Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२० - जीवनातील पहिले महायुद्ध

लेखक प्रणव बनसोडे यांनी रविवार, 30/08/2020 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
1 मित्रांनो, महायुद्ध म्हटले की तलवार, रणगाडा, बंदुका, भाले इ. गोष्टी आल्याच. पण मी ज्या महायुद्धाचा उल्लेख येथे करत आहे, ते शीतयुद्ध-cum-महायुद्ध आहे. हे युद्ध आहे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे! आता तुम्हाला वरील उतार्‍याचा अर्थ कळला असेल. माझ्या बाबतीत दहावा वर्ग काय ठरला, याचे हे छोटे चित्र आपल्या डोळ्यासमोर मांडतो.

लंचटाईम

लेखक rushikapse165 यांनी रविवार, 30/08/2020 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
२०१७ साली शिक्षणासाठी मी पुण्यात आलो.शहर अनोळखी नव्हतं पण नवीन होत,त्यात पहिल्या वीस दिवसात मी माझ्या खोलीत एकटाच होतो,त्यामुळे खूप विचित्र वाटायच,रडायला यायचं.त्यात मला कोणाशी मैत्री करायला जरा जास्तच वेळ लागतो,म्हणून घराची आणि मित्रांची सारखी आठवण यायची. पण हळूहळू मी त्या वातावरणात रुळू लागलो,मित्रही बनत गेले,पण शेवटी हाॅस्टेल आणि घर यांच्यात फरक तर असणारच ना.त्यात मला भूक सहन करणे म्हणजे अशक्य.तसा मी हाॅटेल मॅनेजमेंटच्या काॅलेजात असल्यामुळे दुपारच्या जेवणाची व्यवस्था काॅलेजमधचयेच असायची.१२:५० ला आम्ही डायनिंग हाॅलकडे जायचो,तिथे रांगेतून ताट घेऊन टेबलवर जाऊन बसायच. पण आमच्यात काह

आजकाल

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 29/08/2020 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोलाहलात गर्दीच्या एकांत मी कवळतो अंधारून येता मीच अंतर्बाह्य झळाळतो रिक्ततेच्या डोहामध्ये सदा सचैल डुंबतो शून्य असूनही थेट अनंताशी झोंबी घेतो आठवता आठवता पुन्हा त्याला विसरतो दशदिशा कोंदून जो दहा अंगुळे उरतो
काव्यरस

Night Out...!

लेखक प. शी. यांनी शनिवार, 29/08/2020 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमच्या पापण्यांची हालचाल झाली. पुसटशी चमक त्याला दिसत होती. रस्त्यावर काचेचा चुरा पडला होता. त्याची bike रस्त्याच्या कडेला तशीच पडून होती. तो भानावर आला. डोक्याला हात लावत रस्त्यावरच बसुन होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती. त्याच कपाळ, भुवया, कान सर्व काही रक्ताने माखल होत. हाता-पायालाही बरचस खरचटल होत. गुढग्या जवळ खरचटल्यामुळे jeans फाटली होती. शर्ट रक्त आणि मातीन माखला होता. तो हळुहळु ऊभा राहीला. त्याची नजर सुमनवर पडली. सुमन रक्ता-मातीच्या चिखलात तशीच निपचीत पडून होती. तिचा एक पाय Activa च्या खाली अडकला होता. तिचे रक्ताने भरलेले केस तिच्या चेहर्यावर चिटकून होते.

श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी…

लेखक Mandar Ayachit यांनी शनिवार, 29/08/2020 06:19 या दिवशी प्रकाशित केले.
1 आठवणी…. आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अंदाज येत नाही, पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग एक असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचेही तसेच असते.. वपु असे म्हणाले होते.

लिंगाणा

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 28/08/2020 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालयात शिवशंभोचे वास्तव्य आहे, कैलासावर आणि सह्यादीमध्ये शिवशक्ती वास्तव्य करते दुर्गदुर्गेश्वर रायगडावर! याच रुद्राचे प्रतिक म्हणून निसर्गानेच जणु एक शिवलिंग निर्माण करुन रायगडाच्या पायथ्याशी ठेवले आहे.

विनोदापेक्षा गंभीरता अधिक फायद्याची असते.

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 28/08/2020 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
विनोद हे अतिउत्साहाचे फलित आहे.सोप्या शब्दात आनंद, खोडकरपणा यांचा भावनावेग वाढला की विनोदनिर्मिती होते. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच टीकटॉकचे सर्वाधिक वापरकर्ते हे भारतात आहेत. भारतात वैज्ञानिक/तांत्रिक संशोधनाचे प्रमाण कमी आहे पण विनोदी चित्रपटांची संख्या मात्र भरपूर आहे.भारतातल्या कोणत्याही भाषेत बनणार्‍या सिनेमांमधे विनोदी सिनेमांची संख्या ही लक्षणीय असते. व्हॉटसअॅपवरसुद्धा नवीन काही उपयुक्त शिकण्यासंबंधी समूह असेल तर तिथे लोकांना वेळ फार कमी असतो पण तेच जोक्स, मेमे,विनोदी gif, स्टीकर हे मात्र विनाविलंब फॉरवर्ड केले जातात.

द पियानिस्ट

लेखक प्रमोद मदाल यांनी शुक्रवार, 28/08/2020 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर १९३९ वॉर्सा रेडिओ स्टेशन. स्पिलमन पियानो वादनात मग्न होता. लाईव्ह रेकॉर्डिंग सुरु असतानाच अचानक रेडिओ स्टेशन बॉंम्बस्फोटाच्या आवाजाने हादरून जाते. काही कळायच्या आत दुसऱ्या तिसऱ्या धमक्यात सर्व काही उध्वस्त. आरोळ्या आणि धावाधाव. स्पिलमनच्या डोक्याला छोटीशी जखम होते तशातच तो घरी जातो. घरची मंडळी घाशा गुंडाळण्याचा तयारीत होती. BBC वरून ब्रिटिश गव्हर्नमेंटने नुकतीच नाझी जर्मनी विरोधात युद्ध पुकारलयायाची घोषणा केली होती आणि लवकरच परिस्थिती अटोक्यात येईल असे वचनही दिले.

श्रीगणेश लेखमाला २०२० - थप्पड

लेखक मी-दिपाली यांनी शुक्रवार, 28/08/2020 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
1 थप्पड सिनेमा पाहून तसे बरेच दिवस झाले होते, पण तरीही तो मनात रेंगाळत राहिला होता. चित्रपटाचं कथानक किंवा साैंदर्यस्थळं सांगण्याचा माझा हेतू नाही. पण मूळ हेतू समजण्यासाठीच मध्यवर्ती कल्पना सांगायची झाली, तर चित्रपटाची नायिका अमृता हिला तिचा नवरा (त्याला नायक म्हणू की खलनायक?