Skip to main content

" आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी - "

लेखक विदेश यांनी शनिवार, 13/07/2013 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी हाती टाळ, चिपळ्या, वीणा, एकतारी .. भाळावरी गंध, विठ्ठलनाम छंद विठ्ठलस्मरणांत होतो सारे धुंद .. तुळशीवृंदावनाचा डोईवर ना भार पेलतो विठ्ठल आमचा हा संसार .. भक्त सारे गुंग मुखात अभंग भजनात रंग कीर्तनात दंग .. जातीभेदा वारीत नाही हो थारा विठ्ठलभावाचा एक सर्वास निवारा .. उच्चनीच नाही, नाही रावरंक सर्वांनाच मोही विठ्ठलनाम एक ..
काव्यरस

प्राण

लेखक विकास यांनी शुक्रवार, 12/07/2013 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
Pran याच वर्षात दादासाहेब फाळके या भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने पुरस्कृत झालेले हिंदी चित्रसृष्टीच्या गतकाळातील "सुप्रसिद्ध" खलनायक तसेच चरीत्रनायक प्राण सिखंड यांचे वृद्धापकाळाने आणि आजारापणाने निधन झाले आहे. खलनायक पण ग्रेसफूल असू शकतो हे प्राण यांच्या भुमिका बघताना समजते... मधूमती, कश्मीर की कली, आदी अनेक चित्रपटातील त्यांच्या खलनायक असलेल्या भुमिका गाजल्या असल्या तरी त्यापेक्षा कसौटी आणि जंजीर मधली त्यांची दोन गाणीच अधिक आठवत आहेत...

MS Dhoni भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे का?

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 12/07/2013 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
ICC च्या सर्व ट्रॉफी जिंकून तिरंगी मालिकाही खिशात घालणार्याa जिगरबाज कप्तान MS Dhoni याचे हार्दिक अभिनंदन..... आजवर कोणालाही न जमलेले जबरदस्त winning team spirit निर्माण करून भारतीय क्रिकेटला अत्त्युच्च मानाचे पद मिळवून देणारा कप्तान मात्र काही दिवसापूर्वी match fixing च्या आरोपाखाली संशयाच्या जाळ्यात ओढला गेला होता ................ तुम्हाला काय वाटते ? MS Dhoni भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे का?

कविता आमची रसग्रहण तुमचे

लेखक देशपांडे विनायक यांनी शुक्रवार, 12/07/2013 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
हा कवितेचा आकडी प्रकार इथे कवि फक्त शब्द लिहीतो रसिकांनी त्या शब्दांना त्यांना पाहिजे तो अर्थ देऊन त्यांना पाहिजे तो रस निर्माण करावा त्याचा स्वाद घ्यावा . मित्र मैत्रिणी निमंत्रित करून रसपान केल्यास मुक्ती प्राप्त होते असे ऐकले . एक दोन तीन एकदो न तीन एकदोन '' ती '' न

काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/07/2013 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १ होजाने अल्लाचा प्राण वाचविला त्याची गोष्ट - बायझिडच्या मशिदीजवळ एका मदरसेत म्हातारा ‘होजा’ लहान मुलांना मोठ्या तन्मयतेने शिकवीत असे. सर्व पुस्तकांचा राजा ‘कुराण’ त्या लहानग्यांना शिकवताना त्याचा ऊर आभिमानाने भरुन येत असे तर कधी कधी त्याच्या डोळ्यात पाणी तरळल्याचाही भास होई.

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 12/07/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
दाय विल बी डन! Jejus जिझस _____________________________ जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे. जे आहे ते स्वीकारलं की मनाला तक्रारीला जागाच उरत नाही. स्वीकृतीला मन राजी होत नाही. ती तुमची हार आहे असा बिनतोड युक्तिवाद करून ते उपलब्ध उपभोगू देत नाही. लगाम मनाकडे असल्यानं आपण आहे ते नाकारतो (किंवा अत्यंत नाईलाजानं स्वीकारतो).

माझे चाट जीवन १

लेखक देवांग यांनी शुक्रवार, 12/07/2013 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज बरोबर १४ दिवसांनी कॅफे मध्ये आलो होतो. द्विधा मनस्थिति होति. परत चाट करावे कि बाबांच्या साईट पहाव्यात. पण एक भीती होती कि विज्याला जर कळले कि परत चाट करतो आहे तर तो सगळ्यांना सांगू शकत होता कि मी गे लोकांशी चाट करतो, किंवा माझ्यात काही तरी प्रोब्लेम झाला आहे. मित्रांना एक आयताच विषय मिळाला असता.त्यामुळे बाबांची साईट पाहायचे पक्के केले आणि पुन्हा एकदा कोपर्यातला कॉम्पुटरवर ताबा घेतला. XXXX बाबा.कॉम लावून बसलो. पण मन लागत नव्हते. सारखे वाटत होते कि परत चाट करावे. परत एकदा नशीब आजमावावे. शेवटी न राहाववून १५ मिनटात बाबा बंद करून MIRC लावले. ह्या वेळेस पुणे चाट च्यनेल जोइन केला.

चारोळी...

लेखक रसिका तिलेकर यांनी शुक्रवार, 12/07/2013 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
हळूवार पावसाची सर .. मनाला वेड लावून जाते... तूझी गोड आठवण.. उरी ठेवून जाते...

माझा बाप आणिक माझ्या बापाचा मुलगा (आषाढस्य प्रथम दिवसे)

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 12/07/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवा माझा बाप गेला. आणि मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. डोळे फुटे पर्यंत रडला. अजूनही रडतोय. आयुष्यभर रडेल. रडतच राहील अगदी त्याच्यासाठी कुणीतरी रडे पर्यंत रडेल. बाहेर पाऊस पण रडतोय. कूणीतरी म्हणाल आषाढ लागलाय. मग माझ्या बापाच्या मुलाला आठवल कालीदासाने 'आषाढस्य प्रथम दिवसे' अस काहीस काव्य लिहीलय. त्यात आषाढातल्या मेघा बद्दल काहीस लिहीलय अस ऐकलय माझ्या बापाच्या मुलाने. तो मेघ आता माझ्या बापाच्या मुलाच्या डोळ्यात राहतो. आषाढ महिना फार वाईटय. आषाढ लागताना तो माझ्या बापाला घेऊन गेला आणिक संपताना माझ्या आईला. नंतर कधीतरी माझ्या बापाच्या मुलालाही घेऊन जाईल अलगद.

दिंड्या, पताका..

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 12/07/2013 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो. खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं... अगदी लहानपणापासून हो.