Skip to main content

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 20/08/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित ! डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

संस्कृती

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 20/08/2013 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृती जाहली मरणप्राय जगवणारी तुरळक गणती मेली संस्कृती केंव्हाच सर्वत्र जाहिरात होती ll १ ll संपली, काळवंडली संस्कृती उजळवणारी तजवीज थोडी गाडून टाकणारी तिजला गर्दी संपत नव्हती ll २ ll जमवाया लोक जागृतीस मित्रास कळविला मोर्चा बघू उद्या म्हणाला दुरूनच हात केला ll ३ ll दुष्परिणाम कथित प्रगतीचे तुडवीत संस्कृती होते मात्र लोकांना याचे अप्रूप काहीच नव्हते ll ४ ll रक्षणास बोलावता आले उपायास नव्हते विकृतीचे बसता फटके ते मोर्चात सामील होते ll ५ ll

सलमानभाऊ, लई भारी!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 20/08/2013 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या "लई भारी' या आगामी चित्रपटातून सलमान खान मराठीत पदार्पण करणार आहे. सलमानच्या कुठल्याही चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही दोनशे कोटींचा गल्ला जमवेल आणि सलमानला चित्रपटात घेण्यासाठी मराठी निर्मात्यांच्या रांगा लागतील, अशी शक्‍यता आहे. सलमानच्याच अनेक हिट हिंदी चित्रपटांवरून मराठीत रिमेक करता येऊ शकतो. काही उदाहरणं ः -ं पहिलं लफडं (मैंने प्यार किया) -लव्हरनं मारली टांग! (सनम बेवफा) -किरण्या-अज्या (करण अर्जुन) -घ्या मुका ः पार्ट 2 (खामोशी) -व्यक्ती तितक्‍या प्रकृती (अंदाज अपना अपना) -लफडी करणाऱ्या सगळ्यांसाठी (हर दिल जो प्यार करेगा) -तुझा-माझा काय संबंध?

बिनकांद्याचा श्रावण

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 20/08/2013 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
""आई, नक्की काय झालंय? बाबा चिडलेत कशानं एवढे?'' ""सांगते नंतर.'' ""अगं, सांग ना. आमच्यावर रेशन निघायच्या आधी त्याचं कारण तर कळू देत.'' ""बोकडाच्या मानेवर सुरी फिरवायच्या आधी त्याला सांगतात का, की बाबा गेल्यावेळी तू एकदा मला ढुशी दिली होतीस, म्हणून तुला कापतोय...?'' सौं.चा युक्तिवाद पटण्यासारखा होता. ""अगं आई, पण...'' कु. काहीतरी बोलणार, एवढ्यात श्री. फ्रेश होऊन हॉलमध्ये आले. त्यामुळे कु.नं तिचे पुढचे शब्द गिळले.

गेम कुणाचा होणार ?

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 20/08/2013 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागे म्हटल्याप्रमाणे २०१४ च्या निवडणूकीचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. सर्वच आघाड्यांवर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मागील कित्येक वर्षात देशपतळीवर प्रभाव टाकेल असा खासदार पुण्याने दिलेला नाही. तरीही पुण्याची निवडणूक अनेक कारणांनी गाजते. यंदाच्याही निवडणूकीबाबत अशीच उत्सुकता आहे. कोण कोण आहेत इच्छुक ? त्यापूर्वी हे जरूर पाहावे यापूर्वीच्या गेम्स

भ्रमंती : यमाई देवी मंदिर, औंध संस्थान

लेखक स्पा यांनी सोमवार, 19/08/2013 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रगुप्त यांनी सुरु केलेल्या चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी धाग्यामुळे पाच सहा महिन्यांपूर्वी साताऱ्याजवळील औंध येथे केलेल्या भ्रमंतीची आठवण झाली .
औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्रीमूळपीठ देवीचे जागृत स्थान आहे.

