत खवा गुलाबी रंगावर भाजावा. २.२ वाट्या कणिक तुपावर खमंग भाजावी. ३.खसखस भाजून कुटून घ्यावी. ४.वरील सर्व,पिठीसाखर,वेलदोडा पूड घालून चांगले मळावे. ५.कणिक, मैदा,बारीक रवा तेलाचे कडकडीत मोहन घालून भिजवणे,(फार घट्ट नको).

मनोगत

लेखक काळा_पहाड यांनी बुधवार, 11/06/2008 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
;) X( याहू ! याहू मिपावरचे माझे खाते पुन्हा उघडले. आनंद अत्यानंद आणि काय काय ते!!!! मिपाचा विरह! संपुर्ण महिन्यासाठी !!! जसा धरित्रीला वरूणराजाचा अमावस्येला चांदण्यांना चंद्राचा ग्रीष्मात वृक्षांना पानांचा आणि नद्यांना पाण्याचा. लिहायला मिळत नाही. लिहायचं मरू द्यात पण प्रतिक्रिया द्यायचही लायकी नाही. छ्या ह्या जगण्याला काय अर्थ ?????? फार सहन केले. आता पुन्हा नको ते दीनवाणेपण. सर्वांना सहर्ष नमस्कार.

पुपुर्झा

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 11/06/2008 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच ठाउक नाही ,मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ शकेलच अस नाही, हरकत नाही काही तरी अपेक्षा ठेउन का होइना देत जाव्,समोरच्या कडून अपेक्षा भंगही होइल, पण कदाचित तो पर्यंत देण्याची सवय लागलेली असेल.