Skip to main content

महाराश्ट्र अन्धरात .. पुण्याचे मात्र लाड

लेखक पान्डू हवालदार यांनी रविवार, 30/03/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
अक्खा महाराश्ट्र अन्धारात बुड्लेला असतान्ना .. पुण्यात झगझगाट ....महावितर् ण मन्त्रि म्ह्ण् ण ता त .. पुणेरी जनतेला काही देणे घेणे नाही ... प्रतिक्रिया ..???

रविवार विशेष

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही. बुवा लिहितात - पार्थ म्हणे गा हृषीकेशी, या युद्धाची ऐशीतैशी, बेहत्तर आहे मेलो उपाशी, पण लढणार नाही. धोंड्यात जावो हि लढाई, आपल्या बाच्याने होणार नाही, समोर सारेच बेटे, जावाई, बाप, दादे, काके. अरे लढाई असते का सोपी .. मारे चालते कापाकापी, कित्येक लेकाचे संतापी मुंडकी ही छाटती.

बाबूराव बागुल

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. 'वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास' अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठं नाव. बाबूराव बागुलांचे ' जेव्हा मी जात चोरली होती' हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असते, ते दलित वगैरे नसते आणि साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजन, आनंदच असते. या वाचन परंपरेला या कथासंग्रहाबरोबर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा वाचल्यानंतर तडा गेला.

शिवाजी राजे मराठा कि राजपुत ...?

लेखक पान्डू हवालदार यांनी शनिवार, 29/03/2008 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
राजे शिवाजी ... मुळचे सिसोडिया ...रजपुत ... मराठा नव्हेत ..... आपल्याला काय वाट्त ... चर्च्या फक्त लेखा वर लेखकावर नको ...म्हन्जे चच्र्चे ला मजा येइल ...

एप्रिल फ़ूल

लेखक सुधीर कांदळकर यांनी शनिवार, 29/03/2008 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक एप्रिल. एक जादुई दिनांक. या दिवशी असे काय घडले असेल की आपली बुद्धि गायब होते? याचा संबंध बहुदा कालगणनेशी असावा. ग्रेगोरियन कॅलेंडर आस्तित्त्वात येण्यापूर्वी बहुधा दहाच महिने आस्तित्त्वात होते. मी इतिहासज्ञ नसल्यामुळे मला तपशील अचूक ठाऊक नाही. पण आपल्या संकेतस्थळावर लिहिणारे तज्ञ वस्तुस्थिती लिहितीलच. (प्रियालीताई बोरू सरसावा बरे.) तर नव्या महिन्यापैकी एप्रिल हा एक असावा. आणि दिनांक लिहितांना नवीन महिना ज्ञात नसल्यामुळे किंवा सवईमुळे एक एप्रिल ऐवजी एक मे अशी तारीख लोक लिहीत असवेत. जसे आपण जानेवारीच्या आठदहा तारखेपर्यंत जुनेच वर्ष टाकतो. चूक झाली तर खिल्ली उडविण्याचा लोकांचा हक्कच आहे.

जे घुसळे रवी

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 29/03/2008 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो दही घुसळून लोणी काढणारी रवी असतो कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो स्निग्धतेच्या अंशासाठी जग सारं धावतंय रवीचं चाक गरागरा फिरतंय तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो

'केशवा' अजब तुझे अवतार!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 29/03/2008 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा.चे विडंबनाचार्य केशवसुमार ह्यांनी दोन दिवस मि.पा.करांना अत्यवस्थ करुन सोडले आणि नंतर पुन्हा झकास विडंबनाने एंट्री मारुन एक सुखद धक्का दिला त्याबद्दल त्यांना हे विडंबन सादर! शब्दप्रभू गदिमांचे शब्द 'उध्दवा अजब तुझे सरकार' ही आमची प्रेरणा! 'केशवा', अजब तुझे अवतार!

ब्रेकिंग न्यूज

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 29/03/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
अजिबात वेळ घालवू नका. तडक टीव्ही लावा. राष्ट्रव्यापी समस्या.
तुम्ही ह्या बाबतीत काही करणार आहात की नाही?
break सौजन्य = ई-ढकल.

धर्म-शिक्षणाचे धडे द्या.........

लेखक संजीव नाईक यांनी शनिवार, 29/03/2008 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म-शिक्षणाचे धडे द्या......... जून महिना उजाडला की, आपल्या पाल्याला शाळा- कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच धांदल उडते. त्यातल्या त्यात पाल्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची वाढती फॅशन अलिकडे पालकांमधे, विशेषतः शहरामधील पालकांमध्ये वाढलेली आहे. परंतु हे पालक एक गोष्ट विसरतात की, शिक्षणाबरोबर संस्कार हे ही महत्वाचे असून हे संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात. धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही.