Skip to main content

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - २

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 12/03/2014 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
  हिलरी आणि तेनसिंग्च्या काळात आणि नंतरही अनेक वर्षे काठमांडूहून एव्हरेस्ट बेस कँपपर्यंतचा ट्रेक ३१ दिवसांचा असे. अनेक लहानमोठ्या खेड्यांतून वाट काढत आणि पहाडातून उंच चढत ही वाट एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोहोचते. आता मात्र काठमांडू ते लुकला पर्यंत विमान अथवा हेलीकॉप्टरने जाता येते. अर्थात हे सर्वस्वी काठमांडू आणि लुकला इथल्या हवामानावर अवलंबून असते. लुकला समुद्रसपाटीपासून २८६० मी ( ९३८३ फूट ) उंचीवर वसलेले लहानसे खेडेगाव आहे. लुकला पासून दुधकोसी नदीच्या काठाने फकडींग आणि तिथून नामचे बाजार ( उच्चार : नामचे बझार ) हे नेपाळमधलं शेर्पांचं सर्वात मोठं गाव गाठण्यास दोन दिवस लागतात.

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - १

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 12/03/2014 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
माउंट एव्हरेस्ट ! पृथ्वीच्या पाठीवरचं सर्वात उंच गिरीशिखर असलेल्या एव्हरेस्टचं आकर्षण जगभरातील सर्वच गिर्यारोहकांना असतं. १९२२ सालच्या पहिल्या एव्हरेस्ट मोहीमेपासून आजतागायत अनेकांना त्याचा मोह आवरता आलेला नाही. या वेडापायी कित्येकांनी आपले प्राण गमावलेले आहेत, कित्येकजण हात-पाय गमावून कायमचे जायबंदी झालेले आहेत, पण तरीही त्याचं आकर्षण अबाधित आहे. गेल्या काही वर्षांत गाईड आणि शेर्पांच्या संगतीने गिर्यारोहणाचा फारसा अनुभव नसलेले अनेक लोकही एव्हरेस्टवर जाऊन पोहोचले आहेत. एकप्रकारे एव्हरेस्टचं हे व्यावसायिकरणच आहे. पर्वतावर कोणतंही संकट कधीही उद्भवण्याची शक्यता असते.

मृगगड - उंबरखिंड - भाग २

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 11/03/2014 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग एक इथे वाचा. त्या घराच्या बाजुलाच एक हातपंप होता. तिथे चार पाच जणींची कपडे, भांडी धुण्याची लगबग चालू होती. गावात लग्न असल्यामुळे सणाचं वातावरण होतं. मी बसलो होतो त्या घराच्या समोरच डीजेची गाडी सजवून ठेवलेली होती. जेवणं नुकतीच आटपल्याने बाजूला असलेल्या मांडवात पुरुष मंडळी सुस्तावलेली होती, गप्पा चालू होत्या. ‘मावशी बसू ना इथे?’, कपड्यांची बादली घेऊन मी बसलेलो त्या घरात जाणा-या मावशींना मी विचारलं. ‘बस की रे बाबा! बस बस’ प्रेमाचं उत्तर आलं. काही मिनिटं माझा डोळा लागला. अतिशय शांत वाटत होतं.

भरतपूरचा मस्त सीझन!

लेखक चलत मुसाफिर यांनी मंगळवार, 11/03/2014 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
केवलादेव अभयारण्य, भरतपूर म्हणजे पक्षीनिरीक्षकांसाठी स्वर्ग. यावर्षी आम्हाला ऐन जानेवारीमध्ये भरतपूर सहल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. एक सेशन सायंकाळी आणि एक सकाळी करता आले. सीझनदेखील या वर्षी उत्तम होता. पत्नीची भरतपूरला जाण्याची ही पहिलीच खेप होती. शिवाय नवा महागडा कॅमेरा होता (हे वाक्य आवर्जून लिहिण्याची प्रेरणा 'मुक्तपीठ'पासून घेतलेली आहे!). त्यामुळे तिने दे धमाल फोटो घेतले. त्यातल्या काहींचा कोलाज इथे टाकत आहे. Bharatpur 1 पूर्वी हे अभयारण्य नव्हते.

तुझे युद्ध हे छान समृद्ध झाले

लेखक drsunilahirrao यांनी मंगळवार, 11/03/2014 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
फुटे दुःख भवती, गळे रुद्ध झाले तुझे युद्ध हे छान समृद्ध झाले रणीँ हासुनी बोलले जे महात्मे जरा टोकता मी किती कृद्ध झाले किती सर्वव्यापी तुझा न्याय होता मुले जायबंदी, लुळे वृद्ध झाले चिता जाळण्याची नको आज चिँता पहा लोक सारे इथे गृद्ध झाले किती हाय करुणे तुझा बोलबाला कसाई जुने ते अता बुद्ध झाले तुझा यद्न्य हा छानसंपन्न झाला बलीदान माझे पहा शुद्ध झाले तुझ्यावीण नाही इथे बुद्ध हसला तुझ्यावीण केव्हा इथे युद्ध झाले डॉ.सुनील अहिरराव

चला, असाही एक वाढदिवस...

लेखक अजय जोशी यांनी मंगळवार, 11/03/2014 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचे उठणे रोजचे आवरणे रोजचे तेच तेच करणे आजही तसेच....? चला..., असाही एक वाढदिवस... सकाळपासून जुंपलेला.... उन्हातान्हात राबलेला... ठिकठिकाणी रापलेला... ओथंबून वाहिला आजही.... चला.., असाही एक वाढदिवस...

आई म्हणोनी..

लेखक rakhee यांनी मंगळवार, 11/03/2014 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
आई म्हणोनी.. पिल्लू आज आजारी आहे ,त्यामुळे घरीच आहे शाळेत गेले नाही . मुलं आजारी असली कि कसतरीच होतं नाही ? रोज दंगा मस्ती करून आपल्याला त्रास देणारी , खूप बडबड करणारी मुलं आजारात गुपचूप निजून पडली असली कि आत काहीतरी तुटतं . काहीच सुरळीत वाटत नाही . बस आपलं बाळ लवकर हसत खेळत होऊ दे अशी प्रार्थना मन करू लागतं . ज्याच्या बडबडीचा आपल्याला त्रास होऊन आपण म्हणतो अरे बस कर आता , तीच बडबड पिल्लू लवकर करावं म्हणून आपलं मन धडपडू लागते . प्रत्येक पालकाचा हाच अनुभव असेल हो न ? किती गोड असतं नाही त्याचं बोलणं , निरागस हसणं बघतच रहावं असं . माझ्या पिल्लांनी मला खूप काही शिकवले .

शाक भाजी (वांगी,बटाटा चना भाजी )

लेखक आरोही यांनी मंगळवार, 11/03/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
'शाक भाजी ' नाव वाचून काही जणांना कळले नसेल काय प्रकार आहे तो ,पण हा वांग्याचा अत्यंत साधा पण चवदार असा प्रकार आहे ,तसे याला शाक भाजी का म्हणतात हे मला देखील ठाऊक नाही मी माझ्या एका मावशीच्या घरी हि भाजी खाल्ली होती आणि तेव्हापासून मला हि भाजी खूप आवडते ती तेव्हा या भाजीचे नाव शाक भाजी असेच म्हणाली होती ,असो आपल्याला नावाशी काय करायचे आहे आपण भाजी कशी करतात ते बघुयात ... साहित्य : ४ वांगी,१ बटाटा ,१ टोमाटो,५-६ कढीपत्ता पाने ,वाटीभर उकडलेले चणे .२ लवंग ,४ काळीमिरी ,१,तमालपत्र .मीठ ,तेल ३ चमचे ,पाणी वाटणासाठी :एक ते दीड इंच आले,६-७ लसुन पाकळ्या ,१चमचा जिरे ,१ चमचा लाल तिखट ,अर्धा चमचा हळद,

लोकायत आणि चार्वाक

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 11/03/2014 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे की ज्यात वेद, परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे. शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद.