Skip to main content

आपण मिसळपाव वर कसे आलो ?

लेखक टारझन यांनी मंगळवार, 02/09/2008 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्स मिपाकर्स !!!! आम्ही इथे आलो तेंव्हा मिपाचे जवळजवळ ११०० सभासद होते. पण गेल्या अडिच महिन्यात ही संख्या १९०० वर पोहोचली. (ड्युप्किकेट आय डींचा हातभार फार फार तर ५० चा असेन) . असो ... इथले काही सभासद हे अंतरजालिय ब्लॉगर्स आहेत आणि त्यांचा वावर फार पुर्वीपासून तत्सम साइट्स वर आहे. त्यामुळे ते तात्यांच्या ओळखीमुळे मिपाकर्स झाले असतील ही शक्यता आहे. पण मिसळ पाव गुगल किंवा याहू सारखे नाही. किंवा त्याची जाहिरात आपण कुठल्या चॅनल वर पहात नाही (कमीत कमी मी तरी नव्हती पाहिली). म्हणून दिवसेंदिवस मिपाचा वाढता अवाका पाहून प्रश्न पडले. मी इथे येण्या आधी ब्लॉग्ज बद्दल फक्त ऐकून होतो.

रॉक ऑन च्या निमित्ताने..

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 02/09/2008 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
हे खरंतर केवळ सिनेमाचं परीक्षण नव्हे..... मला आवडला , तुम्ही बघा असं आणि इतकंच ही नव्हे... सिनेमा पाहताना त्यापेक्षा काही जास्त जाणवत होतं ते सांगावंसं वाटतंय म्हणून हे थोडंसं लेखन. आधी गोष्ट सांगतो.... अगदीच थोडक्यात सांगायचं तर दिल चाहता है सिनेमामध्ये झंकार बीट्स सिनेमा मिक्स केला तर रॉकऑन तयार होतो. मॅजिक नावाचा रॉक बँड चालवणार्‍या चार मित्रांची ही गोष्ट .... आदित्य ( फ़रहान ) ,के.डी( पूरब) , रॉब ( ल्यूक केनी) आणि जो ( अर्जुन रामपाल) असे चौघे मित्र दहा वर्षांनंतर पुन्हा भेटतात.

"तुमको भेजा नही" ह्या वाक्यावरून वाद

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 01/09/2008 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
असंच एकदा मी आमच्या धाके कॉलनीच्या बिल्डींग मधून आमच्या फ्लॅट्च्या बाल्कनीतून पाहिलं की खाली खूप गर्दी जमली होती आणि एका पोस्ट्मन बरोबर एक अनोळखी माणूस हुज्जत घालत होता.मुंबईला अशा प्रसंगी गर्दी जमायला वेळ लागत नाही. सहज कुतुहल म्हणून मी पण खाली उतरून काय चाललं आहे म्हणून आणखीन एक बघ्याची भर असे समजून ऐकायला गेलो. "भेजा" या शब्दावर वाद चालाला होता.पोस्टमन ही व्यक्ति नेहमी प्रमाणे लोकल मराठी माणूस,ज्याला भुमी पुत्र म्हणातात तसाच काहिसा प्रकार.

कांद्याची पातीची पातळ भाजी ?

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 01/09/2008 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
घरात एकटा मी, रविवारचे दुपारचे १२ वाजत आलेले, कालच्या थोड्याश्या तापाने प्रकृति नरम-गरम, म्हणून बाहेर जाऊन काही खायची किंवा घरात काही कष्टपूर्वक काही मसालेदार करायची हिंमत नाही, तेंव्हा काहीतरी सोपं, पचायला हलकं असं करावं म्हणून भाज्या बघायला फ्रिज उघडलं...आत फक्त कांद्याची लुसलुशीत पात...म्हंटलं चला मुगाच्या डाळीचा तडका देऊन काही करता येतंय का पहावं.

प्रेमे नादली पंढरी..!

लेखक राघव यांनी सोमवार, 01/09/2008 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादशीला ही कविता लिहिलेली. लिहिल्या गेल्यावर माझा मलाच खूप आनंद झाला होता. :) मेघ आषाढाचा गर्जे, गाज गूंजे चराचरी, प्रेमे नादली पंढरी उभा बघून श्रीहरी!
मी बालक अजाण मन सोडीना पदर! माझी बालकाची मती त्यास कोठला आधार?
दिंडी चालली माहेरा, वाट ओली अंतरीची! उभी लेकराच्यासाठी माय सावळी कधीची!!
अश्रू वाहती सहज, भाव कोवळा सांभाळा! मायभेट उराउरी आज आनंद सोहळा!!
मुमुक्षू [टीपः अगोदरही याच नावने जालावर प्रसिद्ध केलेली आहे. किंचित बदल करून येथे प्रकाशित करतो आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]

आदरणिय श्री. सखारामजी गटणे ह्यांचा जाहिर आणि तीव्र निषेध....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 01/09/2008 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणिय श्री. सखारामजी गटणे ह्यांनी 'ओळखा पाहू?' असा धागा टाकून समस्त मिपाकरांच्या डोक्याला भुंगा लावून आपण स्वतः मस्त मजा बघितली. काही बक्षिसही लावले. जवळ जवळ प्रत्येकाने डोके खाजवू खाजवू प्रतिसाद टाकले. त्यांच्या मनधरण्या केल्या की साहेब आता तरी बोला. एवढे झाल्यावर साहेब वदते झाले, काय तर नुस्तं चायनिज हाटेल आणि पुढे.... होय तेच ते मिपावरील सर्वात भितीदायक वाक्य.... क्रमशः.... ~X( ह्या कृत्याबद्दल आम्ही त्यांचा जाहिर आणि तीव्र निषेध करतो. कृपया आम्हाला ह्या निषेधात साथ द्या. :D बिपिन.

नकटीच्या लग्नाला...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 01/09/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले तरी नकटीचं लग्न ठरत नव्हतं. वधूपित्यानं संभाव्य वर शोधून ठेवले होते. आपणच मुलीचा सांभाळ केलाय, असं म्हणविणारे काके-मामेही प्रयत्न करून थकले होते. पण "कुलस्वामिनी' कौल देत नव्हती. काही ना काही अडचण सतत येत होती. नकटीच्या लग्नापायी बऱ्याच जणांचं घोडं अडलं होतं. त्यांच्या सामाजिक कार्याच्या लालसेत अडथळा येत होता. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या बिचाऱ्या प्रामाणिक गांधीवाद्यांचं, राष्ट्रवाद्यांचं सगळं अवसानच गळाल्यासारखं झालं होतं. इच्छा असूनही संधी न मिळाल्यानं समाजासाठी काही करता येत नव्हतं.