Skip to main content

नाटकांवरुन कविता

लेखक रसायन यांनी शुक्रवार, 23/11/2012 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
"नकळत सारे घडले" माझे मन तुझ्यावर जडले तु माझी "ती फुलराणी" कधी झालीस? हे माझे मलाच न कळले प्रेमामध्ये रुसवा-फुगवी अन् "हसवा फसवी"नेच जम्मत आहे प्रेम एकदा करुन तर बघ "हिच तर प्रेमाची गम्मत आहे" प्रेमाचा पुर्वार्ध वाटेल "कुर्यात् सदा टिंगलम्" प्रेमाचा उत्तरार्ध असेल साक्षात् "लग्नम् गोंधळम्" "यदाकदाचित" माझ्या प्रेमाला प्रथम म्हणशील तु नाही रे नाही प्रेम माझ्याशी करुन तर बघ ,नक्की म्हणशील " सही रे सही"

मदत पाहिजे/ सावधान.....रिलायन्स मनी मल्टिप्लायर प्लॅन घोटाळा

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 23/11/2012 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सामन्यपणे इंग्लंड, नायजेरिया इत्यादी देशांतून येणार्‍या स्कॅम इ-मेल सोबत परिचित आहोत. पण काल मी असा फ्रॉड बघितला की माझे डोळेच पांढरे झाले. मी सध्या गृहकर्जाच्या शोधात आहे, त्यामुळे तुम्हाला कर्ज हवे आहे का असे विचारणारा कोणताही फोने कॉल मला हवाहवासा वाटतो. तर सांगायच्रे असे की, मला काल एका दिल्लीस्थित कंपनीतून कॉल आला. त्याने मला पर्सनल लोन ची ऑफर दिली. त्याचे म्हणणे थोडक्यात असे की. १. तुम्ही रिलायन्स मनी मल्टिप्लायर चा प्लॅन घ्यायचा. २. त्या इंशुरन्स च्या बदल्यात रिलायन्स तुम्हाला त्याच्या १० पट कर्ज देणार. ३. कर्ज ०% दराने असेल.

कोडे: काळ, काम आणि चक्रवाढ

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 23/11/2012 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
नळ-टाक्यांची पारंपारिक कोडी वाचून कंटाळा आला म्हणून वाटलं की एक वेगळं कोडं घालावं. गणिती कोडं आहे म्हटल्यावर काहीही गृहीतकं चालतात असं असलं तरी शक्यतो अचाट गृहीतके टाळण्याचा प्रयत्न केला आहे. कोडं असं आहे: अ. समजा जगात एक लक्ष कोटी (एक ट्रिलियन) बॅरल खनिज तेल उपलब्ध आहे आणि त्यापैकी २०१२ मध्ये (फक्त) १० अब्ज बॅरल तेल वापरले गेले. मानवी प्रगतीमुळे तेलाच्या वापरात दर वर्षी १% ने वाढ होते असे समजले. तर, १. जगातले तेल कधी संपेल का? २. संपणार असेल तर किती वर्षे लागतील? ब.

परधीन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 23/11/2012 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
चौकोनी मावेल कसे मज सांग पिंजले असे पिसे अवशेष विखुरल्या लाटांचे वाटे झेलावे अलगदसे भंगल्या तनूचे अणुरेणू शोधिती हरवले जसे हसे पंखात नितळ दंव सोनेरी स्पर्शात भाव अस्पर्श असे मोट बांधली मेघाची पण पराधीन घरचे वासे अंदाज न सुटल्या धाग्यांचे क्षण जवळ न येती जराहिसे .....................अज्ञात
काव्यरस

खिमा-पालकबॉल्स ग्रीन करी (हुबळी स्टाईल)

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 22/11/2012 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
a पहिल्यांदाच सांगते, ही पाकृ माझी नाही हं. याची कर्ती-करवती माझी वहिनी शिल्पा. तिचं माहेर हुबळी.तीच या पाकृची अन प्रतिसादांची मालकीण. दिवाळीचा गोडधोड फराळ खाऊन झाल्यावर भाऊबीजेला भाऊरायाला ओवाळायला कोल्हापूरला गेले होते. कोल्हापूरची पद्धत अशी की दिवाळीचा फराळ खाऊन ‘गुळमाट’ झालेलं तोंड भाऊबीजेला ‘वशाट’ खाऊन खंगाळायचं ! घरोघरी भाऊबीजेला मटण ! या भाऊबीजेला आमच्या भावांना (मायंदाळ हैत ) खिम्याच्या गोळ्यांचा आठव आला. झालं ! शिल्पा हुबळीची.

