"पुरोहिताचे भूत"
एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात असतो..
स्वभाव भित्रा व कशाची तरी सारखी काळजी करणे असा त्याचा स्वभाव असतो...गरीब असल्याने लग्न हि लांबले होते..
शेवटी ग्रहमान उच्चीचे येते व वयाच्या ४०-४२ वर्षी लग्न होते...३ मुले होतात..
आधीच गरिबी त्यात पोरवाडा या मुळे प्रापंचिक ओढाताणीने तो जेरीस आला असतो..व त्यांतून आपले पुढे कसे होणार या काळजीने तो खंगू लागतो..
त्यातच तो आजारी पडतो..अन बिछान्यावर पडल्या पडल्या व अश्या आजारात जर माझा मृत्यू झाला तर बायका पोरांचे काय होणार या विचाराने त्याच्या काळजात धडकी भरते..आजारातून बरा होतो पण काळजी काही पाठ सोडत नाही.
त्याचा त्याच गावत एक जिवलग मित्र रहात असतो...तो मित्र
मिसळपाव
कातरवेळ झाली अन सकाळपासून तिच्या मनी दाटलेल्या हुरहुरीने आणखीनच उग्र रूप धारण केले. आज दिवसभर त्याचे दर्शन नाही. नित्यकर्मे करताना मनाची तहान वाढतच गेली. अन आता संध्याकाळी त्या व्याकुळतेने पुरते पिसे लावले.
अंधार दाटला, तसे राधेला काही सुचेना. शामसुंदर, श्रीहरी, कृष्ण काळा, कान्हा, मुरारी, मुकुंद, गोविंद, माधव, मिलिंद सगळी नावे आलटून पालटून घेऊन झाली. त्याची लोभस रूपे मन:चक्षुंनी हजार वेळा न्याहाळली.