Skip to main content

आजच्या शिक्षणसंस्था

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 29/06/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या शिक्षणसंस्थांचे खरे रुप सुज्ञ वाचकांसमोर यावे हा हेतू या काकू मागे आहे. (कोठे कर्मवीर आणि कोठे आजकालच्या शिक्षणसंस्था ) नुकतीच नाशिक येथील एका 'विद्यामंदिर' या संस्थेत शिक्षक-शिक्षकसेवक (प्राथमीक+शालेय्+महावीद्यालयीन)या पदांच्या काही जागा भरावयाच्या असल्याची जाहीरात वर्तमानपत्रात आढळली. या पदांसाठी त्यांनी नोकरी अर्ज विक्रीला ठेवले आहेत. ज्या कोणाला या पदांसाठी अर्ज करायचे असतील त्यांना या संस्थेचा 'छापील अर्ज' रु. १००/- मोजुन घ्यावा लागेल आणि तो सुद्धा रोख पैश्याच्या स्वरुपात नव्हे तर "पोस्टल ऑर्डर" देवुन मगच. आता या सगळ्या कारभारात काही प्रश्न उद्भवतात. १.

नांदी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 29/06/2009 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशी जलद जलद नाचू लागले आषाढसरी, मन माझे न्हाऊ लागले! दरवळ तो मातीचा मनास मोहवी वर्षेचे कंजन, बघ कानी गुंजू लागले! मग खेळणे वर्षेच्या धारांशी वार्‍याचे मनात आगळे, अलगुज छेडू लागले! संपले बघ वाट पाहणे ते चातकाचे आनंदविभोर, मोर वनी नाचू लागले! रोमांचित जाहली बघ तृषार्त धरा नग्ननिखळ, हास्य तिचे फुलू लागले! विशाल

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १६

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 29/06/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

झणझणीत सुकं मटण

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 29/06/2009 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
आता बरेच लोक म्हटले की या दिपाली ला फक्त गोड च पदार्थ येतात की काय? मला येतात सगळे प्रकार बनवता पण मी ऐकलं आहे की माझ्या पाकृ (उदा: खानदेशी शेव भाजी) कोणीतरी कुठल्यातरी पेपरात छापली होती तेही अगदी त्याच फोटो सोबत आणि तेही मला न विचारता..

माझी भटकंती - सोल्वँग - California's Little Denmark !

लेखक भाग्यश्री यांनी सोमवार, 29/06/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
कशुमा लेक नंतर आम्ही निघालो सोल्वॅंगला ! तसं अगदीच जवळ.. १४ माईल्स..
जाताना रस्त्यात सुंदर हिरवी-पोपटी कुरणं लागली.. आणि सोल्वॅंगच्या डॅनिश शब्दाचा अर्थ कळला! Sunny Fields !

मी माझ्या वयाच्या सातव्याच वर्षी प्रेमात पडलो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 29/06/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
"हातात हात घेऊन रस्त्याच्या कडेकडेने बिलगून जाणार्‍या त्या प्रेमी युगूलाला वाटणारं ते प्रेम नव्हतं." मी त्यादिवशी अरविंदाला म्हणालो, "तुझे मी खूप लेख वाचले.मला माहित आहे की लहानपणापासून तुला लेखनाचं वेड होतं.तुझ्या त्या वह्या मी उघडून वाचल्या होत्या.तुझ्या एकदोन कथेवर आपण चर्चा पण केली होती." मला अरविंद म्हणाला, "तू ज्याला वेड म्हणतोस त्याला मी प्रेम म्हणतो.वेड तेव्हड्यापुरतंच असतं पण प्रेम मात्र कायमचं असतं.आणि ते प्रेम जर बिनशर्त असेल तर मग प्रश्नच नाही.माझं लेखनावर तसंच बिनशर्त प्रेम आहे. मी जर म्हणालो की माझ्या सातव्या वर्षीच मी प्रेमात पडलो,तर कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.कुणी म

! पांडुरंग !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 29/06/2009 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली बघा पंढरीची वारी भेट उराउरी पांडुरंग ! आनंद सोहळा क्षण हा विरळा सौभाग्याचा मेळा पांडुरंग ! सगुण निर्गुण दोहोंचे मिलन मन वा "नमन" पांडुरंग काय माझे नाव काय माझे गाव मला फक्त ठाव पांडुरंग ! जाहलो निशब्द थांबले भजन नाद सनातन पांडुरंग ! चाललो चाललो आता नाही येणे श्वासांचे थांबणे पांडुरंग !

बकलावा

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 29/06/2009 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
बकलावा हे एक अफगाणी गोड पदार्थ आहे. मी एका अफगाणी हॉटेलात खाल्ला होता, तसा फार गोड असतो पण मला आवडला होता. साहीत्यः १ पाकिट फायलो डो (phylo Dough) , या अगदी पातळ मैद्याच्या पोळी सारखं असतं, घरी बनवायला खुप कठीण आहे त्यामुळे विकत च आणावे. फायलो डो चे पाकीट एक दिवस आधी फ्रीजर मधुन फ्रीज मध्य ठेवावे म्हणजे तुटणार नाही. १ कप कापलेले किंवा जाडसर कुटलेले आक्रोड + बदाम + पिस्ता चे मिश्रण २ टे. स्पू. + ३/४ कप साखर ३/४ कप पाणी १ तुकडा दालचिनी १/२ टी. स्पू.

भांडा सौख्यभरे!!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 29/06/2009 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट जरा नाजुक आहे. अडचणीची आहे. खासगीतली आहे. पण सांगणं मनोरंजक आहे. शेअरिंगनं दुःख हलकंच होणार आहे. मनावरचा ताण कमी होणार आहे. खटके कमी होण्याची संधी मिळणार आहे. घरात भांड्याला भांडं लागण्याचे प्रसंग काही नवे नाहीत. नव्याची नवलाई संपल्यानंतर, कधी संपायच्या आधीच, तर कधी सुरूही व्हायच्या आधी घरात या वाक्‌युद्धाला सुरवात होते. चूक कोण, बरोबर कोण, याला अर्थ नसतो. भांडण्याची खुमखुमी जिरवणं महत्त्वाचं असतं. आपल्या भांडण्याच्या मुद्द्याला काही विशेष अर्थ नाही हे कळत असतं, पण आयत्या वेळी माघार घेणं परवडणारं नसतं. मग कधीतरी टिपलेली निरीक्षणांची हुकमी अस्त्रं बाहेर काढली जातात.