Skip to main content

कोकणातली भुतं

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 07/09/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण, या नावात भरपूर काही साठवलय. त्या महासागरांच्या पोटात ज्या गोष्टी दडल्यात ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी आमच्या कोंकणात आणि इथल्या माणसांमध्ये दडल्यात. आता कोकण म्हणजे नदी नाले डोंगर दऱ्या हे सगळं आलंच पण या सगळ्याबरोबर एक इनबिल्ट गोष्टंसुद्धा येते ती म्हणजे कोकणातली भूतं. लहानपण गेलं ते यांच्या गोष्टी ऐकण्यातच आणि अनुभवण्यातपण त्यातलेच काही मोजके गमतीदार किस्से खाली दिलेत. रात्रीची वेळ होती आणि अचानक वीज गेली. आता कोकणात पाऊस कधी पडेल आणि वीज कधी जाईल याचा काही भरवसा नसतो. तर उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे लगेचच घामाच्या धारा लागल्या.

आदि कैलास, ॐ पर्वत दर्शन यात्रा, पार्वती सरोवर परिक्रमा. भाग - ११

लेखक खुशि यांनी रविवार, 07/09/2014 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
बारावा दिवस. १४ किमीवरील जॉलिंगकाँग; म्हणजेच आदिकैलास-पार्वती सरोवर. उंची १५,७०० फूट. आधी चहा, नंतर बोर्नव्हीटा आणि आलूपराठ्यांचा नाश्ता करून सहा वाजता निघालो यात्रेच्या सांगतेकडे. वाटेत दोन ग्लेशियर पार करावे लागले, पण आता आम्ही अनुभवाने शहाणे झालो होतो. अगदी सहज पार झालो. कठीण चढ-उतार आहेत, पण फुलांच्या गालिच्यांचे सान्निध्य थकवा जाणवू देत नाही. पहाडाच्या भिंतींवर छोटी छोटी बिळे बनलेली पांडेजीनी दाखवली. जोरात वारा वाहतो, त्याच्या घर्षणाने अशी बिळे तयार होतात, असे म्हणाले पांडेजी. या बिळांमध्ये पक्षी घरटी बनवतात. आम्हांला त्या बिळांतून ये-जा करणारे चिमुकले पक्षीगण बघायला मिळाले.

विवाह मुहुर्त

लेखक भिंगरी यांनी रविवार, 07/09/2014 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ठरले कि लग्नाचा मुहूर्त पाहीला जातो. तो मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का? मला यातले काही कळत नाही म्हणून जाणून घ्यायचे आहे कि मुहूर्त का पहिला जातो? खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का? (हं आता लग्न लागायला उशीर झाला तर जाणाऱ्या पाहुण्यांची पंचाईत होते हा भाग निराळा.) साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का? (प्रेमविवाहात तर या गोष्टी सहसा होतंच नाहीत.) भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का? या विषयावर शास्त्रोक्त माहिती कोणी देईल का?

आठवणी

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 07/09/2014 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एका संध्याकाळी आपल्या गच्चीवर बसलो होतो. सूर्याचं बहुतेक उत्तरायण सुरु होतं. मी इथे दीड वर्ष होतो. दिवस कसे झपकन निघून गेले समजलंच नाही अगदी त्या बुलेट ट्रेनसारखे. कितीतरी आठवणी आहेत ज्या मनावर कायमच्या कोरल्यात. ७.११.११ सकाळी माझा interview होता. जरासा उशीरच झाला. भरपूर कसरत करून हिंजवडीला पोहचलो. सरांना भेटायचं होतं. समोरच कंपनी दिसत होती. एक कामगार भलं मोठं पोट पुढे काढून त्या भल्या मोठ्या दरवाजात उभा होता. पहिला राउंड सरांनी घेतला, नंतर कंपनी मालकांनी बोलावलं आणि म्हणाले " आमच्याकडे दोन काम आहेत एक म्हणजे project आणि दुसरं म्हणजे panel manufacturing.

