कविता व भावगीत
मागील एका लेखात विषय आला होता " कविता व भावगीत यात फरक करता येतो का ? आणि तसा फरक असेलच तर तो कशामुळे उद्भवतो ? आता हे शक्य आहे की चांगला कवी सुरेख भावगीत लिहू शकेल आणि श्रेष्ठ भावगीतकार सुरेख कविताही लिहून जाईल. दोन उदाहरणे म्हणजे मंगेश पाडगावकर आणि शांताबाई शेळके. उलटे उदाहरण म्हणजे आरती प्रभूंचे. त्यांच्या अनेक सुन्दर कविता रसिकांच्या मनात घर करून असतात पण भावगीत ? लक्षात आले का मला काय म्हणावयाचे आहे ? पण हा फरक अधोरेखित करावयास आज एक छान उदाहरण देतो.
काळ साधारणत : साठ एक वर्षांपूर्वीचा.
मिसळपाव