Skip to main content

उन्हाळी सुट्टीमधल्या सहली

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 23/04/2015 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा हा फिरण्यासाठी फारसा योग्य सीझन नाही त्यामुळे सहलीच्या ठिकाणांचे पर्याय कमी असतात पण शालेय सुट्ट्या या वेळेस असल्याने ट्रिपचे नियोजन करायचे आहे. सहकुटुंब फिरता येतील . गाडीने जाउन ४ दिवसात ट्रिप करायची आहे कारण ऐन वेळेस ट्रेन बुकिंग मिळत नाहीत. अशा पर्यटन स्थळांची माहिती ( हॉटेल, पाँईटस, प्रवास , इतर) हवी आहे . मी शोधलेली काही ठिकाणे १. सापुतारा : पुण्याहून ३५० किमी असणारे हे गुजरात मधले थंड हवेचे ठिकाण आहे. हस्तकला प्रदर्शन, तलाव , बोटींग, रोप वे, सुर्यास्त पाँइट ही आर्कषणे आहेत. येताना वणीची सप्तश्रृंगी देवी बघता येते.

टु शेक्सपिअर विथ लव

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 23/04/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: हि अप्रतिम कविता प्राजक्त देशमुख यांची ५ वर्षांपूर्वी लिहीलेली आहे. आजही ती तितकीच टवटवीत आहे. मुळात शेक्सपिअर हा फार कठीण विषय. पण प्राजक्तचे वाचन या कवितेत अगदी ठिकठिकाणी जाणवते. मला या कवितेचे रसग्रहण करणे काही जमले नाही, पण हि कविता तुमच्यासमोर आणण्यावाचूनही राहवले नाही.

क्षितिज-कुंपण

लेखक Vimodak यांनी गुरुवार, 23/04/2015 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
लाटा समुद्राच्या सखे पायात तू माळु नको, बेडयाच त्या पैंजण न्हवे, त्यावरी भाळु नको। चंद्र हा निघतो प्रवासा रोजच्याच भेटगाठी गोंदुनी भाळी तयाला, तू अशी मिरवू नको। मुक्त वारा या नभीचा नाद याचा मोकळा, जखडूनि केशी तयाला, तू अशी अडवू नको। वाहते हे जल-कलंदर, राख़ण्या मर्जी स्वत:ची, पाट बांधुनी तयाला, तू अशी फिरवू नको। लाभतो कधी का किनारा, या नभाला सखे, क्षितिज-कुम्पण तव नयनिचे, त्यावरी बांधू नको।

दिशाहीन

लेखक Vimodak यांनी गुरुवार, 23/04/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका ता-याचे तुटलेपण, रात्रीच्या काळ्या पलटावरून घरंगळत कोसळले. आपल्याच बांधवांच्या मैफ़िलितुन, निर्दयपणे निष्कासित तो झेपावला प्रलयाकडे. तेव्हा पृथ्वीवरिल अजाणांनी, त्यांच्या इच्छा-आकांक्ष्यांचे गाठोडे या दिशाहिनाला सोपवले.

भृगूसंहितेच्या शोधात... १

लेखक योगविवेक यांनी बुधवार, 22/04/2015 23:55 या दिवशी प्रकाशित केले.

भृगूसंहितेच्या शोधात...

नेपाळ व उत्तर भारत यात्रेचा संक्षिप्त अहवाल

सादरकर्ताः विवेक चौधरी.

a जीवावर उदार होऊन अनेक संकटांना तोंड देत समुद्रसफरीवर निघालेल्या सिंदबादच्या सुरस कथा आपण बालपणी वाचल्या व ऐकल्या असतील. जीव घेणा नसला तरी असाच अदभूत घटनाक्रमात घडत गेलेला प्रत्यक्ष शोध प्रवास आपल्यासाठी सादर. नेपाळमधील काठमांडू विमानतळावर उतरल्यावर जायचे कुठे व भेटायचे कुणाला अशा साध्या प्रश्नांचे उत्तर ठाऊक नसलेल्या प्रवासात मी, जळगावचा नाडीग्रंथ प्रेमी - विवेक चौधरी, ओक सरांच्या सोबत या यात्रेला निघालो.

