Skip to main content

मलेशियातील माझे खाद्यजीवन

लेखक वैशाली हसमनीस यांनी रविवार, 10/08/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून रात्री निघालेले विमान कोलालंपूरला सकाळी सात वाजता उतरले आणि माझ्या भारतीय मनाला पहिली आठवण झाली ती शरीर आणि मन तरतरीत करणाऱ्या फर्मास चहाची! विमानतळावरील उपाहारगृहात बीओएच टी अशी पाटी दिसल्यावर प्रत्येकी ५रिंगेट (अंदाजे ६२रु, )खर्च करून मोठ्ठा ग्लासभर चहा घेतला. एकघोट घेतल्यावरच मळमळते की काय असे वाटू लागले. कितीही साखर घातली तरी पचकट चव जाईना! शेवटी तो चहा तसाच टाकला. पैसे गेल्याचे दुःख वेगळेच! त्यामुळे कनेक्टींग फ्लाईटमध्ये ग्वावा ज्यूस घेण्यास मन धजावेना. परिणाम दुपारी तीन वाजेपर्यंत उपाशी. ओळखपाळख होऊन विद्यापीठाच्या कॅंटिनमध्ये पाऊल टाकले ते मन प्रसन्न होऊनच.

गीता दत्त.. २० जुलै स्मरणदिन

लेखक संजय अभ्यंकर यांनी रविवार, 10/08/2008 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, २०जुलै ला गीता दत्तचा स्म्रण दिन आला आणी गेला. त्याची आपण फारशी दखल घेतली नाही. आवडती संकेतेस्थळे चाळताना एका स्थळावर तीच्या स्मरणदिना निमित्त, तीचि अनेक गाणी त्यांनी उपलब्ध केली आहेत. गीता दत्त चे एक अप्रतिम गीतः http://www.indianscreen.com/mp3/Geeta/HumBhiInsanHain_1959-GeetaDutt&Su… आणी त्यास्थळाची लिंकः http://www.indianscreen.com/Geeta.htm धन्यवाद!

योगायोग,योगायोग आणि योगायोग

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 10/08/2008 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
"अनपेक्षीत घटनांची गुंतावळ ही माझ्या आयुष्याची एक मोठी खूण झाली आहे.मला वाटतं,माझ्या आयुष्यात आलेल्या योगायोगानी मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवला,कधी धक्का पण दिला आणि तो पण अशातऱ्हेने की मी कदाचीत तो मार्ग पत्करला पण नसता,पण त्यामार्गाने मला जाण्याची जरुरी भासली म्हणून तसं करावं लागलं. ह्या योगायोगांशी झुंझ देताना मला त्यासाठी अनपेक्षीत ठिकाणी जावून राहण्याची पाळी आली." मुंबईहून मद्रासला जाताना ट्रेनमधे मला एक बाई भेटली ती सहज बोलता बोलता आपली कथा मला सांगू लागली. ती पुढे म्हणाली, " माझी मावशी मद्रासला राहते.तिची परिस्थिती पण यथातथाच होती.

तुला खात्री आहे?

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 09/08/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
भोवती बघ.. थोडं तु खाली बघ इथे दिसणारे चेहरे बघ... तुला खात्री आहे?तुला इथेच पोचायचं होतं? हे तुझ्या भोवतीचे मित्र... पण हे आहेत का "खरे" मित्र? ते करतील का तुझ्यावर माझ्याइतकं प्रेम? तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं? तु "हे" आयुष्य जगायच्या इतक्या घाईत आहेस त्यासाठी इतक्या वेदना दिल्यास.. दुखावलं आहेस भोवती बघ.. अगदी नीट बघ फक्त दोघे..तु आणि मी तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं? माझ्या अश्रुंमुळे मन वळवू नकोस, मी रडत नाहि... हे अश्रु हल्ली माझा भाग झाल्यासारखे वाटतात भोवती बघ.. अगदी नीट बघ सगळ्या भोवतालच्या सवयीच्या लोकांना बघ तुला खात्री आहे?

रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 09/08/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले बिछाने गारठलेले,श्वास भाजलेले बाहू स्फुरलेले,ओठ नरमलेले काही हरवून काही गवसण्याचे दिन आले पावसाच्या सरीमधे दोन जीव भिजलेले भिजलेल्या जीवानी दोन प्याले झोकलेले मदिरा पिऊन झिंगण्याचे दिन आले रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले दवांनी पडावे फुलांवर,फुलानी अमुच्यावर उमललेल्या फुलानी गंध उधळल्यावर गुलाबी गुलाबी स्वपनांचे दिन आले रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले श्रीकृष्ण सामंत

`नावा'त काय आहे?

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 09/08/2008 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
राजधानीतील महाराष्ट्र सदनातल्या दालनात नारायण राणे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. त्यांना आज त्यांचे हे नेहमीचे दालन मिळण्यास उशीर झाल्याने ते वैतागले होते. त्यातून तिथल्या कर्मचाऱ्यानं "साहेब, परवाच तर येऊन गेलात ना? मग आत्ता परत कसे? काम झालं नाही का?' असा उद्धट प्रश्‍न विचारल्यानं राणे आणखी अस्वस्थ झाले होते. गेल्या सहा महिन्यांसाठी आणि पुढच्या सहा महिन्यांसाठी हे दालन बुकच करून ठेवलं असतं, तर बरं झालं असतं, असा विचार त्यांच्या डोक्‍यात चमकून गेला.

महागाई कमी करण्या साठी आपण आता आपल्या परी ने काय काय करु शकतो?

लेखक नोहिद सागलीकर यांनी शनिवार, 09/08/2008 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रां नो प्रश्न सरळ आहे यात सरकार काय करु शकतं महागाई कमी करण्या साठी या पेक्षा आपण वयक्तिकरीत्या काय करु शकतो याच्या वीषयी थोडस लीहावं , उदा. एकवेळचे जेवण कमी करणे , अर्धे कपडे कमी वापरने, .............................. कींवा इतर काही वास्तव,............... उपाय..................

आयआयटीत मराठी ऐट!

लेखक एडिसन यांनी शनिवार, 09/08/2008 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
कालच आयआयटी मुंबईचा ४६वा पदवीदान समारंभ पार पडला. आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या मुख्य अतिथी होत्या. या समारंभात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आयआयटीतील मराठी विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण! आजच्या मटामध्ये आलेली ही बातमी पण हेच सांगून जाते.
विशेष म्हणजे २००८-०९ या शैक्षणिक वर्षात बी.टेक्.,एम्.टेक्.,ड्युअल डिग्री आणि पी.एच्.डी.

माफक ईच्छा...मिपाधर्म वाढवावा......

लेखक नि३ यांनी शनिवार, 09/08/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
(जो लेख गमत्या ने लिहला आहे त्याच विषयावर मि त्याच्या दोनेक दिवस आधी लिहायचा विचार केला होता पण काही कारणास्तव लिहणे जमले नाही.

इथले प्रत्येक क्षण.!

लेखक अंकुश चव्हाण यांनी शनिवार, 09/08/2008 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
इथले प्रत्येक क्षण मानवी संवेदनांना हादरा देणारे असतात... आणि तरीही सर्वजण नेहमी मरुन जगत असतात. इथले प्रत्येक क्षण... दंगली होतात, बॉम्बस्फोट होतात. भेसळयुक्त सिमेंटच्या इमारतीखाली आणि कधी पावसाच्या मा-याखाली माणसे शेकड्याने मरतात. इथले प्रत्येक क्षण... जखमी, मृतांच्या नावाने अनुदान जाहीर केली जातात. मदतीच्या नावाखाली मंत्री स्वत: चीच खळगी भरतात. इथले प्रत्येक क्षण... लोकही थोड हळहळतात सरकारच्या नावाने बोटे मोडतात. नंतर पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागतात. इथले प्रत्येक क्षण... स्वप्न ऊध्वस्त होताना बघतात. जीव मुठीत धरून जगतात. हे आता नित्याचच झाल आहे असेच सारे म्हणतात...