चला . . कविता लिहू
थोडे तांदूळ ,थोडे गहू
चला . . . कविता लिहू !
शब्द हाताशी, कल्पना मनाशी
जमते का ? .. पाहू !
सुचलेले कागदावरचे, रुचलेले मनातले
अंतऱ यातले ,कळते का ? .. पाहू !
तळातून गाळलेले ,गाळातून तळलेले !
चिडचिड संताप , मनस्तापानी भरलेले
येते का बाहेर ! ? .. . पाहू !
काव्य गतीचा न्याय विचित्र
मनातले लपलेले चित्र
सहज निघते बाहेर का, पाहू !
सुरवात म्हणावे, की श्री गणेशा ?
सहज टाकला, आला नकाशा !
आता सांगा तुम्ही, मी पुढे जाऊ ?
----------------------
अतृप्त
श्रीखंड
श्रीखंड श्रीखंड ..
गोठ्यातून ओह माफ करा
डेअरीतून आणा दूध एक लीटर
उकळी द्या येऊ एकदम बेटर
ऊन ऊन दूध हो द्या कोमट
विरजणाने जेव्हा होईल दही घट्ट
सूती कापडात दह्याला बांधा
निथळया पाणी पुरचुंडी टांगा
टांगलेल्या जीवा होता तास पूर्ण चौदा
चक्का..दिसता घट्ट ,पुरा झाला सौदा
फेटा फेटा..पुस्तक परिचय --'जाई' : सुहास शिरवळकर
पुस्तकांमधील माझा सर्वात आवडता प्रकार (genre) म्हणजे प्रेमकथा.. कॉलेजमध्ये असताना मनाला रिझवणाऱ्या, भुरळ घालणाऱ्या, एक वेगळी अनुभूती देणाऱ्या अनेक प्रेमकथा मी वाचल्या आहेत. त्या काळात मला प्रेमकथा वाचनाची एक प्रकारची नाशाच चढली होती असं म्हणायला हरकत नाही.. सुशिंची दुनियादारी, खांडेकरांची अमृतवेल, ययाती, हिरवा चाफा, मिलिंद बोकिलांची शाळा, चेतन भगत यांची टू स्टेटस्, वपुंचे पार्टनर ई., अजूनही आहेत.
बेटाचा शोध. (विचित्रविश्वात भागो.)
बेटाचा शोध.
(विचित्रविश्वात भागो.)
आधीचा भाग इथे आहे. https://www.misalpav.com/node/52012
आम्ही फाईनडर प्रॉपरला राहायला येऊन जवळपास एक महिना झाला होता. आमचे बऱ्यापैकी बस्तान बसले होते. बायकोची इच्छा होती काही काम करावे, म्हणजे घरखर्चाला हातभार लागेल आणि बरा टाईमपासही होईल. ती तिची मनो कामना पूर्ण झाली. घरा पासून जवळ एक शिशुविहार होता. तिथे तिला काम मिळाले. काम अगदी सोप्पं(?) होतं. दोन ते पाच वर्षांच्या मुलांना त्यांच्या आया तिथे सोडून जायच्या. त्या पण नोकरी करणाऱ्याच होत्या. काय करणार. त्याना पण त्यात मजा वाटायची अशातला भाग नव्हता.
गुढी पाडवा
चैत्राची पालवी,
मरगळ घालवी ।।
कोकीळ कूजन,
श्रीराम पूजन ।।
तारीख रचली,
अयोध्या सजली ।।
मंदिर नवे,
चैतन्य सवे ।।
मंदिर मालकी,
रामाची पालखी ।।
गुढ्या तोरणे,
नयन पारणे ।।
आला मधूमास,
संपला वनवास ।।
गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.
असणे आणि दिसणे...
https://www.loksatta.com/explained/loksatta-explained-article-navneet-r…
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
ज्या शाळेत शिकल्या
म्हणे नवनीत राणा ।
ती अस्तीत्वात च नाही,
म्हणे, हे कारण जाणा ।।
पंजाबी चमार चे,
केले मराठी मोची ।
विरोधकांनी केली,
थोडा काळ गोची ।।
जात प्रमाणपत्र,
पाहता अवैध ।
मुलं घाबरली,आ
वासोटा जंगल ट्रेक
जानेवारी २६, २०२४
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातंर्गातील, सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्यात वसलेला वासोटा हा एक पुरातन वनदुर्ग, पुर्वी घनदाट जंगलाने वेढलेला तर कोयनेवर बांधलेल्या धरणामुळे आता पाण्यानेही वेढला गेल्याने अधिकच दुर्गम झालेल्या या किल्ल्यावर शिवसागर जलाशयाच्या कडेला वसलेल्या बामणोली गावातून स्वयंचलित लाँचसेवेच्या मदतीने पोहोचता येते.
मिसळपाव