वीस लाख ....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 22/11/2012 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
उभा देश हबकला होता त्या दीड दिवसात थिजलेल्या महाराष्ट्राकडे बघून ! बाळासाहेबांच्या जाण्याने महाराष्ट्र इतका हादरेल याची कुणी कल्पनाही केली केली नव्हती. माझा पानवाला दिन्या मंगलोर चा. बोला, मेरे को कोई डर नई है। लेकिन रिस्पेक्ट देने के लिए दो दिन बंद रखेगा। शॅटरडे संडे को धंदा डब्बल रहता है, मगर रिस्पेक्ट ज्यादा इम्पोर्टेन्ट है। ...... मी खलास. रविवारी दिवाळीच्या सुट्टीनंतरचा नाशकातल्या उद्योगनगरीतला कामाचा पहिला दिवस. पण सातपूर, अंबड आणि सिन्नर या तीनही वसाहतीत चिडीचूप सामसूम. हे अभूतपूर्व दृष्य बघून मी चाट पडलो.

खोटे बालंट टाळण्यासाठी काय करावं?

लेखक मन१ यांनी गुरुवार, 22/11/2012 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
सल्ला हवा आहे.(मिपाकर आनंदाने फुकटात देउ शकतील अशी ही एक महत्वाची गोष्ट.) बालंट आल्यावर काय करावं? आम्ही तीन जण कथेतील पात्रे आहोत.मी, माझा मित्र महेंद्र आणि महेंद्रचा मित्र जग्या. समजा महेंद्र ह्या माझ्या मित्राचे बायकोशी पटत नाही. एक दिवस त्याने येउन मला सांगितलं की "जग्या काल बायकोशी का पटत नाही असे मला विचारत होता. तु जग्याला माझं बायकोशी पटत नाही असं का सांगितलस?" . वस्तुस्थिती:- जग्याशी माझी काहीही ओळखपाळख नाही. महेंद्रचा मित्र म्हणून फार तर "परिचित" इतकच म्हणू शकतो. मागील कित्येक वर्षात माझा जग्याशी धड संपर्कही नाही. मगः- जग्यानं असं खरच सांगितलं असावं का?

*......................एक नाजुक परी..............*

लेखक प्रेमवेडा यांनी गुरुवार, 22/11/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक नाजुक परी आली आमुच्या घरी दिवे लागले दारी आप आंगे स्वतः || * दुडू दुडू रांगत फिरे अवघ्या घरात आनंद काळजात उठे पाहुनिया || चिमुकले दोन दात आले बोळक्या मुखात जे जे दिसते घरात पाही चाखावया || तुरू तुरू चालत आवडे दुधभात भोवताली पसारा जमा करुनिया || ती चिमुकली परी झाली राजकुमारी सुकुमार, निघालो आम्ही शोधावया |||| * = आपोआप

कसाबच्या निमित्ताने......

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 22/11/2012 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
चला,उशिरा का होईना,भारत सरकारला एकदाची जाग आली आणि कसाब फासावर लटकला. पण हा खरंच भारताने दहशतवाद्यांना शिकवलेला धडा म्हणावे का? एक कसाब मारायला आपल्या देशाची ४ वर्षे आणि ४० कोटी रुपये खर्ची पडले. असे अनेक कसाब तिकडे पाकिस्तानात दिवसाला १०० पैदा होत आहेत. ते सगळे जर अंदाधुंद सुटले तर ते आपल्याला कितीला पडणार आहे ? आजच पेपरात कै मेजर संदीप उन्नीकृष्णन याच्या वडिलांचे विचार वाचले. ते म्हणतात की दहशतवादी कधीच धडा वगैरे शिकत नसतात. ज्यांचा धर्मच जिहाद आहे त्याला मरणाची भीती वाटतच नसते. आपल्या सहिष्णू सरकारकडे अजून ही अफजल गुरूच्या दयेचा अर्ज प्रलंबित आहे.