Skip to main content

I WANNA GROW UP ONCE AGAIN

लेखक झुम्बर यांनी शुक्रवार, 04/06/2010 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
office मधलं तेच रटाळ वातारण त्या deadlines आणि कामाचे डोंगर ... बाहेर उन्ह भकाभका आग ओकताय असा एकंदरीत माहोल अतिशय कंटाळवाणा ..... प्रचंड चीडचीड होत होती.... पण खरच इलाज नव्हता असाच कसाबसा दिवस सरकत होता आणि अचानक दुपारी थंड गारवा हवेत पसरायला लागला AC चे सगळे नियम धाब्यावर बसवून मी खिडकी उगडली आणि आहाहाहा ............. एक थंड हवेचा झोत गालाचे लाड करून गेला ...

फुल्ल सपोर्ट!

लेखक गुंडोपंत यांनी शुक्रवार, 04/06/2010 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी मी विज्ञानवाद्यांना एक आक्रस्ताळे आव्हान दिले होते. त्यातून चांगल्या गोष्टी उजेडात आल्या. महत्त्वाचे म्हणजे शालेय मराठीसाठी खुप लोक काम करायला आनंदाने तयार आहेत. अनेकांनी मला व्यनिद्वारे कळवले.

चाँद तनहा है..

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 04/06/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
एके काळी मस्त लाईफ होती.. रोज संध्याका़ळी लायब्ररीत जाऊन नवीन पुस्तक आणायचं.. येईल तसा स्वयंपाक पक्षी: माझ्या नि फ्लॅटमेटच्या पोटावर प्रयोग करणारं काहीतरी बनवायचं.. ती आली की जेवायचं.. त्यानंतरच्या आवराआवरीचं आणि सास-बहू सिरियल पाहाण्याचं काम तिचं!! नि मी पळायचे माझ्या बेडरूममध्ये.. हातात पुस्तक.. नि सोबतीला.. विन ९४.६ वरचं खनक विथ रोशन अब्बास!!!! मस्त गाणी लागायची.. एक वाजेपर्यंत पुस्तक वाचून संपायचं आणि मी दुसर्‍या दिवशी नवीन पुस्तक आणायला सज्ज व्हायचे.. (रोज मला कुठलं पुस्तक द्यायचं म्हणून तिथले लोक बिचारे वैतागले होते). खनक आम्हा बर्‍याच जणांचा आवडता कार्यक्रम!!

२७ ऑगस्ट २०१०

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 04/06/2010 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
एका पुढे ढकललेल्या इ पत्रातून ही माहिती मिळाली आहे. २७ ऑगस्ट २०१० ला मंगळ हा पृथ्वीच्या अतीशय जवळ येणार आहे. त्यादिवशी पहाटे १२.३० वा ( म्हणजे बहुतेक २६ ऑगस्ट ला रात्री) चंद्र आणि मंगळ आकाशात खूप जवळ दिसतील.

जाता सातार्‍याला . . . . .

लेखक योगेश२४ यांनी शुक्रवार, 04/06/2010 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
मराठेशाहिच्या राजधानीच ठिकाण असलेले सातारा हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असुन किल्ले अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे तर आहेच पण भटकंतीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अशा या शहरापासुन फक्त काहि कि.मी.

त्रुटी

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 04/06/2010 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
"काय सर, खुप दिवसांनी भेटताय?" एकदम बिझी का? हो. "वयोमानाप्रमाणे जरा सबुरी घ्या की". बर. "मुलाचे ग्रॅज्युएशन पुर्ण झाले असेल ना?" हो. "कितीचा जॉब मिळाला?" अजुन मिळायचा आहे. "क्काय?" परिक्षा संपुन आताशी महीना तर झाला. "पण तो यु.डी.सी.टी.मधला ना?" हो. "कँपस मधे जॉब मिळाला नाही?".. जास्त कुणी आले नाहीत. "क्काय सांगताय? मला तर वाटले की कँपस मधे कमीत कमी पन्नास साठ चा जॉब मिळाला असेल." वर्षाला का महीन्याला? "काय चेष्टा करताय सर? युडीसीटीवाल्याला वर्षाला पन्नास?" शक्यता नाकारता येत नाही. "कठीण आहे. हीच तर आपल्या शिक्षण प्रणाली ची त्रुटी आहे.

विलोभनीय नायगरा!

लेखक मीली यांनी शुक्रवार, 04/06/2010 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा नायगरा ला जाण्याचा योग आला ,मेमोरिअल डे ची सुट्टी असल्याने लाँग वीकेंड मिळाला होता.खरे तर खूप लांब चा प्रवास होता पण नवरापण स्वखुशीने तयार होता ! शनिवारी खायचे ,प्यायचे घेवून डिकी भरून घेतली ,गाडी बरोबर आपल्याला पण पेट्रोल हवे ना!

सचिनचा अजून एक विक्रम...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 04/06/2010 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटमधला विक्रमादित्य सचिनने आज अजून एक वेगळा विक्रम केला आहे: वास्तवीक रेनवॉटर हार्वेस्टींग / पर्जन्य संचय हे आता नवीन बांधकामासाठी मुंबई महापालीकेने सक्तीचे केले आहे. पण, "शेजारी करतील मी कशाला करू?" अथवा "असले नियम सामान्यांसाठी असतात, व्हिव्हिआयपींना नसतात" असे गृहीत धरले जाते... मात्र नुकताच बांद्र्याला नवीन बंगला घेत असताना तेंडूलकर दांपत्याने पर्जन्य संचय करण्यासाठी टाकी बांधून अतिरीक्त वापरासाठी १० लाख लीटर्स पाणी पावसातून गोळा करायचे ठरवले आहे. अर्थात त्यामुळे एकट्या सचिनच्या कुटूंबाकडून मुंबईचे १० लाख लिटर्सचे पाणी वाचणार आहे!