Skip to main content

१ जानेवारी... चलो पेरणेफाटा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 31/12/2011 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऐतिहासिक पेरणेफाटा... पेरणे गावापासून दोन किमीदूरवर नव्याने हायवेला झालेली नागरवस्ती म्हणजे पेरणेफाटा होय. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याची हद्द इथे समाप्त होते. भीमा नदीवरील पूल ओलांडला की शिरूर तालुका लागतो. नव्याने वसलेल्या गावास इतिहास असू शकतो का? पण होय. पेरणेफाट्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/12/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यरस

तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

लेखक santosh waghmare यांनी शुक्रवार, 30/12/2011 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिशाहीन वाहणाऱ्या वाऱ्याला तू जरा आवर रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. झालेल्या व्यथा ते उगाचच आठवत, गतकालातून दुख जणू ते पोखरून काढत, सुखलेल्या जाख्मानाही मग फुटे वेदनेच पाझर रे , तोल हा मनाचा तू जरा सावर रे. बाह्य आकर्षणाला ते सतत भुलत, शोभेच्या फुलालाही नाकाशी धरू लागत, पण मृगजळात तहान नाही भागत रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. प्रेत्येक कर्माच फळ त्याला पटकन हव असत, पिउनी हळद त्याला लगेच गोर व्हायचं असत, पण पिकण्या अगोदर आंबा कसा लागणार गोड रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. समोरच्याकडून ते अधिक अपेक्षा करत, जणू लहानश्या झोळीत ते गावभर बाजार भारत, मग छिद्र पडुनी झोळीस सारा बाजार निघुनी ज

बसचा प्रवचा, वैद्य सी.के. राजगुरू, मूळव्याध, वाक्यरचना वगैरे वगैरे..! :)

लेखक कॉमन मॅन यांनी शुक्रवार, 30/12/2011 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच शहरी बसने प्रवास करत होतो. बसच्या आतल्या बाजूने ज्या जाहिराती लावलेल्या असतात त्यापैकी एका जाहिरातीकडे आमचं लक्ष गेंलं. जाहिरातीतलं एक शीर्षकवजा वाक्य होतं - 'निष्णात वैद्य राजगुरू यांच्या मूळव्याधीसारख्या आजारावर उपाय उपलब्ध..' हे वाक्य वाचल्यावर आमचा थोडा घोटाळाच झाला. वाक्यरचना थोडी चुकीची वाटली. कारण ते वाक्य आम्ही असं वाचलं - 'निष्णात वैद्य सी. के. राजगुरू यांच्या मूळव्याधीसारख्या आजारावर उपाय..' म्हणजे खुद्द वैद्यबुवांनाच मूळव्याध झाली आहे आणि या जाहिरात्रीद्वारे कुणी आम्हाला त्यांच्या मूळव्यधीवर उपाय करण्याचे आवाहन करत आहे किंवा कसे?

कोंबडी म्हणाली कोंबड्याला

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 30/12/2011 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
'पहाटे ओरड पाहिजे तेवढे-' कोंबडी म्हणाली कोंबड्याला, 'ऐकावी लागणार दिवसभर नंतर पक् पक् माझी तुला !' मांजर निघाले घाईघाईत शिकार उंदराची करायला - आडवा आला माणूस नेमका परतावे लागले मांजराला ! मुंगळयाने पाहिली गुळाची ढेप निघाला तुरुतुरु खायला - मधेच एक माशी शिंकली माणसाच्या पायाखाली आला ! एक खेकडा सकाळी उठला पूर्वेकडून पश्चिमेला निघाला - संध्याकाळ होईपर्यंत उत्तरेला नेमका पोहोचला !

आता मतदार जागृती अभियान. अण्णा, देअर यू आर..!

लेखक कॉमन मॅन यांनी शुक्रवार, 30/12/2011 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसातल्या घटना - १) दर दोन महिन्यांनी मोठमोठ्या गर्जना करून टीम अण्णांनी भारतीय घटनेला आणि आपल्या सार्वभौम अशा संसदेला सो कॉल्ड जन-आंदोलनांच्या धारेवर धरणे, २) टीम अण्णांकडून (आणि काही वेळेला खुद्द अण्णांकडूनही) झालेल्या बेताल वक्तव्यांमुळे, ३) जनलोकपालबाबत 'माय वे ऑर हाय वे..' अशा हुकुमशाही अडेलतट्टू आणि इगोइस्टिक भूमिकेमुळे, ४) सर्वच पक्षात भ्रष्टाचार बोकाळला असताना केवळ काँग्रेस पक्षाबाबतच 'अँटी करप्शन ऐवजी अँटी काँग्रेस' असा छुपा अजेंडा घेऊन आगपाखड केल्यामुळे, (आजतागायत लोकपालसंदर्भात भाजपने केवळ 'कुंपणावरची' अशी अत्यंत सोयिस्कर भूमिका घेतल्याचे आमचे मत आहे.

सोनेरी (पिकली) पाने २०११

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 30/12/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
पिकल्या पानांनी गळून पडणे हा निसर्गाचा नियम आहे. यातली काही पाने सोनेरीच नव्हे तर ती बावनकशी सोन्याचीच असतात असे म्हणता येईल. अशा अनमोल पानांचा २०११ मध्ये नुसता खच पडला. निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी सर्वोच्च स्थान संपादन केले किंवा सर्वोच्च पातळी गाठली अशा इतक्या व्यक्ती एका वर्षात जगाला सोडून गेल्याचे यापूर्वी कधी झाले नसेल. पूर्वी पंचावन्न वर्षे पूर्ण होताच सरकारी नोकरीमधून सेवानिवृत्त केले जात असे. त्याची मुदत आता वाढवून ५८ ते ६० वर्षांपर्यंत झाली आहे. पूर्वी सत्तरीला पोचेपर्यंत बहुतेक लोकांची क्रियाशक्ती क्षीण झालेली असे.