Skip to main content

युवीच्या अर्धशतकापुढे रिकीचे शतक हरले....

लेखक प्रशांत यांनी गुरुवार, 24/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
युवीच्या अर्धशतकापुढे रिकीचे शतक हरले.... आणि गतस्पर्धेतल्या पराभवाचा पुरेपुरे 'बदला' घेवुन भारतीय संघ सेमिफायनल मधे पोहचला... दे घुमाके...

वॅलेंटाईन वॅलेंटाईन

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 24/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
"संत वॅलेंटाईन, काय माणूस होता सांगू ! एकदम झक्कास. प्रेमास अमर करून गेला बेटा! त्याची समाधी कुठे आहे सांगाल का? ऑर्किडची फुलं सजवायची होती त्यावर मला.", आता हे मी लिहित नाहीये किंवा लिहितच असेन तर माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल हे सुज्ञास सांगणे नलगे. "वॅलेंटाईनविषयी लिही ना", असं विनंतीवज फर्मान माझ्या गुलबक्षीने (गर्लफ्रेण्ड हो!) गेल्या आठवड्यात काढल्यावर मी माझं मराठी टायपिंगचं सॉफ्टवेयर कॉम्प्युटरमधून काढून टाकलं होतं.

अंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 24/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
‘मराठी ऐतिहासिक कादंबरी’ असं म्हटलं की काही ठराविक नावं समोर येतात. त्यांचा एक साचादेखील जवळपास ठरलेला असतो. एखादी ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती किंवा घटना घ्यायची आणि अलंकृत (किंवा अगदी शब्दबंबाळ!) भाषेची खैरात करून त्या व्यक्ती/घटनेभोवती एक महिरप तयार करायची. मराठी मनाला पूज्य आणि अभिमानास्पद वाटतील अशा, म्हणजे मराठ्यांचं शौर्य वगैरे उदात्त गोष्टींची त्या कादंबरीत भलामण करायची. असं केलं म्हणजे मराठी लोक तिच्याविषयी भरभरून बोलतात.

ससा आणि कासव -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 24/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा शुभ्र कापूस जसा इवला पिटुकला होता ससा लाजरा बुजरा भित्रा जरा अवखळ चपळ होता ससा एकदा मळ्यातून फिरता फिरता गेला तो तळ्याकाठी तडक इवल्या पिटुकल्या सशाला दिसला मोठा एक खडक खुदकन ससा मनात हसला ऐटीत खडकावरती बसला थोड्या वेळाने झाली गम्मत सशाला वाटली जम्माडी जम्मत खडक लागला हलायला ससोबा लागले डुलायला अचानक घडले तरी काय सशाचे थरथरले की पाय सशाला वाटले झाला भूकंप त्याच्या अंगाला सुटला कंप पाहिले त्याने पायाखाली जीव झाला वर खाली नव्हता पायाखाली खडक होती कासवाची पाठ टणक कासवाने हलवली हळूच मुंडी ससोबाची उडाली घाबरगुंडी धूम ठोकली सशाने मळ्यात कासव निघाले निवांत तळ्यात
काव्यरस

बातमी अर्थसंकल्पाची

लेखक मराठी_माणूस यांनी गुरुवार, 24/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काल महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. आजच्या ईकॉनॉमिक टाईम्सच्या मुंबई आवृत्तीत , पहील्या पानावर ह्या बातमीचा कुठेही , अगदी दोन ओळींचा देखील उल्लेख नाही. केंद्रिय अर्थसंकल्पाच्या बातम्या भरभरुन छापणार्‍या ह्या वृत्तपत्राला , महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प ही पहील्यापानावर न छापण्याइतकी बिनमहत्वाची घटना वाटावी ? तेही महाराष्ट्राच्या राजधानीच्या अवृत्तीत ? हा नक्कीच खोडसाळपणा वाटतो , आर्थिक घडामोडिना वाहीलेल्या वृत्तपत्राने ह्या मोठ्या घडामोडिला महत्व न देण्याचे (पहील्या पानावर न छापता इतरत्र छापुन) दुसरे कारण काय