क्षितीज दुरुन फार छान दिसते,
म्हणुन त्याकडे नुसते पहायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..
सुर्य चंद्र जिथे रोज उगवतात,
तिथे आपणलाही एक दिवस पोहचायचे असते.
म्हणुन त्याला आपण गाठायचे असते..
जितके आपण पुढे पळू तितके तेही पळते,
पण आपण मुळीच कंटाळायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..
खुप लोक असेही असतात जे मागे ओढतात,
पण आपण क्षितीजाचेच ध्येय ठेवायचे असते.