Skip to main content

विश्वास

लेखक मराठे यांनी बुधवार, 11/07/2012 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
सुमेधा रंगपटात आली तरी प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. आज तिच्या नाटकाचा पन्नासावा प्रयोगही हाऊसफुल होता. "एक्सिलंट ! माइंड ब्लोइंग परफॉर्मंस !!' टाळ्या वाजवतच रमेश आत आला. थकल्या चेहर्‍यावरचा मेकप पुसता पुसता आरशातूनच तिनं रमेशकडे पाहिलं. रमेशचा फ्रेश हसरा चेहरा पाहून तिचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जात असे. रमेशचा स्वभावही असाच होता. त्याच्या सहवासात आल्यावर क्षणभरातच तो कोणालाही आपलंस करून घेत असे. रमेश म्हणजे सुमेधाचा जुना मित्र. अगदी कॉलेजमधे असल्यापासून. कॉलेजमेधे त्यांचा मोठा ग्रूप होता. रमेश त्या ग्रूपचा प्राण.

स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच का?

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 10/07/2012 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच? खरं तर उशीर झालाय पण आम्ही बेंचावर असल्याने रात्र आणि दिवस सारखेच आम्हाला. :) असो या प्रतिसादावरुन इथे मुद्दाम चर्चा घडवत आहे. अर्थात इथे शतकी धाग्याची अपेक्षा न ठेवता फक्त चर्चा अपेक्षित आहे एवढेच. मी तज्ञ नाही, महाविचारी नाही, पण एक सामान्य माणूस आहे. स्त्री ही दुर्लक्षित आहे, पुरुषांच्या अत्याचाराने पिडीत आहे हे कितपत सत्य आहे? आणि आजच्या जगात? प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना जातीप्रमाणे आरक्षण देणे पटत असले तरी स्त्रिया याचा जातीयवादाप्रमणे दुरुपयोग करत नसाव्यात का?

विक्रमादित्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 10/07/2012 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या क्रिकट पंढरीत जन्मलेलं ५ फूट ४ इंच उंचीचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व. मुंबईचं 'खडूस' क्रिकेट नसानसांत भिनलेला - गार्नर, होल्डिंग, रॉबर्ट्स, मार्शल, लिली सारख्या भयावह बोलर्सच्या नजरेला नजर भिडवून बचावाची अभेद्य तटबंदी उभी करणारा लढवय्या. १९७१ च्या स्वप्नवत सुरुवातीनंतर विल्यम हॅरिस ह्या त्रिनिदादियन गायकाला: It was Gavaskar We real master Just like a wall We couldn't out Gavaskar at all, not at all You know the West Indies couldn't out Gavaskar at all ह्या ओळी लिहिण्यास प्रवृत्त करणारा कलाकार. भारतीय क्रिकेटला जिंकायला शिकवणारा धुरंधर.

घरातल्या भिंतींना...

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 10/07/2012 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच वेळा आपल्या घरातील लहानगे भिंती रंगवतात... त्या रंगवेल्या भिंतींचा कौतुकही कोणाला एवढ नसत किवा त्या कोणाला खराबही वाटत नाही, पण काळाच्या ओघात त्या भिंतींना नवीन रंग दिले जातात आणि त्या नक्षी रंगाच्या पडद्या आड लपल्या जातात... थोडासा प्रयत्न ह्या आठवणी चाळण्याचा... आणि मनाच्या कोपर्यात जिवंत ठेवण्याचा... घरातल्या भिंतींना आता नवीन रंग दिलाय... त्याच्यामागे एक काळ झाकला गेलाय... समोरची हि मोठ्ठी भिंत...
काव्यरस

पारिजातक

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 10/07/2012 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतं तुला? दोन वेगळ्या वाटांवर चालता चालता एका वळणावर आपण अवचित भेटलो होतो तेव्हा तू हातात हात गुंफुन थरथरत्या ओठांनी मला म्हणालीस एकत्र चालायचं का रे? "अगं पण......" पण काय?

वीज वितरण कंपन्या आणि ग्राहक

लेखक चैतन्यकुलकर्णी यांनी सोमवार, 09/07/2012 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
विजवितरण कंपनी सध्या ५०० रू. पेक्षा जास्त बील असेल व वेळेवर भरले नाही तर कोणतीही पुर्वसुचना न देता वीज जोडणी तोडत आहे. किमान १५ दिवसांची नोटीस देणे बंधनकारक असताना ती न देता वीज कायदे पायदळी तुडवले जात आहेत. उद्योंगाकडे लाखोंची थकबाकी असताना त्यांना वितरणचे कर्मचारी सहाय्य करतात. आज दुपारीच माझ्यासमोर घडलेली घटना आहे. एका कुटूंबाचे बील ३ जुलैला देय (रू. ५०० पेक्षा जास्त) होते व त्यांनी काही अडचणींमुळे ते मुदतीत भरले नाही तर वीज वितरण कर्मचा-याने काहीही ऐकून न घेता वीज तोडली व त्यांना २५ रू. दंड व बील भरून कार्यालयात भेटण्यास सांगितले. वस्तुत: नवीन बील भरेपर्यंत बील भरले तरी चालते.

"कोणाचा रे तू?"

लेखक चिगो यांनी सोमवार, 09/07/2012 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
"कोणाचा रे तू...?" गावात बालपण गेलेल्या कुणालाही हा प्रश्न नवीन नसावा. ह्या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला मिळणारी वागणूक ठरत असे. वाटलं होतं, की शहरे, उच्च शिक्षण संस्था, उच्च पदस्थ नोकर्‍या इ. मध्ये कुठल्याही व्यक्तीला मिळणारी वागणूक कदाचित त्याच्या/तिच्या बौद्धीक प्रतिभेवर निर्धारीत असेल. पण काल "सत्यमेव जयते" बघितल्यावर कळले, की भारत असो वा इंडीया, अजूनही "कोणाचा रे तू" ह्याच्या उत्तरावर बरंच काही निर्भर आहे.. "सत्यमेव जयते" च्या बर्‍याच आधी, लाबशाराप्र अकादमीमध्ये, "इंडीया अनटच्ड" ही डॉक्युमेंटरी बघितली होती. खरे तर स.ज. पेक्षाही ही फिल्म जास्त सत्यदर्शी आहे.