तीर्थजननी नर्मदामैय्या आणि मी.
खुपजण विचारतात नर्मदापरिक्रमा केल्याने काय वाटले, काय मिळाले. उत्तर आहे आत्मिक समाधान. जनतेत असलेली नर्मदेवरची श्रद्धा, असलेली सेवाभावी वृत्ती, माणुसकीचे दिव्यदर्शन, नर्मदाकिनारी असलेले अप्रतिम निसर्गसौन्दर्य, सुन्दर पक्षी, सायन्काळी प्रवाहात दिवे सोडल्यावर दिसणारे मैय्याचे काळी चन्द्रकळा सोनेरी किनारीची नेसलेले सुन्दर मनमोहक रुपडे.
प्रतिकुलता असतानाही माणसाने कसे आनन्दी रहावे, अडचणीन्वर मात करुन कसे जगावे, हे शिकायला मिळाले.
सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?
श्रीयुत सदानंद सुखात्मे उर्फ सदू, खरा मुंबईकर. सचिवालयात कार्यरत. मुंबईत सध्या अच्छे दिन आल्या नसल्याने, सदूची सुखाची नौकरी सुरु आहे. सकाळी ९ वाजता सदू घर सोडतो आणि सांयकाळी ५.३० वाजता पुन्हा घरात. अशी ८ तासाची सुख-चैनीची सरकारी नौकरी. खरोखरंच सदू नावाप्रमाणे सुखात्मे अर्थात सुखी आहे. सचिवालयातल्या इतर बाबूंप्रमाणे सदूला ही क्रिकेटचा भयंकर शौक. क्रिकेट वर ‘एक्स्पर्ट कॉमेन्ट’ देण्यात सदू स्वत:ला पटाईत समजत होता. कुठल्या खेडाळूने कसे खेळले पाहिजे त्याचे विशद वर्णन तो करत असे. इंग्लंड सिरीजमध्ये भारतीय टीमची दुर्दशा पाहून इतरांप्रमाणे तो ही दुखी होता.
एक लघुकथा.....अमान
माझ्या बापाचे नाव ‘नासिर’
माझे नाव बुलू. हे माझे लाडके नाव. खरे नाव माझे मलाच माहीत नाही.
आमच्या वस्तीचे नाव पुरा. नर्मदेच्या किनाऱ्यावर या वस्तीच्या आसपास आमच्या जमिनी होत्या. वस्तीवर दहा एक घरे असतील. एकूण लोकसंख्या असेल शंभर !
आब्बाचा मी खूप लाडका होतो. माझा भाऊ ‘अमान’ हा माझा लाडका होता. शेतात दिवसभर उंडारायचे आणि गिळायला घरी अम्माच्या मागे भुणभुण लावायची एवढेच काम आम्ही करीत असू. एकदा एका घोड्याला आम्ही विहीरीत पाडले पण कोणी आम्हाला रागावले नाही. आब्बाने तर माझ्या पाठीत लाडाने गुद्दा घातला. आमचे तसे चांगले चालले होते पण कसे त्याची आम्हाला कल्पना असायची कारण नव्हते.
पुण्यात काम करणाऱ्या "खेळघर " या संस्थेविषयी….
प्रिय मित्र,
सप्रेम नमस्कार.
पालकनीती परिवाराचे खेळघर वंचित मुलांच्या सर्जनशील शिक्षणासाठी काम करत आहे.सलगअठरा वर्षं, अनेक आव्हानांशी सामना करत खेळघराचं काम उभं राहिलं, पुढं गेलं. या वाटचालीत आपल्यासारख्या मित्र परिवाराचा फार मोठा वाटा आहे.
आज कोथरूडमधल्या लक्ष्मीनगरयेथील १५० मुलां-मुलींबरोबर खेळघराचं अर्थपूर्ण शिक्षणाचं काम जोमदारपणे चालू आहे. वस्तीतील शंभराहून अधिक मुलं-मुली आत्मविश्वासानं आपल्या पायावर उभी आहेत. प्रसन्न संवेदनशीलतेनं आयुष्य जगत आहेत.
मात्र हे काम लहानशा गटाचं आणि एकाच झोपडवस्तीतील मुला- मुलींबरोबर केलं जाणारं छोटेखानी काम राहिलेलं नाही.
मुळीच नाही
मुळीच नाही
शहाणेच सर्व जितके, तितका मुळीच नाही
वेडा असून तुमच्या इतका मुळीच नाही
सच्चा न मी तरीही, लुच्चा मुळीच नाही
माझे न जे तयाची, इच्छा मुळीच नाही
तत्वास जे न जपती, जपती कसे स्वतःला
स्वतःवरीच ज्यांची, निष्ठा मुळीच नाही
किती वेगळाच आहे, हा हर्ष तुझ्या डोळी
परका जरी न असला, सख्खा मुळीच नाही
त्या विठ्ठलास जातो भेटावयास जेंव्हा
माझ्या शिवाय तेथे दुसरा मुळीच नाही
पुढती कुणी कुणाच्या, मागे कुणी पडे
माझ्या समोर असली चर्चा मुळीच नाही
इच्छा मनात यावी, लावून वेड जावी
मग कोण काय म्हणतो, पर्वा मुळीच नाही
हा कोण रे समोरी, आहे अपूर्व माझ्या
या आरशात माझी, प्रतिमा मुळीच नाही
- अपूर्व ओक
काव्यरस
पेरू : भाग ५ : अल्टिप्लॅनो
विदेशातील प्रवासाचा महत्वाचा पैलू म्हणजे 'ब्रँड इंडिया'! जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा कळत नकळत आपल्या देशाचे आपण ब्रँड प्रमोटर बनतो. या संदर्भात बरेच अनोखे, कधी मजेशीर अनुभव आले. भारतीयांना तेथे सरसकट 'हिंदू' म्हणतात, आणि स्पॅनिशमध्ये ह उच्चाराचा लोचा असल्याने काहिसा 'इंदू' असा उच्चार करतात. आणि आपण पेरूविषयी जितके जाणतो त्याच्या कैक पटींनी अधिक ते भारताविषयी जाणतात.
जवाबदेही
शिवाशीव विस्मरणात गेली
वस्ती आता एक झाली
मनं तशीच राहीली
जातीभेदांनी विटाळलेली
उतरंड संपली, भिंती पडल्या
अजुन करतो जातीचा उपहास
हा 'भटक्या' तो 'मागास'
उच्चत्वाचा मिथ्या आभास
दोन अनोळखी भेटताना
नवीन ओळख होताना
आडनाव महत्वाचं वाटते
कारण त्याची जात सांगते
-- रसिया बालम
मिसळपाव