Skip to main content

स्वदेशात/परदेशात नोकरी न करण्याची खंत जाणवते का?

लेखक दिपक.कुवेत यांनी बुधवार, 24/07/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कामानिमित्त आपण जगभर विखुरलेले असतो. परदेशातील नोकरी स्वीकारताना तिथली सुबत्ता, आर्थिक स्थैर्य, स्वच्छता, कमी भ्रष्टाचारपणा हे तर भुरळ घालतचं पण २-४ वर्षाकरीता म्हणुन गेलोलो आपण नकळत कधी तिकडेच स्थिरावतो हे आपलं आपल्याच कळत नाहि. दर वर्षि भारतवारी केली कि ईथे बोकाळणारा भ्रष्टाचार, गलिच्छपणा, गर्दि, रोजच्या नोकरीसाठि होणारी धावपळ, दगदग पाहिली कि सध्या आहोत तिथे बरे आहोत, पुढे बघु हा विचार नकळत दृढ होत जातो. पण त्याच बरोबर आपली संस्कृती, आपले सणवार, ती मातीत खेळण्याची मजा, ती होळीची बोंब ई.

अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 24/07/2013 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती छोट्याश्या अंधाऱ्या खोलीत, काही कुरबुर चालू होती काळ्या अंधारात दुर्बुद्धीने, विवेकावर मात केली होती ll १ ll कापसावाणी मऊ पाऊले, तिथेच बांधून घातली होती हातांची ती कोमल पर्णे, बेडीमध्ये अडकवली होती ll २ ll चंद्रावाणी नितळ चेहरा, सशावाणी पिटुकले डोळे अंधश्रधेच्या विखारी बुरख्याने, मिटून झाले भळभळलेले ll ३ ll काहीच घडले नव्हते, काही अस्तित्वातच आले नव्हते एका गोजिऱ्या निष्पाप जीवावर,काळे सावट घेरले होते ll ४ ll कुणाची तरी गाढवी बुद्धी,गैरसमजाचे ओझे वाहत होती मायेची भक्कम गोधडीच, उबेऐवज

प्रलायानंतरची प्रार्थना

लेखक गोरा सौमित्र यांनी बुधवार, 24/07/2013 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
चार भिंतींच्या आत माझ्या शब्दांचा मार ती निशब्दतेने सहन करत होती. प्रत्येक शब्दाच्या प्रहाराने तिच्या अखंड तपश्चर्येचा बांध फुटतो की काय?? त्या चार भिंतींच्या पोकळी मध्ये आभाळ दाटून आलेलं मला साफ जाणवत होतं. अशा वातावरणामध्ये माझ्या शाब्दिक विजेचा ताल बेताल झाल्यावर क्षणात वादळी बरसात होणार. अवकाशाच्या कुरुक्षेत्री जेव्हा समोरचा (प्रकाश) अस्तित्वाची लढाई हरू लागतो तेव्हा माझ्या आत्मकेंद्रित मनाच्या कोपर्‍यामध्ये लपलेला अहमभाव स्वतहाचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी तिच्या जाणिवेच्या वास्तूला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो.

विरंगुळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 24/07/2013 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
नाते नाही मीच एकला श्वासांमधुनी नाद ऐकला कान्हा कान्हा बोले राधा तूच आसरा तू विरंगुळा कोषामधले उमलू पाहे गंध आतला दाटुन आला भेद तरी पण इथला तिथला तूच आसरा यू विरंगुळा मंद कशी ही झाली मेधा अंध मती पथभर मन बाधा न कळे कोणी का लपलेला तूच आसरा तू विरंगुळा ........................अज्ञात
काव्यरस

संपर्क ईश्वराचा

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 24/07/2013 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
अवघड आहे ....कलियुग आहे बाबा.........असले शब्द आजकाल फार कानावर पडत आहेत. कारण तसेच आहे; जिकते तिकडे बजबजपुरी माजल्यासारखी वाटते, बारीक सारीक गोष्टींमध्ये माणसाचा तोल ढळलाय आणि अजून ढळत चालला आहे असे स्पष्ट दिसते. कलियुग विक्षिप्तपणे ब्रह्मदेवांसमोर नाचत आले तेंव्हा त्याने विधान केले होते कि, जे लोक कलियुगात देखील परमेश्वराचे चिंतन स्मरण करतील, आणि जे सत्याची कास धरून जगतील, त्यांच्या वाटेला मी जाणार नाही. हे वाक्य खूप साधे सोपे वाटते ऐकायला, पण नक्की काय करावे हे समजत नाही. सत्याची कास; चांगले वागणे म्हणजे नक्की काय?, याच्या व्याख्या आपण कशा आणि कुठल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर करणार?.

