Skip to main content

वस्त्रोद्योग-१ : कापसापासून सुतापर्यंत

लेखक प्रदीप साळुंखे यांनी शुक्रवार, 17/06/2016 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपणांस माहित आहेच कि अन्न,वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. तर धाग्याच्या शिर्षकावरून आपणांस अंदाज आला असेलच कि या तीन मुलभूत गरजांपैकि मी कोणत्या गरजेबाबत लिहणार आहे ते. तर ती महत्वाची गरज म्हणजे "वस्त्र".आदिम काळी मानवप्राणी निर्वस्त्रच फिरायचा,मग कसे कोण जाणे काळानुरूप मेंदू प्रगत होत गेला आणि मानवी मनामध्ये भावनांचा उदय झाला.त्यापैकिच एक भावना म्हणजे "लज्जा". आणि त्यामुळेच शरीराचा काही भाग झाकणे हे गरजेचे होऊन गेले,तसेच ऊन,वारा,पाऊस यापासून शरीराचे रक्षण व्हावे हेही महत्वाचे. पण सद्य स्थितीला आपण "लज्जा" या एका कारणास्तवच कपडे वापरतो असेच म्हणावे लागेल,आणि शरीर

क्लिक! (कथा)

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 17/06/2016 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
तशी गरज नाही. पण आधी हे चॉकलेट खाल्लं तरी चालेल ! ========================================================== हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय? मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्. मग लाल बटन दाबलं क्लिक पक्यानं आणि मी ती सुटकेस खोलायची जाम खटपट केली. मग तशीच घेऊन आलो खोलीवर. जिथं ड्रेनेजचं भोक उघडतं तिथंच आमची खोली. गढूळ पाण्याचे झरे वाहतात चोहीकडे. अर्थात गटारे. दाराला कडी घालून आत बसलो. मांडीवर ब्याग घेतली. पकडीनं लॉक उचकाटलं. पण हे मटरेलंच वेगळं. तोडताबी येईना.

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.

लेखक मोदक यांनी गुरुवार, 16/06/2016 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
मनरावने लेहवारी केली तेंव्हा भरपूर इनो घेतले होतेच. कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे. तर पहिल्या दोन गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडल्या. लेहला जायचे जायचे असे विचार सतत सुरू होतेच, वरवरची माहिती काढणे, मार्ग कसा असेल त्याचा अंदाज घेणे आणि तेथे काय काय बघायचे याची सतत उजळणी सुरूच होती. मात्र इतकी रजा मिळेल का हा मुख्य प्रश्न होता. एका अर्जंट प्रोजेक्टमुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुफान काम करावे लागले.

बाप हाय मी

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 16/06/2016 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
"बरं मग वकीलसाहेब, आलं समदं ध्यानात? ह्येच्यापुढं मी काय सांगू नये, तुमी इचारु नये" "लका, वकीलसाहेब झालो नंतर, आधी जिगरयार हौत. चड्डी घालता येत नव्हती तवापासून दोस्ती आपली" "म्हणूनच. म्हणूनच... चल लाग आता कामाला, लै लेट बी झालाय, वैनीसाब वराडतील" "झोप तू बी. डोळे लेन्स लावल्यागत झालेत लालभडाक" "झोपेचं तेवढं सोडून बोल. ती ग्येली आता कायमची, निघ तू" ................. "नाग्या, सगळं घीवून ये बे वर" "मालक, वैनीसाब येते म्हणतेत वर, कसं करु?" "झोपा म्हनाव त्येंना. तू ये घीवून. च्यायचं आकरामाशी" ************************** तिज्यायला कोनाय बे आकरामाशी. कोन म्हणतंय? समोर ये उंडग्या.

