Skip to main content

आंबेडकर, मर्ढेकर, किर्लोस्कर, आपटे, जोशी, कारखानीस, जानोरकर (गाडगे महाराज)

लेखक माहितगार यांनी बुधवार, 28/12/2016 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिपीडियावरील येथील नोंदीनुसार खालील साहित्यिकांचे मृत्यू सुमारे ६० वर्षां पुर्वी इ.स. १९५६ या वर्षात झाले होते म्हणून भारतीय कॉपीराईट कायद्यानुसार त्यांचे लेखन १ जानेवारी २०१७ पासून कॉपीराईट मुक्त होणे अभिप्रेत आहे. *भीमराव रामजी आंबेडकर वेगळी ओळख लिहिण्याची आवश्यकता नाही * पांडुरंग श्रीधर आपटे (६ एप्रिल, इ.स.

(नाक गळतंय माझं..)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 28/12/2016 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (मूळ कविता, त्यातल्या कल्पना सुरेख आहेत. उगाच टैमपास म्हणून हे विडम्बन. अजून बरे होऊ शकले असते..) नाक गळतंय माझं तसं ते नेहमीच गळतं पण पाऊस आला की येतात जोराच्या दोन चार शिंका अन नाक येते कफही होतो जरासा नाक गळतंय माझं रुमाल ओलागिच्च झालाय केंव्हाचं तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची हाताशी व्हिक्स आहेच पण विकोरील मिळेना.. जौदे ,निचरेल ...

फॉलोऑन आणि नंतर..

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 28/12/2016 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
टेस्ट मॅच आणि तसं पाहयला गेलं तर फर्स्ट क्लासची कोणतीही मॅच जिंकण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर खरंतर अगदी साधं आहे ते म्हणजे भरपूर रन्स करणारे बॅट्समन, २० विकेट्स घेऊ शकणारे बॉलर्स, बर्‍यापैकी विकेटकीपर आणि फिल्डर्स... आणि महत्वाचं म्हणजे नशिब! कोणत्याही टेस्ट मॅचमध्ये बहुतकरुन महत्वाची ठरते ती पहिली इनिंग्ज. पहिल्या इनिंग्जमध्ये बॅटींग करणारा संघ किती रन्स करतो किंवा बॉलिंग करणारा संघ त्यांना किती रन्समध्ये रोखण्यात यशस्वी होतो यावर अनेकदा मॅचचं पारडं झुकतं.

वडील

लेखक वृंदा१ यांनी मंगळवार, 27/12/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचनाचं कौतुक तुमच्या डोळ्यांत दिसायचं आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर आता कसं वाचायचं?

आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे

लेखक वृंदा१ यांनी मंगळवार, 27/12/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो.

सिर्फ पचास कमेंट्स चाहिये!!

लेखक बाजीप्रभू यांनी मंगळवार, 27/12/2016 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
NRI वेल्फेअर कमेटी, आहार आणि आरोग्य विभाग, ब्रँच पटाया (थायलंड). बैठक ठिकाण :- हॉटेल दुसितथानी, नॉर्थ पटाया, चोनबुरी प्रोव्हिन्स. दिनांक :- ०४ सप्टेंबर २०१६ (रविवार) वेळ :- सायंकाळी ७ वाजता. अटेंडी :- १) मिस्टर वेंकटेश गोपालन (VP, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल) २) मिस्टर नंदकुमार एम. (रिजनल हेड, मेसर्स क्लार्क्स शूज कंपनी) ३) मिस्टर बाजीप्रभू (IT मॅनेजर, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल) ४) मिस्टर देवादास रामाकृष्णन (मॅनेजर कस्टमर सर्व्हिस, मेसर्स.

मदुराई, रामेश्वर ट्रीपबद्दल माहिती हवी आहे.

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 27/12/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, फेब्रुवारीमधे कन्याकुमारी येथे जाणार आहोत. तर सोबत मदुराई, रामेश्वरम ही करावे असा मानस आहे. बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत. लेडीज फक्त. तीर्थाटनाचाच उद्देश आहे. ट्रेन व बसनेच प्रवास करणार आहोत. शक्य झाले तर एका बाजुने विमानप्रवास होउ शकतो. कुणाला या स्थळांचा म्हणजे मदुराई, रामेश्वरचा काही अनुभव, तसेच राहण्या/खाण्यापिण्याची व्यवस्था, जवळपासची मन्दिरे, कुठ्ला रुट सोपा पडेल इ माहिती असल्यास मार्गदर्शन करावे. धन्यवाद!

बेडसे लेणी....कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार.

लेखक वन्दना सपकाल यांनी मंगळवार, 27/12/2016 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
बेडसे लेणी म्हणजे खरच कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. अतिशय सुंदर आणि रेखीव लेणी बघुन मनाला खुप छान वाटत। पुणे- मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे बेडसे हे छोटे गाव लागते. नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतात पहूडलेलं हे बौध्दकालीन लेणं कामशेतपासून जवळच ८-१० कि.मी. अंतरावर आहे. कामशेत रेल्वे स्टेशनपासून पुणे-मुंबई रस्त्यावर आल्यावर एस.टी. किंवा खाजगी वाहनाने पवनानगर(काळे कॉलनी) येथे जाणार्‍या रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे. डोंगराच्या मध्यावर असलेली बेडसे लेणी लक्ष वेधून घेतात. अत्यंत शांत सुरम्य निवांत असं हे ठिकाण.

चित्तथरारक अस्वल दर्शन

लेखक रानवेडा सचिन यांनी मंगळवार, 27/12/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षी बुद्धपोर्णिमेदरम्यान वनविभागातर्फे घेतली जाणारी वन्यजीवगणना वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणीचं असते. वर्षभर वन्यजीवप्रेमी ह्या गणनेची आतुरतेने वाट पाहत असतात. मी देखील त्याला अपवाद नाही. ह्या गणनेमुळे वन्यजीव प्रेमींना खरया अर्थाने जंगल जवळुन बघायला व अनुभवायला मिळते. ह्या वर्षी 15 मे ते 22 मे दरम्यान वन्यजीव गणनेसाठी स्वयंसेवक म्हणुन मी व माझा मित्र इम्रान मलिक राधानगरी वन्यजीव अभयारण्यात गेलो होतो. कोल्हापुर जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या डोंगररांगांमधे राधानगरी अभयारण्य वसलेलं आहे. राधानगरी अभयारण्य म्हणजे जणु जैवविविधतेचा खजिनाच आहे.

निश्चलनीकरण व परदेशस्थ भारतीयांच्या समस्येबाबत याचिकेसाठी पाठिंब्याचे आवाहन

लेखक श्रीरंग_जोशी यांनी मंगळवार, 27/12/2016 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माननीय पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर रोजी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाची घोषणा केली. प्राथमिक प्रतिक्रियांनंतर परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये त्यांच्याजवळ असणाऱ्या ₹५०० व ₹१००० च्या जुन्या नोटांचे काय करावे याची काळजीयुक्त चर्चा सुरू झाली. सरकारने जाहिर केलेल्या माहितीनुसार परदेशात राहणाऱ्यांनी ३० डिसेंबर २०१६ किंवा ३१ मार्च २०१७ पर्यंत प्रत्यक्ष भारतात येऊनच स्वतःजवळच्या जुन्या नोटा बदलून घ्यायचा किंवा स्वतःच्या एनआरओ खात्यात जमा करण्याचा पर्याय उपलब्ध होता.