Skip to main content

पाऊस..

लेखक पद्मश्री चित्रे यांनी सोमवार, 11/08/2008 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस असा हा झरतो ,धारांतुन गाणी गातो नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो.. ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो.. थेंबात ये रुपेरी, घेई हवेत झोके मातीतुनी उगवती , त्याची अनंत रुपे.. पाऊस आसमंती, पाऊस अंतरात पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त...
Taxonomy upgrade extras

अंकुर

लेखक आनंदयात्री यांनी सोमवार, 11/08/2008 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारलेल्या भल्या पहाटे आपल्या गावाने ओलेत्यानेच आपले स्वागत करावं. दाराशी पोचल्या पोचल्या पोचल्या तोच पारिजताकाचा शुभ्र सडा दारी अंथरलेला असावा. अंगणातलं झाडंन झाड ओळखीच हसावं. पावसानं ओलीचिंब ती, माझ्या अंगणातली झाडं, जणु अपार माया निथळत असावीत. घर आल्याची आश्वस्त जाणीव क्लांत मनाला निववुन जावी, इतक्यात सकाळची नांदी देणारी कोकिळेची 'कूहssकूहssss' अशी हाक आसमंतात घुमावी अन टप्पकन एक टपोरा गारेग्गार पाण्याचा थेंब अगदी अचुक कपाळावर पडावा.

राष्ट्रभावनेचा अभाव.. भारतासमोरच्या अडचणींचे मूळ?

लेखक राघव यांनी सोमवार, 11/08/2008 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशासमोरचे अनेक प्रश्न अन् अडचणी बघून त्याचे मूळ कशात असावे असा विचार मनात आला. त्यावर चिंतन केले असता जे वाटले ते खाली मांडत आहे. आपली मते जाणून घेण्यास उत्सुकता आहेच! कोणत्याही देशातील लोकांची मानसिकता, त्या देशाचे भविष्य ठरवत असते. देशासाठी, राष्ट्रासाठी जेथे विचार उगम पावतात तेथे अडचणींवर मात करण्याची शक्ती उत्पन्न होत असते. राष्ट्रभावनेच्या अभावामुळेच आज भारतात एकापेक्षा एक अडचणी उद्भवल्या आहेत. त्या संपवायचे प्रयत्न अपुरे पडतात त्यामागचे कारणही हेच आहे.

सलाम अभिनव बिंद्राला!!!

लेखक गिरीराज यांनी सोमवार, 11/08/2008 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच पदक मिळवले इतपत मी हवेत तरंगायला लागलो.२८ वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ त्याने संपवला. प्रथमच वैयक्तिक सुवर्णपदक हा एक इतिहासही घडवला. पदकप्रदान समारंभ बघतांना पापणी मिटवू नये असेच होत होते.

हुर्रेssss..भारताला पहिलं सुवर्ण पदक!

लेखक पक्या यांनी सोमवार, 11/08/2008 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
आताच मटा मध्ये वाचले. १० मिटर रायफल शुटिंग स्पर्धेत भारताच्या दिल्लीवासी अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताला मिळालेले हे पहिलं सुवर्ण पदक आहे. अभिनव बिंद्रा चे हार्दिक अभिनंदन. इतर खेळाडूंनीही भारताची शान अशीच वाढवो. भारताच्या सर्व खेळाडूंना आणि अभिनव बिंद्रा ला पुढील वाटचालीस शुभेच्छा .

पेन्सिल स्केच.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 11/08/2008 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा कर ! यावेळी मी मागे कुणीतरी दिलेल्या सूचनेचा आदर राखत एक स्केच जोडत आहे पण नाव सांगत नाहिये.स्केच कुणाचे आहे हे ओळखा आणि आवडले तर कळवांआही आवडले तर उलट जास्त प्रतिक्रिया येतातच. उदय सप्रे

पालीचं शेपूट

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 11/08/2008 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
"मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं. "पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते." "अंतरज्ञान म्हणजे"व्यवहारी विचारसरणी बाजूला करून मिळालेले ज्ञान." कदाचीत ही व्याख्या किती बरोबर असेल कुणास ठावूक.पण एव्हडंच म्हणता येईल की अंतरज्ञान अव्यवहारी असलं पाहिजे." असं म्हणत शामली मला आपला अनुभव सांगू लागली. "मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.आजी, आजोबा, मामा, मामी ही नाती आणि त्यांच्या

वय सोळावं सरलं की.....

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी सोमवार, 11/08/2008 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
वय सोळावं सरलं की सगळं हिरवं दिसू लागत स्वतःभोवती गिरकी घेत मनात पाखरू वसू लागत वसंताच्या बागेमध्ये चाफा केवडे फुलू लागतात फुलां भोवती पिंगा घालण्या भवरे ही जमू लागतात न बोलता प्रत्येकाला सार काही कळू लागत वय सोळावं सरलं की..... पुनवेच्या रातीला सागराला भरती येते क्षितिजावर आकाशाला भेटायला धरती येते प्रेमाची ही आगळी भाषा प्रत्येकजण बोलू लागत वय सोळावं सरलं की..... पहिला वाहिला पाऊस अन पहिली वाहिली प्रीत असते प्रत्येकाच्या ओठांवरती धुंद एक गीत असते ओलाचिंब मन तेव्हा वार्‍यावर झुलू लागत वय सोळावं सरलं की..... हिरव्या हिरव्या पानांमध्ये सळसळणार वारं असत तुझ्या डोळ्यांच्या नजरबंदीत