गेल्या महिन्यात छोट्याश्या सुट्टीत घरी जाउन आलो. नेहमी जायच्या आधी माझं आणि बहीणचही आठवडाभर प्लॅनिंग असत की आईच्या हातच काय काय खाउन घ्यायच. शक्यतो इथे परदेशात न मिळणारे मासे आणि भाज्या. (शक्यतो मासेच. कोंबडी / मटण टाळतो , ते काय इथेही खातोच नेहमी)
वर्षभर वजन कमी करण्याचे प्रयत्न करणारे आम्ही दर सुट्टीत हटकुन १-२ किलो वजन वाढवुन येतो.
यावेळी काही दिवस गावालाही जायला मिळाल. तिकडे बोंबील, निवट्या, घोळीच/दाढ्याचं खार(काटा), काटेरी, पापलेटं मनसोक्त खाल्ले.
दोन दिवस सासुरवाडीला ही भेट देउन आलो.