Skip to main content

एका संस्थेची पन्नास वर्षे...

लेखक खेडूत यांनी शनिवार, 07/12/2013 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
. तसे एखाद्या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण होणे आता विशेष वाटत नाही. अनेक संस्थांनी शंभर किंवा दीडशे वर्षे पूर्ण केल्याचे आपण वाचत असतो. इतकेच काय आता आयटी कंपन्या पण रौप्य महोत्सव करू लागल्यात. पण हा कालखंड खरे तर सापेक्ष असतो. कुठल्या परिस्थितीत ती संस्था सुरु झाली, कशी चालविली आणि आता कशी आहे, यावर बरेच अवलंबून असावे. आमचे पहिले-वहिले महाविद्यालय म्हणजे लातूरचे शासकीय तंत्रनिकेतन. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन (पी. एल. जी.

शोध स्वत्वाचा

लेखक आतिवास यांनी शनिवार, 07/12/2013 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
१९६७ ची गोष्ट. एका वीस वर्षांच्या मुलीचं लग्न. मागणी मुलाने घातलेली. मुलगी मंगलोरची; मुलगा मुंबईचा. टाटा कंपनीतला पगारदार. मुलीला वडील नाहीत. विधवा आईच्या पदरी पाच मुली. मुलगा “हुंडा नको” म्हणतो – ही आणखीच चांगली गोष्ट. मुलाला आणखी नऊ भावंड आहेत. लग्न होतं. पहिल्यांदा जेव्हा नवरा “मी तुला मारेन” म्हणतो, तेव्हा तिला “तो गंमत करतोय” असं वाटतं. पण नवरा खरंच मारहाण करायला लागतो तिला. अगदी नेहमी. कारण? काहीही. कारण असो वा नसो – मार ठरलेला. कधीही, कसाही. कधी हाताने, कधी हाती लागेल त्या वस्तूने – लाकडी हँगर, पट्टा ... तिचा दम्याचा विकार उफाळून येतो या ताणाने.

बंड्याचे बुद्धिबळ

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शनिवार, 07/12/2013 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. मी माझ्या कुठल्याशा नातेवाईकांकडे काही दिवसांकरिता राहायला गेलो होतो. ज्या बिल्डींग मध्ये आमचे नातेवाईक राहत होते तिथे भरपूर मुले होती माझ्या वयाची. त्यात एक बंड्या नावाचा मुलगा होता. बंड्या तसा हुशार आणि बोलावागायला बरा होता. कधी कधी जरा तऱ्हेवाईक पणे वागायचा. एकटा आणि लाडावलेला असल्याने असेल कदाचित पण आपले तेच खरे करायची त्याला सवय होती. एकदा असेच गप्पा मारताना कळले की हा बंड्या बुद्धिबळ उत्तम खेळायचा म्हणे. नुसते उत्तम नाही तर पूर्ण सोसायटीत त्याला आजवर कुणीही हरवू शकले नव्हते.

सेन्टी - मेन्टी : वो शाम कुछ ...........

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 07/12/2013 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या पहाडावर, रणरणत्या उन्हात , पायी चालुन शरीर थकलेले असताना , त्याच पहाडावरच्या शिवालयात, नाजुक घंटानाद चालु असताना , फुलांचा सुंगध श्वासात शिरत असताना , पिंडीसमोरच्या , काळ्या कातळाचा पायाच्या तळव्यांना स्पर्श झालाय कधी ? कस वाटत त्यावेळी ? ती मनात येणारी भावना बोलुन लिहुन दाखवता येते ?? येईल ही कदाचित .......पण पुन्हा दुसर्‍या एखाद्या साध्याच मंदीरात गेल्यावर ती अनुभुती येते ? माझ उत्तर आहे ... नाही !! पण मन मात्र त्या अनुभुतीच्या अनुभुतीसाठी कासावीस होतो का ?

वॉरेन बफे आणि आपण...

