Skip to main content

उपवासाचे अनारसे

लेखक विजय पिंपळापुरे यांनी गुरुवार, 02/10/2014 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
उपवासाचे अनारसे साह्ञीत्ञ : वरई तांदुळ साखर अथवा गूळ खसखस तूप कृती : वरई तांदुळ तीन दवस भिजवावेत. मग उपसून कपाड्यावर अधवट वाळवावे. नंतर खलबयात चांगले बारीक कुटून घयावेत. यात जेवढ पीठ त्याचया निमपट साखर अथवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घयावे व झाकून ठवावे. नंतर दुसरया दिवशी नेहमी प्रमाणे अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. यावर खसखसलावावी व लालासर रंगावर तळून घयावेत

"स्वच्छ भारत अभियान" आणि आपण

लेखक निलेश यांनी गुरुवार, 02/10/2014 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना‘चे उद्‌घाटन केले आहे. दिल्लीतील महर्षी वाल्मिकी मंदिरात पोहचून मोदींनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. या निमित्त भाषण करताना देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणार्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे. आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.

छायाचित्रणकला स्पर्धा ३ प्रवेशिका आणि मतदान....

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 02/10/2014 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील तिसरं पुष्प, विषय ऋतु (Seasons) या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका. आजपासून ९ अक्टोबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहुन गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती. धन्यवाद आणि शुभेच्छा!

लाल बहादुर शास्त्री जयंती......

लेखक _मनश्री_ यांनी गुरुवार, 02/10/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
laal bahadur shastri आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची १०९ वी जयंती त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात

गांधीबाबा,त्याची अहिंसा आणी आपण ?

लेखक बाबा पाटील यांनी गुरुवार, 02/10/2014 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
गांधी....... काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्‍यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे. मला खरच गंमत वाटते,माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा,मग या गाढवांना का कळत नाही की अशा गोष्टींचे तोटे किती आहेत,बंद

आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 02/10/2014 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
कौटूंबिक वातावरणात भावंडांच्या केव्हा न केव्हा आपापसात कुरबुरी होतच असतात. एखाद्याची बाजू घेताना अगदी आईवडलांवरही त्यांच्या न्याय्य निष्पक्ष वागण्यावर विश्वास न ठेवता पक्षपाताचे आरोप होत असतात पण कौटूंबीक वातावरणातली हि छोटी चहाच्या कपातली वादळं बहुतांश वेळा विस्मृतीच्या आड जातात आणि स्मृतीत राहतात ते कौटूंबिक प्रेमाने भारलेले क्षण. पण जेव्हा आपण सामाजिक परिस्थितीकडे येतो ज्या व्यक्ती समभाव आणि निष्पक्षतेने वागू इच्छितात अथवा तटस्थता बाळगू इच्छितात त्यांना केवळ पक्षपाताच्याच आरोपांना सामोरे जावे लागत नाही तर आपल्याच मंडळींच्या निष्ठूरतेस सहनही करावे लागते.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ९

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 02/10/2014 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
बीची बेटावरुन पुढे निघाल्यावर ग्जो ने बॅरो सामुद्रधुनी गाठली. प्रचंड धुक्याने पुढचं काहीही दिसत नव्हतं. परंतु धुकं निवळल्यावर २६ ऑगस्टला पील खाडीच्या आसपासचे भूप्रदेश त्यांच्या दृष्टीस पडले. सकाळी ९ वाजता ग्जो फ्रँकलीन सामुद्रधुनीतील प्रेस्कॉट बेटाजवळ पोहोचलं असताना अ‍ॅमंडसेनने सहजच कंपासवर नजर टाकली आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला! कंपास बंद पडला होता! दिशादिग्दर्शनासाठी अत्यावश्यक असलेला कंपास बंद पडल्यावर आता एकच मार्ग होता...

गांधीजी महान का ?

लेखक सवंगडी यांनी गुरुवार, 02/10/2014 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज कोणालाही विचारा महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत? याच कोणी समर्पक उत्तर देऊच शकणार नाही ! हां कदाचित ते सांगतील कि गांधीजी महात्मा होते म्हणून. पण मग ते नोटेवरच का छापले ?(मनात माझा प्रश्न-कि नोटेवर छापले मना-मनात का नाही ?) याचे मी माझ्या परीने शोधलेले उत्तर आज त्यांच्या जयंती निमित्त मांडतो आहे. खरेतर गांधीजींना नोटेवर छापणे हा त्यांचा अपमान आहे अस वाटतं आणि हाच त्या महापुरुषाचा पराभव पण आहे, आपण केलेला !

ग्राहक राजा

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 01/10/2014 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
ग्राहक राजा हि आमच्या वडिलांनी ग्राहक न्यायालयात दिलेल्या लढ्याची छोटीशी कहाणी. आमच्या आईचा एक लाखाचा मेडिक्लेम १९९९ साली काढलेला होता. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी कडे. २०१२ साली तिचे दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात झाली. ती पूर्ण बरी होउन घरी आली. आम्ही शस्त्रक्रियेच्या अगोदर विमा कंपनीला त्याबद्दल कळविले होते. जे जे सर्व कागदी सोपस्कार होते ते पूर्ण केलेले होते. शल्यक्रिया झाल्यावर त्याचे बिल रूपये ८८०००/- आम्ही कंपनीकडे पाठविले.