एक संघ मैदानातला - भाग १४

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 16/06/2016 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री पत्ते खेळत चकाट्या पिटल्यामुळे सकाळी काही वेळेत जाग आली नाही. शेवटी दादांनी येउन उठवल्यावर आमचा सूर्योदय झाला. सकाळचा वाॅर्मअप करण्यासाठी आम्ही तयार होऊ लागलो पण संडास आणि बाथरूम इतर संघांनी अडवल्यामुळे आमची पंचाईत झाली होती. १५ मिनिट कानोसा घेत आत बाहेर केल्यावर आपली इथे डाळ शिजण कठीण आहे हे दिसलं. तोंड धुवून प्रत्येकीने पिशवीमध्ये आपापले अंघोळीनंतरचे कपडे कोंबले आणि आम्हाला दिलेली बादली आणि मग घेऊन आम्ही तशाच हाफ पॅन्ट आणि शूजमध्ये ग्राउंडच्या दिशेने सुटलो. सकाळी सकाळी वाॅर्मअप करायचं सोडून हि सगळी फौज बादली आणि पिशव्या घेऊन कुठे चालली हे बघायला दादा आमच्या मागे पळत आले.

बोट - शिक्षण

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 16/06/2016 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला।' वगैरे बालगीतात ठीक आहे. पण ‘अशा बंगल्यात रहाणार्‍यांना चॉकलेटच्या वासानी मळमळायला लागेल का?’ असे रसभंग करणारे प्रश्न विचारायची जरूरच नाही कारण असा बंगला असणंच शक्य नाही. तसंच एक एक मार्कासाठी डोचकं पिकवलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर सांगितलं की अकरावी एस् एस् सी नंतर असा एक चार वर्षांचा कोर्स आहे ज्याला फी नाही, ज्यात प्रवेशासाठी मार्कांची अट नाही, पुस्तकं बेताचीच आणि समजायला बर्यापैकी सोपी, चार वर्षांच्या संपूर्ण कोर्सभर एकही परीक्षा नाही, कारण शिक्षकच नाहीत! वर दर महिन्याला ऐंशी रुपये पॉकेट मनी मिळेल - तर तो लक्षच देणार नाही. देऊन तरी काय उपयोग?

राजमाची - क्षणचित्रे

लेखक स्पा यांनी गुरुवार, 16/06/2016 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
कंजूष काकांनी वृतांत टाकला आहेच, मुसळधार पावसात कशी बशी काढलेली काही क्षण चित्रे येथे देतोय. धुकं आणि पावसामुळे क्यामेरा बहुतेक वेळ ब्यागेतच राहिला, मोबाईल ने फोटो काढावे लागलेत १.कोंदिवडे गावातून राजमाची वाटेवरला गणराय dasds २.

गरीब-श्रीमंत

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 16/06/2016 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मी रद्दी आणि काही जुनं सामान भंगारात देण्यासाठी काढलं, आणि बराच कचराही काढून टाकला. यात काही जुने कपडेही होते. भंगारात काही जुनी विजेची उपकरणे, काही भांडी, वगैरे होतं. आमच्याकडे नेहमी रद्दीसाठी येणाऱ्या भंगारवाल्याने ते सारं भंगार एका बॉक्समधे भरलं. त्यानं किती पैसे द्यावेत यावर मी कधीच घासाघीस करत नाही. तो बॉक्स उचलून तो निघाला आणि मला कचऱ्याची पिशवी आठवली. खाली जाताजाता ती कचऱ्याच्या डब्यात टाकशील का, असं मी त्यालाच विचारलं, आणि त्याने खांद्यावरचा बॉक्स खाली ठेवून कचऱ्याची पिशवी उघडली. आतले जुने कपडे पाहून त्याचे डोळे चमकत होते. साहेब, हे कपडे कचऱ्यात नका टाकू...

दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके

लेखक अत्रे यांनी गुरुवार, 16/06/2016 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या ओळखीच्या एका मुलाला नुकतेच दहावीमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. त्याला बक्षीस म्हणून पुस्तक द्यायचा विचार करत आहे. कृपया १. करीयर मार्गदर्शन २. प्रेरणादायी (चरित्र वगैरे) या विषयांवरील वाचनीय पुस्तके (शक्यतो मराठी) सुचवा. धन्यवाद.

मुदत ठेवींचे पतमानांकन

लेखक पुणे मुंग्रापं यांनी गुरुवार, 16/06/2016 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे.