Skip to main content

ट्रेक - सुधागड

लेखक स्पा यांनी शनिवार, 18/08/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
अरे तुम्हाला साडेसात सांगितलेले ना.. अजून तू कल्याण लाच आहेस.. कधी घरी जाणार आणि निघणार? माझ डोकच फिरलं होत. मी कसाबसा हापिसातून लवकर कट्लेलो होतो , आणि वेळेत तयार होतो, पण आमच मित्रमंडळ अजून घरीच पोचत होतं , पुण्याची टीम निघाली पण होती खोपोलीत भेटायचं ठरलेल होतं . संध्याकाळी पनवेल किती प्याक असत हे अनुभवाने माहित होत .. आणि आम्हाला पालीला पोचायचं होतं , ८ इकडेच वाजले होते. कस काय होणार होतं .. शेवटी दोघ मित्र एका बाईक वर. आणि मी एकटा माझ्या यमी (माझ्या यामाला मी लाडाने यमी म्हणतो ;) ) सोबत निघालो . रात्री जास्त पळवता पण येत नाही , कसे बसे ९.३० च्या दरम्यान पनवेल च्या पुढे आलो .

आज नेताजी सुभाष यांची ६७ वी पुण्यतिथी

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 18/08/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
akherJPG आज नेताजी सुभाशचंद्र बोस यांची ६७वी पुण्यतिथी. सशस्त्र क्रांतिच्या पर्वाचा कळस ठरलेल्या, आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ येउन ठेपलेल्या - मोइरांग येथे येथे १४ एप्रिल १९४४ रोजी तिरंगा फडकावणार्‍या नेताजींना स्वतंत्र हिंदुस्थान पाहायचे भाग्य लाभले नाही. मात्र साम्राज्यावर निर्णायक घाव हा नेताजींच्या आझाद हिंद सेनेचाच होता. नेताजींच्या ६७ व्या स्मृतिदिनी नेताजींना सादर प्रणाम

कोळशाच्या धंद्यात हात काळे!

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 18/08/2012 04:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपले परमप्रिय, महान ज्ञानी, धोरणी, स्वाभिमानी, संयमी, विचारी, द्रष्टे, स्थितप्रज्ञ, थोर पंतप्रधान मनमोहनसिंग हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत धुतल्या तांदळासारखे, नव्याने पडलेल्या बर्फासारखे वा त्यांच्याच दाढी मिशांप्रमाणे पांढरे शुभ्र आहेत असा एक सार्वत्रिक समज होता.

धर्म आणि हिंसा

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 18/08/2012 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
धारयति इति धर्म: असे म्हणतात. धर्म हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे. सर्वव्यापी आहे. पण धर्म आणि पंथ यात आपण गल्लत करतो असे वाटते. पंथ म्हणजे संप्रदाय - हा केवळ आपल्यापुरते पाहणारा असतो. आमचा पंथ मानणारे किंवा इतर अशी जगाची विभागणी पंथवाले करतात. पंथ संकुचित असतो.

वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 17/08/2012 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू येतेय बिनपावली तुझ्या खांद्यामागे सकाळ सोनसळी पांढूरल्या तावदानात धीट होत, सूर्य येतोय आत उशीवर बरसताहेत तुझे केस तू अजूनही झोपेतच आहेस! वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं बघ, मी सकाळ देतोय तुला हा दिवसही घे, माझ्या फुला! येतील हलत्या पडद्यामागे सूर्याची किरणे फडफडणाऱ्या पापण्यामागे स्वप्नांचे फिरणे झोपेत तुझे स्वप्नांना बिलगणे सुखाचे क्षण आठवून ओठांचे विलगणे वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं बघ, मी सकाळ देतोय तुला हा दिवसही घे, माझ्या फुला!

धडा पहिला.

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 17/08/2012 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
विषय तसा थोडा नाजुकच. कितीही टाळायचा म्हटला तरी कधी ना कधी त्याला तोंड द्यावे लागणारच याची कल्पना ही होती. पण म्हणुन ती वेळ इतक्यातच येउन ठेपेल असा अंदाज नव्हता. तस पाहिलं तर मागे 'थ्री ईडियट्स' पहातानाच (टायटलमध्ये स्पर्म्सची कार्टुन रेस दाखवली आहे ती पाहुन ) हे काय म्हणुन तिनं विचारलं. परत त्याच चित्रपटात शेवट जवळ येताना जो धुमाकुळ चालु होता तेव्हा ही चेहेर्‍यावर बर्‍याच प्रश्नचिन्हांचं जाळं पसरलेलं होत. त्यावेळी काही तरी थातुर मातुर उत्तर देउन टाळलं होतं. पण नांदी तेव्हाच झाली होती. गेल्या आठवड्यात एका सॅनिटरी नॅपकीन ची जाहिरात पाहुन बराच काळ तुंबलेला प्रश्न बाहेर आलाच.

झटपट वऱ्हाडी ठेचा :

लेखक कुलमयु यांनी शुक्रवार, 17/08/2012 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: ८-१० लाल मिरच्या देठ काढून,(काश्मिरी /ब्याडगी मिरची,) ३-४ पाकळ्या लसूण, एक लिंबू , एक दीड चमचा साखर, चवीपुरते मीठ इ. कृती: लाल मिरच्या मिक्सरमधून बारीक कराव्यात. मंद आचेवर कढईमध्ये बारीक केलेल्या मिरच्या लसणाची पेस्ट घालावी. मिरची भिजेल एवढेच पाणी घालून शिजवावे. पाणी आटत असताना त्यात एक चमचा साखर, लिंबू रस आणि मीठ घालून मिश्रण वाफवावे झालेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात २ चमचा तेल घालून मिश्रण एकजीव करावे. किमान अर्धा तास अथवा जास्त वेळ मुरून द्यावे ते अधिकच रुचकर लागते.

(पुन्हा) स्मृतिचित्रांच्या निमित्ताने

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 17/08/2012 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या विकांताला सहज म्हणून स्मृतिचित्रे हातात घेतले. आणि कितव्यांदातरी वाचु लागलो. नेहमीप्रमाणे याहीवेळी जरावेळ वाचु म्हणून हातात घेतलेलं हे पुस्तक संपवल्याशिवाय खाली ठेवलं नाही. आणि दरवेळी नव्याने काहितरी शिकवणार्‍या या पुस्तकातून नवे प्रश्न समोर उभे रहातात.