सरडा- काही क्षणिका काही म्हणी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 07/09/2014 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे. (१) जेंव्हा त्यांच्या झाडावर होता तेंव्हा सरडा भ्रष्टाचारी होता. जेंव्हा सरडा अमुच्या झाडावर आला आमच्याच सारखा इमानदार झाला. (२) जिभेच्या स्वाद पायी मधुर फळांची मैत्री जोडी. अहंता स्वताची त्यागुनी सरडा झाला रंगनिरपेक्षी. काही म्हणी:
  1. जिथे सरडा, तिथे सत्ता
  2. उंदीर आणि सरडा, बुडते जहाज सोडती
  3. सरडा येई घरा, तोच दिवाळी दसरा
  4. सरड्याचे अनुकरण करा, सत्तेचे सुख भोगा.

तंत्रदर्शन-- १

लेखक शरद यांनी रविवार, 07/09/2014 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
तंत्र (भाग १) जगातील सर्वांत जास्त पुरातन, आजही जगभर, सर्व धर्मातील लोकांचा ज्यावर विश्वास आहे असे तत्वज्ञान कोणते असे विचारले तर याचे उत्तर आहे "तंत्र". विश्वात एक विशिष्ठ शक्ती आहे. काही तांत्रिक प्रक्रियांच्या (उदा. मंत्र, यंत्र, मुद्रा इ.) सहाय्याने या शक्तीस वश करता येते. ही वश झालेली शक्ती तुम्हास पंचमहाभूतांवर ताबा मिळवून देवू शकते व तुम्ही असाधारण कृत्ये करून दाखवू शकता असे हे तत्वज्ञान मानते. ही एक "यातु" विद्या आहे. यातु म्हणजे जादू. थोडक्यात तंत्र म्हणजे जादूटोणा. आता तुम्हाला पहिले वाक्य हास्यास्पद वाटेल. पण थोडे थांबा.

क्रांतिकारी जगपालट घडवून आणणार्‍या व्यापारी कंपन्या

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 07/09/2014 09:49 या दिवशी प्रकाशित केले.

क्रांतिकारी जगपालट घडवून आणणाऱ्या व्यापारी कंपन्या

माणूस भटकी जीवनावस्था सोडून एका जागी राहू लागला, शेती करू लागला. शेतीतून मिळवलेल्या अन्नाची साठवण केल्याने रोजची पोटासाठीची वणवण थांबली. मोकळा वेळ आणि साठवलेल्या अन्नामुळे सौदा करण्यासाठी आलेली ताकद कशी वापरावी याबाबत मानवाच्या सुपीक मेंदूने विचार सुरू केला नसेल तरच नवल. किंवा तसा विचार अगोदर केला म्हणून अन्नाची शेती आणि साठवण करण्याची गरज त्याला पडली असेल. कारण प्राचीन मानवांत प्रथम शेती आणि त्यामुळे एका जागेवर वस्ती असाच क्रम दर ठिकाणी होता असे दिसत नाही.

थोडे अद्धुत थोडे गूढ - ६

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 07/09/2014 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
१८५२ सालची गोष्ट.. लंडन शहरातील हाईड पार्क चांगलेच गजबजलेले होते. विविध प्रकारच्या इमारतींचे आणि बांधकामक्षेत्रातील तत्कालीन चमत्कारांचे मोठे प्रदर्शन तिथे भरले होते. अनेक प्रकारच्या बांधकामाचे लहान-मोठ्या आकारातील नमुने तिथे ठेवण्यात आलेले होते. चोखंदळ ब्रिटीश नागरीक प्रत्येक बांधकामाचं चिकीत्सकपणे निरीक्षण करत होते. मात्रं सर्वांची राहून राहून नजर जात होती ती मधोमध करण्यात आलेल्या एक मोठ्या बांधकामावर... १५२ फूट उंचीचा एक लोखंडी टॉवर! प्रदर्शनाला आलेले सर्वजण उत्सुकतेने त्या टॉवरचं निरीक्षण करत होते.

गव्हाची पोती

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 06/09/2014 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक वकील मित्र आहे त्याने सांगितलेला एक किस्सा एक न्यायाधीश महाराज असतात,,खादाड असतात पण फार चतुर.. त्यांचा एक विश्वासू किराणा दुकानदार होता मारवाडी समाजांतला. काम व्हावे म्हणून जी रक्कम ठरायची ति मारवाड्या कडे पोहोचती झाली की काम व्हायचे.. न्यायाधीश महाराज पण किराणा ध्यायच्या निमित्ताने दुकानात गेले की सांकेतिक भाषेत गप्पा चालायच्या.. नवीनं गहू आला की नाही दुकानात??? हो आला आहे ना ..