Skip to main content

कोळंबी भात

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 20/06/2011 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः दीड वाटी बासमती तांदुळ स्वच्छ धुवून, निथळून ठेवणे दीड वाटी स्वच्छ केलेली कोळंबी (किंचित मीठ, हळद व लिंबाचा रस लावून ठेवावी) ३ वाटया नारळाचे दुध २-३ टेस्पून आले+लसुण+मिरची+पुदीना पेस्ट १ टेस्पून लाल तिखट १/२ टेस्पून गरम मसाला १/२ टेस्पून धणेपुड १/४ टीस्पून हळद मीठ चवीनुसार १ टीस्पून शाहीजिरे किंवा साधे जिरे ४-५ लवंग २-३ दालचिनीच्या काडया २-३ तमालपत्र २-३ हिरवी वेलची तेल .

पाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न?

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 20/06/2011 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न? राजकीय वनवासात आणि स्वत:हून पत्करलेल्या (?) हद्दपारीत तीनपेक्षा जास्त वर्षे काढल्यावर मुशर्रफना पुन्हा राजकारणात पडून पाकिस्तानचे अध्यक्ष व्हायची स्वप्ने पडू लागली आहेत असे दिसते. सत्तेची नशाच तशी असते!

[कथा एका यशोगाथेची]

लेखक चिरोटा यांनी सोमवार, 20/06/2011 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
स्फूर्ती-http://www.misalpav.com/node/18334 (जयनीत ह्यांची माफी मागून) त्याला नेहमी पासूनच खूप खूप मोठं होण्याची इच्छा होती, पहिले त्यानी छोट्या कंपनीत धडपड करून बघितली, पण जमलं नाही. मग विप्रो,ईन्फी मध्ये खटपट करून बघितली, पण त्याच्या programs ना कोणी programs म्हणेना, आणि design ला ही दाद मिळेना. स्वतः शिवाय कधी दुसरा विचारच केला नसल्या मुळे testing पण करता येईना. मग प्रोजेक्ट मॅनेजमेन्टमध्ये हातपाय चालवून बघितले. CMMi,PMP वगैरे भानगडी त्याला कधी पटल्याच नाहीत, त्याला स्वतःलाच CEO व्हायचे होते.

मुगाच्या डाळीचे कण्ण्.(खिर)

लेखक ज्योति प्रकाश यांनी सोमवार, 20/06/2011 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-अर्धी वाटी मुगाची डाळ. एक नारळ. खोबर्याचे काप पाव वाटी. काजूचे तुकडे पाव वाटी. वेलची पूड चवीप्रमाणे गूळ. चिमूटभर मिठ. कृती :-मुगाची डाळ भाजून घ्यावी.एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात डाळ शिजत घालावी. नारळ खवून त्याचा रस काढावा.डाळ मऊ स्जिजली कि त्यात गूळ्,खोबर्याचे काप,काजुचे तुकडे, नारळाचा रस घालावा व मंद गॅसवर शिजू द्यावे.जरा जाडसर झाले की वेलचीपूड घ

उपवासाचा बटाटावडा.

लेखक ज्योति प्रकाश यांनी सोमवार, 20/06/2011 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-एक वाटी शिंगाड्याचे पिठ. एक वाटी साबुदाण्याचे पिठ. तिन ते चार उकडलेले बटाटे. दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट. आलं व हिरवी मिरची पेस्ट्(आपल्या तब्येतीप्रमाणे) अर्धा चमचा लिंबाचा रस. मिठ व साखर चवीप्रमाणे. तेल्,जिरे फोडणीसाठी. कोथिंबीर. कृती :-प्रथम बटाटे कुस्करून घ्यावे.त्यात मिठ व साखर घालावे.एका कढईत तेल घालावे.तेल तापले कि त्यात जिरे फ

मेक्सिकन पुडींग

लेखक गुलतोरा यांनी सोमवार, 20/06/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : सिज़नल फळांचे तुकडे 2 वाट्या , ब्रेड स्लाइस - 4, ग्लुकोज़ आणि मारी बिस्किटांचे तुकडे 2 वाट्या, तयार केलेले कस्टर्ड, साखर घालुन घोटुन घेतलेली साय. कृती - एका ताटलीत ब्रेड च्या स्लाइस ठेवा. त्यावर कस्टर्ड घाला. त्यावर बिस्किटांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड घालावे.त्यावर फळांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड. असे च उरलेल्या फळांच्या व बिस्किटांच्या तुकड्यांचे थर करावेत.

कथा एका यशोगाथेची - लघुकथा - जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी सोमवार, 20/06/2011 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला नेहमी पासूनच खूप खूप मोठं होण्याची इच्छा होती, पहिले त्यानी धंद्यात धडपड करून बघितली, पण जमलं नाही. मग काव्य, साहित्यात खटपट करून बघितली, पण त्याच्या मुक्तछंदाना कोणी काव्य म्हणेना, आणि यमकाला ही दाद मिळेना. स्वतः शिवाय कधी दुसरा विचारच केला नसल्या मुळे कथेचा ही विषय सुचेना. मग राजकारणात हातपाय चालवून बघितले आंदोलन, धरणे, उपोषण वगैरे भानगडी त्याला कधी पटल्याच नाहीत, त्याला स्वतःलाच प्रस्थापित व्हायचे होते. प्रस्थापितांशी लढण्यात त्याला आपली शक्ती घालवायची नव्हती. क्रांती झालीच तर ती त्याच्या जीवनात व्हायला हवी होती, उगाच लष्कराच्या भाक-या भाजण्याचा त्याच पिंड नव्हता.

निसर्गरम्य ताम्हीणी

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 20/06/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गरम्य ताम्हीणी
रविवारी ताम्हीणीला जायचे नक्की झाले आणि पावसाळ्यातल्या पहिल्या वहिल्या भटकंती साठी आम्ही सकाळी ७.०० ला पुणं सोडलं. आयत्या वेळेस कोणीतरी गळणं !!! या नेहमीच्या रुढीला छेद न देता सतिश, प्रिया आणि प्रशांतने टांग मारली होती.

निसर्गरम्य ताम्हीणी

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 20/06/2011 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गरम्य ताम्हीणी
रविवारी ताम्हीणीला जायचे नक्की झाले आणि पावसाळ्यातल्या पहिल्या वहिल्या भटकंती साठी आम्ही सकाळी ७.०० ला पुणं सोडलं. आयत्या वेळेस कोणीतरी गळणं !!! या नेहमीच्या रुढीला छेद न देता सतिश, प्रिया आणि प्रशांतने टांग मारली होती.

सांग सखे ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 20/06/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
झालीस मोगरा तू अशी वासंतिक वयात बहरताना झालो सुवास मी हि तुझिया आसपास फिरताना .... सरला काळोख आयुश्यि तुझा सूर्य उगवताना उमलले अंगांग माझे सखे, तुझे सुर्यफुल होताना ... मन भाळले इतके सहज लडिवाळ तुझ्या शब्दांना मोहरलो सावलीत तुझ्या अस्तित्व माझे संपताना .... धरलास हात माझा अन विसरलो वाट चालताना खंतले न मन तुझे जराही तो असा अचानक सोडताना .... टाळले होतेस सगळे सहज जर मला एकटे सोडताना का पाहिले होतेस मग वळून? सासुराला जाताना .... सांग सखे ... आज कुणा परक्याचे ते सप्तपदीचे व्रत पाळताना आठवतो का मी? माझी कवितेची वही चाळताना .... - विश्वेश