Skip to main content

रासलीला

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 29/06/2008 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
लाख चांदण्या लखलख करीती आणि तारका दळे उतरती आज पोर्णिमा उतरुन आलि कालिंदीच्या तटी खेळतो रास सखा श्रीहरी भरल्या मेघा परि सावळा मोरमुकुट शिरी मदनची दुसरा श्रृंगाराला स्वरात भिजवी अधरी धरुनी बासरी खेळतो रास सखा श्रीहरी गोप गोपिका जमले सारे टिपरी वरती टिपरी गाजे त्या नादाला भूलूनी आले शिवही यमुनातिरी खेळतो रास सखा श्रीहरी वाळ्वंटी त्या यमुनाकाठी रास रंगता हरी संगती तनमन अवघे विसरुन जावे प्रेम भरूनिया उरी खेळतो रास सखा श्रीहरी विषय नव्हे हा ही तर भक्ती विसरूनी रमणे देहासक्ती देवांनाही वेड लावते अशी रासमाधुरी खेळतो रास सखा श्रीहरी
Taxonomy upgrade extras

अळकुळी तनु

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 29/06/2008 05:36 या दिवशी प्रकाशित केले.
weekend दिवशी चिमुकली तनुली आईला म्हणाली weekdays दिवशी असता मी सकाळी उठलेली पाहुन तुला घरात नसलेली होई मी किंचीत अळकुळी मग घेई मज आज्जी जवळी पाहुनी माझ्या डोळी म्हणे मला ती नको होवू तू अळकुळी तुजसम तुझी आई असता अशीच घेही मी पण जवळी तिला त्यावेळी पण जवळी असे मी तिच्या वेळी अवेळी पक्षिण उडे आकाशी परी लक्ष असे पिल्लाशी आहे ना मी तुझ्या जवळी मग का होतेस तू अळकुळी येइल तुझी आई संध्याकाळी श्रीकृष्ण सामंत

नको म्हणू रे मनुजा!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 28/06/2008 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
हाच ब्लॉग बरा का तोच ब्लॉग बरा ही कविता बरी की ती कविता बरी हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. निर्मिती ही निसर्गाची मानवाला दिलेली देणगी आहे.निसर्गात सुद्धा व्हरायटी असते.पण कॉपी कधीच आढळणार नाही.दोन जुळ्या भावंडात सुद्धा किंचीत असा फरक असतो.हे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे. अनुवाद झाल जरी तरी तो कॉपी कॅट नसावा.
Taxonomy upgrade extras

पाऊले चालती पंढरीची वाट

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 28/06/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीच्या आषाढीच्या वारीची सुरुवात करण्यासाठी भक्तगण देहू व आळंदीला जमा झाले असल्याची बातमी आली आहे. आता त्यांच्या दिंड्यांच्या मार्गक्रमणाचा वृत्तांत 'आँखो देखा हाल'च्या थाटात पुढील पंधरवडाभर सर्व प्रसिध्दीमाध्यमांत येत राहील. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातूनच नव्हे तर शेजारच्या कर्माटकांतूनसुध्दा लक्षावधी भाविक पायी चालत पंढरपूरपर्यंत जातील. त्यातल्या अनेकांची ही पदयात्रा सुरू झालेलीही असेल. कांही लोक आपापल्या कुवतीनुसार त्यात थोडा काळ सहभाग घेऊन मिळेल तेवढा आनंदानुभव घेतील व पुण्य गांठीला बांधतील. हे सगळे संपूर्णपणे स्वेच्छापूर्वक चालत आले आहे.

संता आणी बंता

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 28/06/2008 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
सरदारजींवरचे आपण नेहमी विनोद ऐकतो इतरांना सांगतो. त्यात ही संता आणी बंता ही आपली आवडती पात्रे. त्यांचा एक विनोद गाण्यातुन सांगण्याचा एक प्रयत्न. कसा वाटला हा प्रयोग ते अवश्य सांगा. आमची प्रेरणा - सध्या माझ्या १ वर्षाच्या मुलीचे अतीशय आवडते बालगीत ससा हो ससा जसा कापुस जसा त्याने कासवाशी पैज लाविली ! वेगे वेगे जाऊ नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली !!

ही तुमचीच मुलगी का?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 28/06/2008 04:36 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी तरी म्हटलंय. " एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार.

वळु

लेखक राजस यांनी शुक्रवार, 27/06/2008 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
वळु बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपट एकाच साच्यात अडकला तेंव्हापासुन तो नकोसा व्हायला लागला होता. श्वास पासुन ही परिस्थीती बदलायला लागली आहे. तर बरेच दिवसांनी चित्रपट बघितला, वळु. कथानक सर्वांना माहीत झालेच असेल. एका गावात वळुने उच्छाद मांडलेला असतो त्यामुळे फॉरेस्ट ऑफीसरला बोलावणे पाठवले जाते. त्याबरोबर त्याचा भाऊ डॉक्युमेंटरी करण्यासाठी येतो. गावकर्यांना एकत्र जमवुन डॉक्युमेंटरी करताना कथानक उलगडत जाते.

"एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 27/06/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
" एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात, मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं." तसा मी वरचेवर गोव्याला जात येत असतो.एखादा आठवडा राहायचं असल्यास मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंट मधे राहतो.त्यामुळे माझा आजुबाजूच्या लोकांशी परिचय झालेला आहे.त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ख्यालीखुषालीच्या गप्पाही होतात.असंच एकदा त्या होटेल मधल्या एका वेटरशी हलो-हाय झाल्यावर मी त्याला सहजच म्हणालो, "तुला मी इकडे नवीनच पहात आहे." ते ऐकून तो म्हणाला, "होय, मला इकडे येवून दोन तीन महिने झाले.मी पुर्वी मुंबईच्या एका होटेलमधे काम करीत होतो.