Skip to main content

ह्रुदया मध्ये घर बांधु या,अशा घराला दार कशाला?

लेखक खुशि यांनी शुक्रवार, 19/09/2014 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बाम्धु या, अशा घराला दार कशाला? कोण धर्म आणि जात कोणती, हाती काहीच नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जातिभेद अन धर्म विसरुया, साथ देउ या सुखदुखःला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जिव्हाळ्याचा गाव असावा, राग आणि रोष कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? परस्पराना समजुन घेऊ, वाद आणि तक्रार कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार

क्षितीज चांदणी......

लेखक माझं आभाळ यांनी शुक्रवार, 19/09/2014 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
फिरुनी उगवली पुन्हा लाजरी चांदणी ती क्षितीजावरी … डोळे तिचे भिरभिर अवघे शोधी साजणा दूर नभी …. सैरभैर निळ्या नयनी तिच्या तो येण्याचे भास खेळती …. क्षणात हसरी क्षणात बावरी तिच्या चेहर्याचे रंग बदलती …. हळूच लपलेला ढगा आडूनी चांद हासला खट्याळ परी …. लपंडाव प्रीतीचा अबोल आभास गोड अंतरंगी …. चंद्राच्या चांदण्यात मग अवघी रात्र न्हाऊन निघाली …. थरथरनाऱ्या ओठांपरी चांदणीही शहारून गेली …. प्रेमात आकंठ बुडुनी रात्र मग अवघा रंग निळा झाला …. चंदेरी झालर स्वप्नांची लेऊन गंध श्वासात मिसळूनी गेला ….

"अखेर सेना-भाजप युती तुटली?" .........

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 19/09/2014 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत.

......आणि आमची पितरं जेवली.

लेखक भिंगरी यांनी शुक्रवार, 19/09/2014 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
. पितृपक्षात पितरांना जेवायला घालतात. एक पिढी गेली कि पुढच्या पिढीचा नंबर...... माझे सासूसासरे असताना आमच्याकडे द्वादशीला पितरं असत. ते दोघेही गेल्यानंतर (सासरे चतुर्दशीला व सासूबाई पितृपक्षात नवमीला गेल्या.)श्राध्द कोणत्या दिवशी घालावे हा प्रश्न पडला. कारण प्रत्येकवेळी वेगवेगळे करणे सगळ्यांच्या दृष्टीने सोपे नव्हते.म्हणुन ब्राह्मणाने अष्टमीला दोघांचे एकत्र करायला सांगितले .त्याप्रमाणे १९९८ च्या पितृपक्षात अष्टमीला केले. आम्ही वेगळे राहत असलो तरी सासू-सासरे आमच्याकडे राहत असल्याने सगळी कार्ये आमच्याकडेच होतात.त्याप्रमाणे हेही कार्य झाले.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 19/09/2014 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
मानवाने ज्या दिवसापासून सागरसंचाराला सुरवात केली आहे, त्या दिवसापासून पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या जलतत्वाच्या या सर्वात रौद्र अविष्काराशी त्याचं अनोखं नातं निर्माण झालेलं आहे. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आणि ग्रंथांमध्ये मानवाच्या सागराशी असलेल्या बंधाचे उल्लेख आढळतात. इजिप्शीयन आणि ग्रीक संस्कृती बहरल्या त्या भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात तर द्रविडीयन संस्कृती बहरली ती हिंदी महासागर आणि त्याचे भाग असलेल्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काठी. पूर्णत्वास गेलेल्या संस्कृतींनी नित्यनवीन प्रदेशाची आस बाळगली होती.

गाढव ऐकेना, गाढव समजेना

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 18/09/2014 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
गाढव ऐकेना, गाढव समजेना गाढवा उसंत नाही, खिंकाळण्याचे थांबेना. गाढव ऐकेना ऽऽ । _______________________ डकवी अल्बमचे फोटो, शोभा साइटची होई फुकटचा घेतला कुणी गावात रे? काय गाढवाला नै ऐडिया? आयडी जाईल नको गमजा. होईल गोची, ढिंगटांग-ढिंगटांग, ढिंगटांग-ढिंगटांग ढींग । गाढव ऐकेना ऽऽ । ________________________ हे फुकटचे आंगण, आम्हा लाभे जैसे आंदण रे नको पडू उताणा इथे-तिथे रे हसती सूज्ञ तुला सारे, आप्त टाळ्या पिटता रे नको झाडू दुगाण्या नित्य-नेमे रे. आले मालक वाट पाहून, बघते गाढव मागे वळून, कोण तू कुठला? पळाले आप्तजन रे. आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आ ।
काव्यरस

इरेला पेटला आहे पिसारा (गझल)

लेखक अजय जोशी यांनी गुरुवार, 18/09/2014 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाचा केवढा झाला पसारा बिलगला वेदनेचाही पहारा तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा तुझ्या वाणीत सारे भाव होते नको सांगूस की केला पुकारा तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी नसे ही बातमी आहे इशारा किती चेकाळली स्वप्ने उराशी पहा मिळताच थोडासा उबारा अजुन तुडवीत आहे पाय काटे अजुन नक्की नसे माझा निवारा शरीराची उडाली फार थरथर मनामध्ये कुठे होता शहारा? मला सांगून गेला आपलेपण तुझा तो एक ओळीचा उतारा दुरुन नुसतेच तू नाचू नको ना इरेला पेटला आहे पिसारा जगाला पाहिजे ते ते म्हणू दे 'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा
काव्यरस

चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे?

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 18/09/2014 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या एक वर्षापासून आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. धंदा पण साफ बुडाला, डोक्यावर सुमारे ७-८ लाखाचे कर्ज आहे. देणेकरी नुसते उच्छाद मांडून आहेत. ज्यांचे कडून पैसे येणे आहेत ते ढिम्म आहेत. तोंड मिळवणी करता करता नाकीनऊ आले आहेत. ज्यांचे कडून पैसे घेतले त्यात मित्र आणि नातेवाईक सुद्धा आहेत. नवीन व्यवसाय पुरेसा येत नाही . जो येतो तो फारच तुटपुंजा आहे. अश्या परिस्थितीत कुठलीही फिलोसोफी डोक्यावरून जाते. जसे हे पण दिवस जातील, प्रयत्न करा यश मिळेल, संकटात खंबीर उभे रहा. आणि असेच बरेच. आजची परिस्थिती बघू जात सर्व कर्जे मिटायला २-३ वर्षे लागतील, पण कुणीच २-३ दिवस सुद्धा थांबायला तयार नाही.

तंत्रदर्शन-३

लेखक शरद यांनी गुरुवार, 18/09/2014 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
तंत्र आणि लोकायत तंत्र आणि लोकायत ही दोन दर्शने व भारतातील त्यांचे संबंध एवढ्यापुरताच आजचा लेख मर्यादित आहे. खरे म्हणजे लोकायत या आपल्या ग्रंथांत श्री देविप्रसाद यांनी या दोघांमधील जो संबंध दाखवला आहे त्यावरचे माझे मत येथे मांडले आहे. प्रथम श्री. देविप्रसाद काय म्हणतात ते बघू; तंत्राचे साध्य बघू व नंतर मला श्री. देविप्रसाद यांचे मत का पटत नाही ते बघू. श्री. देविप्रसाद हे कम्युनिस्ट विचारसरणीचे विचारवंत. त्यामुळे त्यांचा वर्गविद्रोह हा आवडीचा विषय. त्यांना लोकायत दर्शन हे भारतातील आदी जमातीचे व तंत्रही त्यांचेच अशी मांडणी करावयाची आहे.