"आजच्या पिढीला वाचण्याची सवयच नाही" हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. पण त्यांना वाचायला आवडतील अशी पुस्तके वाचकांपर्यंत पोहचवणारी प्रभावी यंत्रणाच आज आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यातच वाचनालयांची स्थितीही म्हणावी तशी समाधानकारक नाही. आपल्याला हव्या त्या पुस्तकांसाठी दिवसेंदिवस वाट बघावी लागते. चोवीस तास ऑनलाईन असणारे, पुस्तकांवरही तितकेच प्रेम करतात, पण आपल्याला पाहिजे असलेल्या पुस्तकासाठी असे दिवसेंदिवस वाट पहाणे त्याना पटत नाही. वाचायची इच्छा असुनही या तरुण वाचकांपर्यंत पुस्तक पोहचतच नाही. पुस्तकं त्यांच्या टप्यात आली तर वाचन संस्कृती अजुन वाढेल.