सनावृता इन सुकांता !

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 22/04/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर ही माहीती जाहीर केल्याबद्दल आम्हाला वाळीत टाकले जावु शकते तथापि त्याचि फिकिर न करता आम्ही कंडुशमनार्थ हा वृतान्त लिहावयास घेतलाच असलयाने हे सांगणे भाग आहे संपादित त्यात प्रामुख्याने पोपशास्त्री , दयाघना , अग्यावेताळ( अ कि ह ह्यावर तज्ञांचा अजुन वाद सुरु आहे , तुर्तास आपण अ म्हणु ), खाटुक , फ्रॉईड आणि बीयरानंद हे सक्रिय कार्यकर्ते आहेत , इतरहि कार्यकर्ते अधुन मधुन उपस्थिती नोंदवत असतात पण प्रामुख्याने हेच ते महाभाग . संपादित नुकतेच सुकांताला झालेल्या कट्ट्याचा ( प्लीज नोट : नॉनमुवी कट्टा ) वृत्तांत पाडत आहे . तर बीयरचा अतीव तीरस्कार करणारे महाभाग बीयरानंद केवळ मित

क्रीडायुद्धस्य कथा - ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 22/04/2015 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी जुनी.... म्हणजे तितकीही जुनी नाही.... पण तरीही आजच्या मानाने जुनीच! पूर्वी - म्हणजे फेसबुक अस्तित्वातही नव्हतं तेव्हा.... आयफोन, आयपॅड सोडाच - आयपॉडही नव्हता. विकिपीडिया, यूट्यूब, ट्विटर... काही काही नव्हतं. माणसं चालताना समोर बघत चालायची. कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोनही नसायचा. २४ X ७ न्यूज चॅनल्सचं पेव नव्हतं फुटलेलं... सास बहू सीरियल्सना कोणी सीरियसली घ्यायचं नाही त्यामुळे टीव्ही पण कमीच पाहिला जायचा. इंटरनेटच धड नव्हतं तिथं कसलं ई-कॉमर्स अन कसलं क्लाउड कम्प्यूटिंग! तर सांगायची गोष्ट. आजच्या पेक्षा फारच वेगळा काळ होता.

क्षमा नावाच्या भूमातेस

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 22/04/2015 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
अगणित अत्याचार सोसलेस तू आ‌ई आ‌ई, तुझ्या अंगावरचे मौल्यवान दागिने लुटले आमच्या चैनीसाठी आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, तुझ्या हृदयावर चालवले आम्ही असंख्य नांगरांचे फाळ तू क्षमा केलीस आ‌ई, तुझे दुधाने भरलेले स्तन बुलडोझरने कापून टाकले आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, तुझ्या दुधात हलाहल जहरिले वीष कालवले आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, आज पर्यंत आमचा प्रत्येक अपराध तू पोटात घातलास कृतघ्न उपजलो आम्ही उन्मत्त झालो आम्ही निव्वळ स्वार्थी, भ्रष्ट, नतद्रष्ट झालो आम्ही आतातर निर्लज्ज, हलकट झालोय आम्ही आ‌ई, तुझे हिरवेगार वस्त्र या पापी हातांनी फेडले आम्ही तुझ्या अंगावर असंख्य वार हसत कृरपणाने केले आम्ही
काव्यरस

कोल्हापूर कट्टा . .

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 22/04/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . . सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . . ३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . . कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . . कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे . ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं .

पांढर्‍या जामचे सरबत

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 22/04/2015 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात. पांढरे जाम ज्यांना आमच्याकडे विलायती जाम म्हणतात ते या दिवसात मोठ्या प्रमाणात होतात. नुसते खायला छान लागतातच, पण काढल्यावर फार दिवस टिकत नाहीत. घरीच झाड असल्याने त्यांचा दुसरा काहीतरी उपयोग म्हणून सरबत करून पाहिले. सरबत चवीला पन्ह्यासारखे लागते, आणि फ्रिजमध्ये दोन दिवस टिकतेही!