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शनिवार, 07/12/2013 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात कोणी कुणाचे आयुष्य विषयक तत्वज्ञान वाचून/ऐकून आपले आयुष्य तसे बनवू शकत नही असं आपलं मला वाटते.. आपण सगळेच जगतांना एका ट्राफिक जाम मधल्या ड्रायव्हर सारखे असतो...आपापले स्टीयारिंग सांभाळत... मुद्दा असा कि त्या वॉरेन बफे चे काही मौलिक विचार मधून मधून धडकत असतात आणि बरेच जन आपण असे का केले नही म्हणून दुखी होतात.. त्यातील काही विचार आणि माझ्या प्रतिक्रिया १.त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखील आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे. अत्रंगी म्हणे >> म्हणजे?

Burrito Bowl

लेखक wrushali kulkarni यांनी शनिवार, 07/12/2013 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदिवसापासून नवरा मागे लागलेला की तू तुझी रेसिपी मिसळपाव वर लिही.पण लिखाण आणि वाचन याची मला फार आवड नसल्याने मी टाळाटाळ करत होते.पण त्यांच्या आग्रहाखातर ही माझी पहिली रेसिपी तुमच्यासाठी. 'Burrito Bowl' ही एक Mexican dish आहे.

डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स

लेखक Atul Thakur यांनी शुक्रवार, 06/12/2013 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरीला “बुद्ध कि मार्क्स” नावाचा निबंध लिहुन मार्क्सवादाबद्दलचे स्वतःचे विचार नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. त्यामुळे काहिंची कुचंबणा झाली. विषेशतः दलित मार्क्सवाद्यांची अवस्था कायमस्वरुपी दयनिय झाली. खरंतर तसं होण्याची गरज नाही. ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही. पण नेमकी समस्या येथे आहे. एका पोथीत सारे काही आहे. संपुर्ण जग बदलण्याची कुवत आहे.

एकमात्र

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 06/12/2013 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गम घाटातील अरुंद वाटा, कठीण चढ अन खडकाळ जमिनी वरून तोल सांभाळत चालतांना जनावरे दमुन जात, सर्वांगातून घामाच्या धारा लागत, अतिश्रमाने जनावरांचे तोंड फेसाळून येई, जनावर अतिशय गलितगात्र होऊन जाई. भूताच्या फे-यावर पोहोचल्या वर मी मी म्हणणा-या निधडया छातीच्या गाडीवानांच्या काळजातही धस्स झाल्याशिवाय रहायचे नाही. घाटातील ह्या दोन वळणात उंचच उंच कड्याकपारीं अन खोल खोल द-या खो-यातून घोंगावणारे वारे, घनदाट झाडीतील पानांची सळसळ, दूरवर कोसळत असलेल्या धबधब्याचा आवाज ह्या सगळ्यांनी अनेक स्पंदने निर्माण होत. अशी स्पंदने आणि छाया प्रकाशाचा खेळ भूताच्या फे-यात जरा जास्तीच गूढरम्य विभ्रम निर्माण करीत असे.

नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 06/12/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचय - नेताजींचे सहवासात भाग २ .. भाग 2 प्रस्तावना - ... पु. ना. ओकांच्या नेताजींचे सहवासात पुस्तकाचा मुकुटमणी आहे प्रकरण १० हे. त्यात बाबत प्रस्तावनेत तिखट उल्लेख आहे. ‘इसापनीती, पंचतंत्र अथवा हितोपदेश इत्यादि ग्रंथ जसे काऊ-चिऊच्या गोष्टी सांगण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाहीत तद्वत प्रस्तूत ग्रंथही केवळ मनोरंजनासाठी लिहिलेला नाही.

~देवा आता हार मान तू~

लेखक वैभवकुमारन यांनी शुक्रवार, 06/12/2013 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
~देवा आता हार मान तू~ देवा आता हार मान तू बघुनी खालचे तांडव सारे दिलास जन्म मानवास तू पण झाले सगळे वानर साले उभा केला तुला देवळात अन उद्बत्तीचे सुवास वारे तुझ्याच पायावरती सजले मांसाचे ते ढेर सारे तुला छीनले दगडातुनी अन तुझे कोरले देह सारे हाती चिपळ्या नास्तिकांच्या मुखी मात्र तुझे नाव रे उद्गाता तू चराचराचा उरी तुझ्या हा विश्व भार रे तुला जमीनीत गाढण्याआधी देवा आता तू खाली धाव रे देवा आता हार मान तू गेले अस्तित्व राहिले नारे गाभारेही वाहून जातील वाहण्याआधी तू खाली धाव रे ~वैभव कुलकर्णी ~