खजुराहो
प्रोजेक्ट मेघदूतच्या निमित्ताने मध्य भारत पालथा घालताना आमच्या ग्रुपने खजुराहोलाही भेट दिली. वल्लीचा लोणी-भापकरचा धागा वाचताना प्रतिसादात आलेल्या खजुराहोच्या उल्लेखामुळे खजुराहोची अधिक माहिती व्हावी यासाठी हा धागा काढत आहे.
खजुराहो येथील मंदिरांची बांधणी इ.स. ९५० ते इ.स. ११५० या दरम्यान चंदेल राजांनी केली. खजुराहोचा त्या काळचा परिसर हा अत्यंत दुर्गम व जंगलाने वेढलेला असा होता. परचक्रांपासून या मंदिरांना अनायासेच संरक्षण मिळत असल्याने आजपर्यंत ती (त्यामानाने) सुस्थितीत आहेत. मंदिरांचे एकूण ३ गट आहेत (दक्षिण, पूर्व व पश्चिम); पैकी वेळेअभावी फक्त दक्षिण भागातील मंदिरांना भेट देता आली.
मिसळपाव
