मालोर्का
नोव्हेंबर-डिसेम्बर महिन्याचे दिवस होते. जर्मनीत थंडीने काकडून गेलो होतो. तापमान 0 डिग्री च्या आसपास आसवे. अगदी वैतागाल्यासारखे झालेले. त्यामुळे जवळपास जास्त खर्चिक नसलेला पण थोडे उबदार हवामान असलेल्या आणि कमीत कमी वेळेचा प्रवास असणाऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार मनात घोळत होता. आणि अचानक एक छान वीक एंड ऑफ सिझन ऑफर सापडली. स्पेन देशातील भूमध्य समुद्रात असणाऱ्या मालोर्का बेटावर ३ दिवस दोन वेळचे खाणे आणि विमान प्रवासासह एकूण किंमत प्रवासी १९० युरो. मग काय पटकन बुकिंग केले आणि सपत्निक निघालो. माझ्या गावापासून न्युर्नबर्ग विमानतळावर येवून पोहोचलो.
.............नियती.........
फार दिवसांपासुन मनात
एक प्रश्न सलत राहीला
कधी याचे उत्तर मिळेल का?
हेच विचारत राहीला
उत्तर शोधण्यासाठी माझे मन
सदैव झगडत राहीले
अनेक उत्तरे मिळवुन सुद्धा
ते उत्तर शोधतच राहीले
यश आले अखेर 'नेमके' उत्तर मिळवायला
पण् हेच नेमके मान्य नव्हते नियतीला
अनेक समिकरणे जुळवुन कसेबसे उत्तर मिळवले
पण् 'नियती'च ती! तिने सारे प्रश्नच बदलून टाकले.........!!!!!!!!!
संवाद…
संवाद हा मानवी जीवनात किती महत्वाचा आहे ना! संवाद साधल्याशिवाय तुमच्या मनात काय आहे हे समोरच्या व्यक्तीला समजू शकत नाही, त्यामुळे त्याच्या कडून तुम्हाला हवी ती क्रिया घडत नाही.
पण हाच संवाद हल्लीच्या काळात किती कमी होतो आहे, आता असं म्हणायचं मुख्य कारण आहे ते टेलीव्हीजन. सध्या प्रत्येक घरात साधारणपणे हे उपकरण असतेच असते. मग काय ह्याच्या मागून येणारे फायदे आणीं तोटे देखील घरात शिरतात.
अंतू बर्व्याचं अर्थशास्त्र - १
अनेक वर्षं मिपावर "मुखस्तंभ रहाणे" ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्यानंतर लेखनाचा पहिलावहिला प्रयत्न. दिग्गजांनी पहिलटकरणीला सांभाळून घ्यावे, ही विनंती!
-----------------------------------------------------------------------------
उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते. "कशी काय गर्दी ?" "ठीक आहे !" "प्लान तर मोकळाच दिसतोय.
अवसान, हिंमत, धाडस एक गोष्ट
फार फार मागे, कोणे एके काळी घडलेली; पंचतंत्रात असते तशीच, त्याच काळातली ही एक गोष्ट.
जंगलातले ससे चपळ झाले की सिंह सुस्तावले सांगता येणार नाही. पण येनकेन प्रकारे सिंहांना सशांची शिकार करता येणे अवघड होउ लागले; दुरापास्त होउ लागले.
नव्या सावजांना कसे शोधता येइल ह्याबद्दल विचार करत हळूहळू खंगत जाणारे ते सिंह चिंतित बसले होते.ते फारच अश्क्त दिसू लागले होते. इतक्यात आलेल्या मानभावी सेवकाने, कोल्ह्याने त्यांचे लक्ष विचलित केले.
पेठा
समस्त जालिय-स्नेह्यांना आणि आप्तेष्टांना नवं वर्षाच्या गोड गोड शुभेच्छा !!!
साहित्य :
१/२ ते ३/४ किलो कोहळं (अॅशगार्ड)
१/२ किलो साखर.
१-२ चमचे खायचा चुना.
तुरटी.
गुलाब/केवडा वॉटर.
स्वप्नातल्या देशा
"सपने मे देखा एक सपना, वो जो है ना अमिताभ अपना..............." ऐकत होतो आणि खरोखरच अमिताभ आला. सुरुवातीच्या चहापाण्याच्या चार गप्पा झाल्यावर (म्हणजे फक्त गप्पाच झाल्या. पुणेकर आहे म्हटले मी. साले लोक न बोलावता घरी येणार वर यांच्यासाठी चहा करा हे कोणी सांगितले आहे?" ) अमिताभन्ने चाचरत मुद्द्याला हात घातला. पिक्चर काढतो आहे म्हणाला. मला हिरो होण्यासाठी गळ घालत होता. आधी ष्टोरी विचारायच्या बेतात होतो पण मग साशंक मनाने आधी उरलेली स्टारकास्टच विचारली. तर म्हणाला तुम्ही हिरो, अभिषेक साइड हिरो, ऐश्वर्या हिरोइन, जया तुमच्या आईचा रोल करेल आणी मी खलनायक.
नाही म्हणले तरी मला ठसका लागला.
तुम्ही कोण होणार ?
शाळेत असताना ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ असे कुठेतरी वाचले होते. हे वाचून मी (माझ्या)लहानपणी कोणत्याही बारशाला गेले किंवा नवीन बाळ झाले आहे, अशा घरी गेले, की पाळण्यातल्या बाळाचे पाय पाहण्याचा प्रयत्न करीत असे. पण ते बेटे दुपट्यात लपेटून इतक्या बंदोबस्तात ठेवलेले असत की त्यांचे नखही पाहायला मिळत नसे. एकवेळ शनिवारी संध्याकाळी देवळातल्या मारुतीच्या पायाचे दर्शन होणे सोपे, पण पाळण्यातल्या बाळाचे पाय ? नाव नको !
पुढे पुढे, ती एक म्हण आहे अन त्याचा अर्थ, बाळ मोठेपणी कोण होणार ते समजते, हे समजले.
तसेही अलीकडे पाळणे बघायला मिळणे कठीणच.
किल्ले राजगड
गेल्या २२-२३ तारखेला राजगड्ला जाण्याचा योग आला होता...राज्गडाचे आणि गडावरुन काढलेल्या प्तचि डकवत आही..
सर्व मिपाकराना नवीन वर्शाच्या हार्दिक शुभेछा!!!
१.गडाच्या वाटेवर...मुले शाळेत जाताना..पाठिमागे राजगड.
२.बालेकिल्ला...
३.सन्जीवनी माची..

मिसळपाव