लेखकमुलूखावेगळीयांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!!!!
हा धागा एवढ्यासाठी आहे कि आपण आज इथे आपल्याला आदरणीय आणि स्फुर्तीदायक वाटणार्या महिलांची नावे इथे शेअर करुया आणि त्या तुम्हाला आदरणीय आणि स्फुर्तीदायक का वाटतात त्याची कारणं पण.
माझ्या आयुष्यातील-
१. माझी आई - माझी खुप्प्प प्रिय ,माझ्या आयुष्यातील पहिले मानाचे स्थान असलेली . हिने मला खुप काही शिकवलंय.अडचणींवर मात करुन गोष्टी पुर्णत्वाला नेणे,सगळ्यांना वेळ देउन स्वतःसाठी ही वेळ काढणे.
२. झाशीची राणी- शौर्याचे प्रतिक आहे म्हणुन
३.जिजामाता- आदर्श माता म्हणुन.
तुम्ही पण सांगा .
लेखकअमोल केळकरयांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र शासनाचा ' महाराष्ट्र भूषण ' हा पुरस्कार जाहीर झाला आहे
त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन
खगोलशास्त्रातील संशोधनात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
अमोल केळकर
----------------------
मला इथे भेटा
लेखकअवलियायांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व मिपाकर महिला, तरुणी, बालिका आणि आज्ज्या, पणज्ज्या, खापरपणज्ज्या यांना शुभेच्छा !!!
लवकरात लवकर लिंगभेदानुसार होणारा अन्याय दूर व्हावा आणि मानवजात अधिक प्रगल्भ व्हावी ही मनोकामना !!
सर्वांचे कल्याण होवो !!
लेखकनेत्रेशयांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ईंटरनेटवर नवे-जुने चित्रपट पहाण्यासाठी बर्याच वेबसाईटस उपलब्द्ध अहेत. पण बहुतेक वेबसाईटवर पायरेटेड चित्रपट, वाईट क्वालिटी, व्हायरस आणी मालवेअर्स असे बरेच प्रोब्लेम असतात.
पण राजश्री, सोनी सारख्या काही मोठ्या चित्रपट निर्मीती करणार्या संस्थांच्या उत्तम वेबसाईटसही आहेत. मला माहीत असलेल्या काही चांगल्या आणी लिगल वेबसाईटस ईथे देत आहे. बर्याचजणांना यातील बहुतेक वेब्साईटस माहीत असतील.
लेखकनिनावयांनी मंगळवार, 08/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
वाट तुझी पाहात आज असा काय बसलो मी
बोलविले त्याने मज अन जाणेच विसरलो मी
तु जाताच अंधार अन दिवा शोधत बसलो मी
शोधता-शोधता मग असा उजेड विसरलो मी
तुलाच विसरण्यास आज पिण्यास बसलो मी
प्यायलो असा आज अन दर्याच विसरलो मी
तुझ्या आठवणीं संगे आज बोलत बसलो मी
तु येताच समोर मग बोलायचेच विसरलो मी
आज होतो न सोबत असा एकटाच बसलो मी
सवय जडली अशी मग सोबतच विसरलो मी
लेखकविजुभाऊयांनी सोमवार, 07/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पुनश्च हनीमून
कथा कादंबरी लेखनाची प्रक्रीया नक्की काय असते याबद्दल बरीच मते आहेत. काहींच्या मते लेखन हे माणसाच्या भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील स्वप्ने यांचे बेमालून मिश्रण असते. त्यात वर्तमानदेखील मिसळलेला असतो. लेखक त्याच्या भूतकाळ भवीष्यकाळ आणि वर्तमानकाळापासून वेगळा अलीप्त राहू शकत नाही.
लेखक लिहीताना त्याचे लिखाण जगत असतो.
या लिखाणाच्या प्रवाहाला खीळ बसते ती ;तो त्याच्या लिखाण जगण्यापासून अलीप्त झाल्यावर.
आपण याला रायटर्स ब्लॉक म्हणतो.
रायटर्स ब्लॉक बद्दल यापूर्वी माध्यमातून बरीच चर्चा झालेली आहे.
लेखकविश्वेशयांनी सोमवार, 07/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सांग सखे कसा आवरू मी बुडण्याचा मोह
खुणावत आहेत मजला तुझ्या नयनीचे डोह
नको लवून पहाटे अशी वेचू ... सखे... फुले
मन उगाच बांधती मग... तुझ्या झाडी ... माझे झुले
केली सगळी तयारी मनी एकच हा ध्यास
कधी करायचा सांग... सात पावलांचा प्रवास
सांग कधी पडतील हव्याहव्याश्या त्या गाठी ...
अन माझ्या नावाभोवती तुझ्या नावाची ग मिठी
आता नको नाही म्हणू, आता नको मागे फिरू, आलो तुला मी शरण
माझ्याशिवाय तुझ्या जगण्यात, आपसूक माझे मरण ... माझे मरण