आज रविवार!!!
म.टा. वाचायला घेतला, त्यामध्ये भारतकुमार राऊत यांचा लेख वाचनात आला.....
हे कसले औदार्य?
उत्तर भारतात जसे पावसाचे तांडव सुरू झाल्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे, त्याहून अधिक भयानक परिस्थिती पाकिस्तानात आहे. ज्या बातम्या हातात येत आहेत, त्यावरून दिसते की, दोन तृतियांश पाकिस्तानला पुराने वेढले आहे. कदाचित, एव्हाना परिस्थिती काबूत आली असेल, पण पुरानंतरची रोगराई, निर्वासितांचे प्रश्न आणि उद्योगांचे पुनर्वसन या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात पाकिस्तानी सरकारला अनेक महिने झंुजावे लागेल.