Skip to main content

पाकीट हरवते तेव्हा ......

लेखक विटेकर यांनी बुधवार, 17/09/2014 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
दि. १४ सप्टे. ला टि.म.वि. गुलटेकडी येथे काही कामानिमित्त गेलो होतो . दुपारी २ वाजता घरी आलो तर आपले पाकीट पडले आहे असा साक्षात्कार झाला ! पाकीटात ४-५०० रुपये , २ क्रेडिट कार्डे , २ डेबीट कार्डे आणि ड्रायविंग लायसेन्स असा ऐवज होता. भूक लागली होती म्हणून पहिल्यांदा जेवायला बसलो , जेवत असताना विटुकाकूने जे काही ऐकवले तेही निमूटपणाने गिळले. तिच्या मते मी ताबडतोब कार्डे रद्द करायला हवीत. मी शांतच होतो आणि पाकीट ज्याला सापडले ती व्यक्ती नक्की फोन करेल हा विश्वास होता. ( अशावेळी मी शांत असलो की विटुकाकू भयानक चिडते असा अनुभव असल्याने फक्त अस्वस्थ असल्याचे नाटक केले ) ..

निर्णय आणि नकारात्मकता....

लेखक वारा यांनी बुधवार, 17/09/2014 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
दैनंदीन जिवनात आपण छोटेमोठे अनेक निर्णय घेत असतो. जसे टुथपेस्ट पासुन ड्रेस वापरण्या पर्यंत. ऑफीसला निघायच्या वेळे पासुन परत घरी परत येई पर्यंत. रोजच्या गोष्टींसाठी सहसा निर्णय घ्यावे पण लागत नाहीत , ते सगळ आपसुखच होत. पण असा कधी विचार केलाय का की नेमकी तिच गोष्ट का केली जाते? अस काय कारण असत की आपण एक ठरावीकच टूथपेस्ट का वापरतो, दुसरी का नाही? किंवा आपण एक ठरावीकच रस्ता का वापरतो? दुसरा का वापरत नाही? किंवा एक ठरावीक टाईपचे ड्रेसिंग का वापरतो? हाच क्रायटेरीया मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा लागु होतो का? उदाहरणार्थ , आपण एका ठरावीक कंपनीत काम का करतो? किंवा एका ठरावीक शहरात का राहतो?

टोमॅटो बास्केट सलाद

लेखक जागु यांनी बुधवार, 17/09/2014 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
मायबोली.कॉम वर गणेशोत्सवा निमित्त आता कशाला शिजायची बात नामक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत माझ्या खालील कलाकृतीला प्रथम क्रमांकाचे पारीतोषि़ मिळून माबो मास्टर शेफ हा इ-अ‍ॅवॉर्ड मिळाला.

जेवणाची चव

लेखक कहर यांनी बुधवार, 17/09/2014 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची.

बाजार

लेखक संदीप डांगे यांनी मंगळवार, 16/09/2014 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा लेख फेब्रुवारी २०११ चा आहे. त्यामुळे त्या संदर्भाने वाचावा. काही बाबतीत माझी मते बदललेली असू शकतात. सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. कारण अजून तरी मी शिकणे आणि समजून घेणे थांबवले नाही ___________________________ अलीकडेच आपण एक जाहिरात बघितली असेल. कपड्याच्या दुकानात एक ग्राहक शिरतो. त्याला काही बोलू न देता दुकानदार धडधड आपल्या पसंतीचे कपडे त्याच्या अंगावर चढवून मोकळा. वरून सांगतो कि हेच तुम्हाला चांगले दिसेल. वर वर पाहता ती कंपनी आपल्याला सांगते आहे कि आम्ही तुमच्याशी असे वागत नाही. तुम्हाला हवा तो बुके आम्ही देऊ.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 16/09/2014 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४ च्या अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला या प्रश्नांवर काय वाटते आणि तुमचे अंदाज काय असतील हे जाणून घ्यायला आवडेल. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्‍यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट :) १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? ५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ?

“” प्रियेविण उदास वाटे आज “” ----- “”मेघदूत “” कविकुलगुरू कालिदासांची “आर्त विराणी”

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी मंगळवार, 16/09/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढ श्रावणाचे दिस, कुंदधुंद पण मळभटलेलं, थोडसं उदास वातावरण, काहींसं हरवलेपण जाण-वणार, बाजूलाच कुठतरी पारव्यांचे घुटूर्घुम, अन् त्यात भर घालणारी अचानक त्या वातावरणाला पोषक अशी सुरावट कानी आली, “” रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात / प्रियावीण उदास वाटे आज “” श्रीमती शांताबाईच्या रसिल्या, भावनोत्कट काव्यपंग्तीच्या दुरून कुठूनतरी थोड्याशा आर्त विराणी लकेरी कानी आल्या अन आतुरलेले लोचनानी अंधारात प्रियतमाची अधीरतेने वाट पाहणारी म-दालसा नजरेसमोर उभी ठाकली.

थोडे अद्भुत थोडे गूढ - १० (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 16/09/2014 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे अद्भुत थोडे गूढ ही लेखमालिका आज संपली. ही लेखमालिका प्रकाशीत करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे.

कर्फ्यू

लेखक चिनार यांनी मंगळवार, 16/09/2014 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी एकदा आमच्या गावात कर्फ्यू लागला होता. त्यावेळी त्याचा अर्थ काळात नव्हता पण घराबाहेर पडायचे नाही असे वडिलांनी बजावले होते. मग घरात बसुन बसुन कंटाळ आल्यामुळे मोठ्यांची नजर चुकवुन आम्ही गच्चीवर गेलो. रस्त्यावर शुकशुकाट होता. गच्चीवर आमचं क्रिकेट सुरु झालं. त्याच वेळी आकाशातुन एक विमान चाललं होतं. मला प्रश्न पडला ,गावात कर्फ्यू असतांना गावावरून विमान कसं काय जाऊ शकतं ? मग वाटलं की कदाचित पायलटला कर्फ्यूविषयी माहिती नसेल. आणि अशावेळी त्या पायलटला ही माहिती पुरवणं हे आमचं कर्तव्यचं नाही का ?

मामाचे गाव - तात्या (२)

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/09/2014 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
पण आजोबांना सोडून ते कोणाला देखील घाबरत नसावेत. कारण कित्येकवेळा ते रात्र रात्रभर शेतात काम करायचे व पहाटे पहाटे घरी यायचे. गावी लाईट नसायची. जेव्हा लाईट येईल तेव्हा धावत पळत शेतात येऊन पाण्याचा पंप चालू करावा लागत असे, नाहीतर मग दुसरा दिवस विहिरीतून मोटाने पाणी उपसत बसावे लागे. ते म्हणत विहिरीतील पाणी काढून काढून त्यांचे दंड असे बलदंड झाले आहेत. मागील भाग मग दुपारची उन्हं कलू लागली की, तात्या हातात मोठं घमेलं घ्यायचा, व झोपडीत असलेल्या पोत्यातून घमेल्यात काहीतरी भरायचा.