Skip to main content

सखे ...

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 18/01/2013 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
वळणांवळणांवरती सखे तव आठवणींची भरती सखे कसे विस्मरू सांग तुला मी हे श्वास श्वास तुज स्मरती सखे | पाऊस हा घनगर्द सखे अन् तुझ्या मिठीचा गंध सखे कसा सुटावा असा रेशमी तव बाहुंचा बंध सखे रक्तवर्णित तव लज्जित चर्या श्वासा श्वासांवरि भीति सखे अनामिकशा त्या ओढीने रोमांचित तव कांती सखे चिंब चिंब ही तुझी कुंतले चेहर्‍यावरी मम रुळती सखे थेंब थेंब हा तुला स्पर्षता न कळत होई मोती सखे थरथरत्या तव अधरांची मग पडे घट्ट ती मिठी सखे असे गुंतलो एकामेकीं जणु जन्मांतरीची भेटी सखे श्रावणातल्या सायंकाळी मला गवसले मीच सखे विरुन गेले तुझ्यात अलगद सायुज्यता का हीच सखे ही भोगाची उर्मी म्हणु की तल्लीनतेची समाधी सखे
काव्यरस

दार का लावतात ?

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 18/01/2013 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
इमारतीच्या गेटच्या लगत पेस्टीसाईड मारणार्‍या कंपनीने एक पाटी चकट फू लावलेली असते ." गेट समोर वहाने लावू नयेत" तरीही न शिकलेली - पेपर टाकणारी पोरं तिथंच नेमकी सायकल का लावतात ? असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे. पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच. खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की " सगळे लोक दार का लावतात?" मी बरेचदा, व्यक्ती आणि तिचा कल पाहून "विरंगुळा" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "मुले वयात आल्यानंतर आई व़डीलानी दार लावायचंच " अशी परंपरा आहे.

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 18/01/2013 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मन्नूस, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, पत्र लिहिण्यास उशीर झाल्या बद्दल क्षमस्व. आज मी मुद्दाम प्रयत्न करून तुला मोठे आणि सविस्तर पत्र लिहित आहे, कारण इथल्या नवीन शाळेतल्या मॅडम ज्यांना इथे बाई म्हणतात त्या नेहमी मला माझ्या गचाळ हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाच्या चुकांसाठी खूप रागावातात. इतक्या मोठया शहरातून आलास तरीही तुझं लेखन इतकं अशुद्ध आणि अक्षर इतकं खराब कसं असं त्या नेहमी म्हणतात. पण त्यांना माझे निबंध मात्र खुप आवडतात, ते त्या सगळ्या वर्गांमधे वाचुनही दाखवतात. त्या माझे नाव आंतर शालेय निबंध स्पर्धेत पाठवणार आहेत, आणि माझा नंबर जिल्ह्यातुन पहिला आलाच पाहिजे असे त्या म्हणाल्या.

नकोस

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 18/01/2013 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
ती :- दिवसभराचा उजेड उतरत जातो झाडांच्या तळकोषी आरामाला झिरपत जातो हळू हळू अंधार व्यापतो आभाळाला........ तो :- नकोस हिणवू नको ओणवू सावर ग स्वतःला नभी चांदणे येइल अलगद सजविल तव मेण्याला धुके भ्रमाचे विरघळेल उदयेल नवी स्वरमाला हरवुन जाशिल तिथे सोडशिल ना या जन्माला संध्या- छाया ऊन-सावल्या खेळविती हृदयाला उमलविती रोमांकित वलये जागविती मधुशाला रंग नभाचे तसेच आपले अंत नसे क्षितिजाला शब्द कुंचले घेउन हाती हो सुसज्ज लढ्ण्याला ......................अज्ञात
काव्यरस

जेम्स बाँडचं पडद्यावरचं अर्धशतक..

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 18/01/2013 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
१८८० साली पहिल्या मोशन कॅमेर्‍याचा शोध लागल्यापासून जगात कित्येक सिनेमे बनले असतील. विविध विषय, माणसं, प्रेम, भय, युद्ध, विनोद प्रत्येक क्षेत्रात सगळ्या भाषांमध्ये हजारो सिनेमे आले, त्यांनी आपापल्या काळात लोकांवर अधिराज्य सुद्धा केलं असेल. पण एक काल्पनिक कॅरॅक्टर, जे फक्त कादंबरी रुपाने अस्तित्वात होतं, त्याने मात्र सिनेमात आल्यापासून गेली ५० वर्षे लोकांच्या मनावर अक्षरशः मोहिनी घातलीये, तो म्हणजे जेम्स बाँड. जेम्स बाँडचा जन्मदाता इयान फ्लेमींगला कधी स्व्प्नातसुद्धा वाटलं नसेल आपलं कारटं इतकं प्रसिद्ध होईल. आपली पहिली कथा लिहिताना त्याच्या मनात जेम्सबद्दल काही वेगळीच मतं होती.

ड्रॅगनच्या देशात १७ – यांगत्से क्रूझ : व्हाईट एंपरर सिटी, कुतांग गॉर्ज व शेनाँग स्ट्रीम

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 18/01/2013 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्यादेशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

बार का लावतात ?

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 17/01/2013 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
इमारतीतल्या जिन्याच्या कोपर्‍यात २-३ जोरदार पिचकार्‍या मारून मग "तंबाखू का खातात?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे. पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच. खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "भारतातले पुरूष बार का लावतात?" मी बरेचदा, व्यक्ती आणि तिचा कल पाहून "विरंगुळा" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "वयात आल्यानंतर मुलांनी बार लावायचाच" अशी परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "काहीकाही बायका पण बार का लावतात?" आणि मी निरुत्तरसा होतो. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात.

निरक्षर

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 17/01/2013 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
कधीही न भेटणार्‍या, पण जिवलग मित्रांची ही स्टोरी. न भेटता (किंवा भेटण्याची शक्यता नसताना) ते जिवलग कसे झाले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. तो भेटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा चालतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायच नाही.... फक्त वाचायच. _________________________________ मुक्कामाचं ठिकाण ठाऊक नाही पण चालयच,... वेड्यासारखं चालायच. आजूबाजूच्या गर्दीला जुमानतय कोण? उन्हातान्हातून वणवण त्यात सावली कुठली बोंबलायला ? आपलीच पावलं म्हटल्यावर झक मारत चालणारच आणि पावलं चालतायत म्हटल्यावर रस्ता न सरून सांगतोय कुणाला? अरे एक सांगायच राहिलं, वाळवंटातनं चालायच....फार मजा येते.

थुक्का का लावतात?

लेखक नाना चेंगट यांनी गुरुवार, 17/01/2013 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच. रस्त्यात खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "माणसं, व्यवहारात थुक्का का लावतात?" मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "पद्धत" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "व्यवहारात विश्वासानंतर थुक्का लावयची" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "माणसं विश्वास का ठेवतात?" आणि मी निरुत्तरसा होतो. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगतो की अर्थशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, व्यापारात अनेक प्रकारचे व्यवहार असतात.