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (१)

लेखक शिवोऽहम् यांनी सोमवार, 19/08/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================================== आंतरजालावर असलेल्या अनेक स्रोतांवर हे लेखन आधारित आहे. येणारी वळणं, त्यांचा क्रम, किंवा कमी-अधीक गडदपणा माझा म्हणावा. संदर्भ आणि स्रोत शेवटी देईन म्हणतो. =============================================================================== पियुष मिश्राबद्दल बरंच बोलता येईल. पण आधी ताजी ओळख.. आजकाल बर्‍याच चित्रपटातुन दिसतो. वासेपुर १ आणि २ मध्ये नासिरचा रोल केलाय त्याने. वासेपुरच्या लंब्याचवड्या श्रेयनामावलीत कदाचित सुटुन जात असेल हे नाव पण नासिरचे कॅरेक्टर लक्षात रहातेच.

यात्रा जत्रा काल आणि आज

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी सोमवार, 19/08/2013 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू मधील सैन्य छावणीत (Caluchak) एक रात्र राहण्याचा योग २००२ साली आला होता. तेथील सर्व धर्म पार्थना स्थळ विशेष लक्षात राहिले ते तेथे भेटलेल्या एका धर्मगुरू मुळे. आज उत्तराखंड मधील आपत्ती नंतर त्यांची पुन्हा आठवण झाली. आमच्या अमरनाथ यात्रेला शुभेच्या देताना त्यांनी जे प्रबोधन केले तसे प्रबोधन भारतातील कोणी धर्मगुरू करेल का? काय सांगितले होते त्या अवलियाने ? भारत हा यात्रेकरूंचा देश आहे , प्रसार माध्यमे जेव्हा उपलब्ध नव्हती तेव्हा या यात्रांना खूप महत्व होते. या यात्रा म्हणजे समाज जोडण्याचे एक महत्वाचे साधन होते. संत महंतांनी संपूर्ण देशाची परिक्रमा करून का देश जोडला होता.

मला झोप हवी

लेखक वैभव कुलकर्नि यांनी सोमवार, 19/08/2013 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणल आज जरा शांत झोपावे पण छे झोपेण नाकच मुरडले आहे आताशा. बहुतेक डोळ्यावरची बुबुळ रुसलीत माझ्यावरती ...... आतल्या बाहुल्या नुसत्याच फिरत आहेत इकडून तिकडे एखाद्या निशाचरासारख्या आणि हि रात्रही काही थांगपत्ता लागून देत नाही.. मी रात्रीला विचारल , काही चुकलं काय माझे असा हा का आसूड या डोळ्यावरती नेहमीप्रमाणे उत्तर काही मिळाले नाही ...फक्त एक करडा कटाक्ष्य आणि उजव्या काखेत माझ्या झोपेला घेऊन ती देसिनाशी झाली... मग परत मी परत काहीतरी शोधत शून्य नजरेने त्या भिंतीकडे बघत गरगरणा-या पंख्याला सोबत घेऊन ...... मग मी पापणीच्या टोकाला थोडे बाहेर ओढत डोळ्यावरती झापड टाकायचा प्रयत्न केला , पण त्या पाप

रानपाखरं...

लेखक psajid यांनी सोमवार, 19/08/2013 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
बांधलं मचाण वर गाण्यात गळा, मधुरता मंधी दुमला शेतमळा !! येऊन चोर जोंधळ्यात दडं, शिवार टिपीत चाललीत पुढं !! भिरभिरली गोफण सुटला दगड, चोर जोंधळ्यात त्येनं केलं उघड !! का म्हून सतावता सुखानं जगू द्याव, किती सोसलं पिकासाठी तुम्हा ते नाय ठावं !! घरी तान्हं ठिवून आलिया राखणीला, सोनं ठिवलं तरच वरीसभर पीठ भाकरीला !! मला पीठ भाकरीला !! श्री. साजीद यासीन पठाण