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०५ : पहिली महाआपत्ती आणि दुसर्‍या सफरीची सुरुवात (११५,००० ते ७५,००० वर्षांपूर्वी)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 23/07/2013 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

मोठीशी आरोळी

लेखक वैभव कुलकर्नि यांनी मंगळवार, 23/07/2013 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
मोठीशी आरोळी कोण मारतुया वर. यमाचा आवाज , मला कळली झालर. माझे-माझे आता कोण,सग-सगळे लांबरे. कोणीतरी म्हणेल आता नकोस जाऊरे. अंधार होताहोता,निजू लेगेल झापड. गालाचेही आता होऊ लागेल खापड. किती आले किती गेले याची यमाला कल्पना. आज मला न्यायचे ,त्याने ओकली वल्गना. रेड्यावरती स्वारी बसत, माझ्याकडे आली. रेड्याचे ते डोळे बोले , मित्रा आज तुझी पाळी. चल षडा माझ्याबरोबर,वेळ संपलाय तुझा. पाशवाच्या बंधनातील खेळ संपलाय तुझा. रडारडे होईल मुक्त हंबरडे फुटतील. हातातील हिरवे चुडे, हातात तुटतील कपाळाचे नागडेही आता विद्रूप दिसेल.

नौस

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 23/07/2013 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
म्या सक्काळी उटायच्या आदीच आण्णा कुटतरी जातेत. आज सांजच्याला आले तवा हासत व्हते. म्हन्ले, “आन्जाक्का, उद्यापासून आम्ही पण तुमच्या शाळेत येणार बरं का!” ह्ये काय ल्हान नाईत. उगा कायबी बोल्तेत. “तुमास्नी गुर्जी घ्येणार नायती,” म्या बोल्ली. आण्णा हस्ले. म्हन्ले, “हेडमास्तर आहे मी...”. बाबौ! आता कायबी कराया येतंय. कुणाची टाप नाय भांडायची. गुर्जीबी वरडायचे न्हाईत. मज्जा. पन आण्णांचं कायतरी येगळंचं सुरु. अब्यास कर, सुद्द बोल, भांडू नको, श्या दिऊ नको, पाडे म्हन. अकशर चांगलं कहाड. गंपतीचं भजन म्हन. घरात आय, साळंत हे.

बाप.....उर्फ़ वडिल ....!!!!!

लेखक DTPS यांनी मंगळवार, 23/07/2013 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरील माझे हे पहिलेच लिखाण, चूक भूल माफ असवि. च्याइला आई आणि मुलाच्या नात्या बद्दल सगळेच लिहितात, पण बाप आणि मुलाच्या नात्याच काय हो …। आईशी असलेला नात,ओढ जगजाहीरच कि हो, पण बापाच्या नात्याशी असलेली घट्ट विण कोण जाने….

हिन्दू धर्म म्हणजे काय ?

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 23/07/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात श्री. विजुभौ च्या वारीच्या धाग्यासंदर्भात हा विषय आलेला होता पण सांगोपांग चर्चा झाली नाही. म्ह्णून तिथे टंकलेलेच इथे पुन्हा लिहित आहे. मिपाकर जरुरीप्रमाणे भर घालतील. माझ्या मते खालील बाबी हिंदू धर्माची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. १. कर्माचा सिद्धांत २. पुनर्जन्म ३. अन्तिम सत्य एकच आहे . ( GOD IS ONE and not GOD ARE ONE ) या प्रत्येक मुद्द्याचा ऊहापोह करता येईल पण तो अनेक्वेळा येथे झाला आहे. हे सारे मुद्दे परस्परपूरक आणि एकमेकांत कमालीचे गुंतलेले आहेत. या वरील तीन बाबींना केन्द्रीभूत ठेऊन उभी राहीलेली सर्वंकष जीवन पद्धती म्हणजे हिंदू जीवन पद्धती !