स्वदेशात/परदेशात नोकरी न करण्याची खंत जाणवते का?
नमस्कार मंडळी,
कामानिमित्त आपण जगभर विखुरलेले असतो. परदेशातील नोकरी स्वीकारताना तिथली सुबत्ता, आर्थिक स्थैर्य, स्वच्छता, कमी भ्रष्टाचारपणा हे तर भुरळ घालतचं पण २-४ वर्षाकरीता म्हणुन गेलोलो आपण नकळत कधी तिकडेच स्थिरावतो हे आपलं आपल्याच कळत नाहि. दर वर्षि भारतवारी केली कि ईथे बोकाळणारा भ्रष्टाचार, गलिच्छपणा, गर्दि, रोजच्या नोकरीसाठि होणारी धावपळ, दगदग पाहिली कि सध्या आहोत तिथे बरे आहोत, पुढे बघु हा विचार नकळत दृढ होत जातो.
पण त्याच बरोबर आपली संस्कृती, आपले सणवार, ती मातीत खेळण्याची मजा, ती होळीची बोंब ई.
मिसळपाव