Skip to main content

हे महाराजा

लेखक अभिजीत मोटे यांनी बुधवार, 01/10/2008 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः स्वर्गलोक वेळ: सकाळची सावरकर (वि. दा. सावरकर) कसलातरी गुढ विचार करत बसले होते. तेवढ्यात कूठून तरी तुतार्‍याचे आवाज त्यांच्या कानी आले. समोरून महाराज (छ्त्रपति शिवराय) येत होते. दोघांनी एकमेकांना नमस्कार केले. एकमेकांची विचारपूस केली. चर्चा चालू होती पन राहून राहून सावरकर स्वतात हरवून जात होते. महाराजांना या गोष्टिची जानीव झाली. त्यांनी याबद्दल सावरकरांना विचारलं, "काय तात्या कसला विचार करताय मघासपासून". "काही नाही महाराज, विचार करत होतो मी आणि तुम्ही, दोघांनिही आपली पूरी हयात घालवली हिंदूस्थानला स्वतंत्र्य करायला. जनता मला तर विसरली पण तूम्हाला नाही विसरली. हे कसं काय?

आय पील

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 01/10/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र सुरु झाली. जिकडे बघतो तिकडे गरबा. अगदी खांद्याला खांदा लावुन. निरनिराळी मंड्ळे कुरघोडी करण्याकरिता वेगवेगळ्या शकली काढतात. स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, आणखी काय काय . शिगेला पोचलेला आनंदोत्सव. गरब्यात भाग घेणार्यांचे चेहेरे बघितल्यावर एक्स्साइट्मेंट म्हणतात ती नेमके काय हे कळ्ते. प्रेक्षकांचा पण तुटवडा नाही. काका मंड्ळी बघोजी राव होताना " गेले ते दिवस" चे उसासे सोडतात. परत एखादी सुबक ठेंगणी हेरुन खयालोंकी दुनिया मधे फिरुन येतात. मला मात्र गरब्यात कधीही सहभागी होता आले नाही. तसे खास काही ही कारण नाही. संपर्क वाढतो अशी माहिती मिळाल्यावर गेलो होतो एकदा. पण काही जमले नाही.

मराठी पुस्तकाचं प्रकाशन

लेखक बी टी गॉडवीट यांनी बुधवार, 01/10/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी छंद म्हणून लघुकथा लिहितो. यातील काही वेगवेगळ्या मासिकांमधून वेळोवेळी प्रसिद्धही झाल्या आहेत. या कथांचे पुस्तक प्रकाशित करण्याची माझी इच्छा आहे. परंतू वेगवेगळ्या लोकांचे मराठी प्रकाशकांबद्दलचे अनुभव ऐकून प्रकाशकांचे दरवाजे ठोठावण्याची माझी इच्छाही नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही. दुसरं म्हणजे मी कुणी प्रस्थापित लेखक नाही किंवा माझं पुस्तक कितपत खपेल याची आज काहीच खात्री नाही. त्यामुळे प्रकाशकाच्या दॄष्टिनं ही व्यावसायिक जोखीम आहे. त्यामुळे प्रकाशक यात रस घेणार नाहीत हे सहाजिक आहे.

आय्.एन्.टी

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी बुधवार, 01/10/2008 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
काल मुंबईच्या N.C.P.A. सभाग्रुहात आय्.एन्.टी ची अंतिम फेरी पार पडली पण राहुन राहुन एकच प्रश्ण मनात येत होता की आय्.एन्.टी चे परिक्शक खरोखर एव्हडे परिपुर्ण आहेत का........????????????????????? कारण दरवर्शी प्रमाणे यंदाही स्पर्धकानी आयोजकावर घेतलेले तोंडसुख दरवर्शी प्रमाणे यंदाही सावळ्या गोंधाळात ही स्पर्धा पार पडली तसेच स्पर्धकानी परिक्षकांवर पारर्शलिटीचे आरोप केलेत

शेवटची भेट!!!

लेखक क्षितिजा यांनी बुधवार, 01/10/2008 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज तुला शेवटची भेटायला आलेय. तुझ्या मैत्रीच्या सर्व आठवणींची आज मी समग्र मूर्ती झालेय. आज तुला शेवटची भेटायला आलेय. हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन. तुझ्याशी भेटण्याचं मनात आलं आणि तडक आलेय निघून. हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन. या नंतर असे येता येणार नाही. संसाराची गाडी ओढताना हे समजून घ्यावे लागेल तुलाही. या नंतर असे येता येणार नाही. मैत्रिणीची आठवण ठेवशील ना? दोघेही व्यवहारात रमल्यावर माझी विचारपूस करशील ना? मैत्रिणीची आठवण ठेवशील ना? ही माझ्या लग्नाची पत्रिका. चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका! ही माझ्या लग्नाची पत्रिका.

मी!!!

लेखक स्व यांनी बुधवार, 01/10/2008 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
व्यावहारिकदृष्ट्या बिनकामाच्या माहितीचा अफाट खजिना ......

ओढ परतीची

लेखक अनिरुध्द यांनी बुधवार, 01/10/2008 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
पाखराला ध्यास लागला दूर देशी जाण्याचा दुसरी माती, दुसरी नाती अनुभवण्याचा पाखरा जा दूर देशी मन त्याचे त्यालाच सांगे दे झुगारुन बंधन इथले नकोत काही पाश मागे उडोनी जाई पाखरु जाई ते दिगंतरा धडपड, खटपट पुन्हा नव्याने मांडण्या संसार सारा एकटेच ते सदैव आता नसे सोबत्यांचा मेळा आठव येई घरट्याची येई आता कंटाळा
Taxonomy upgrade extras

कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे

लेखक धनंजय यांनी बुधवार, 01/10/2008 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : पुढील लेख कल्पनिक नाही. अनुभवाचे वर्णन आहे. --------------------------------------------------------------------------------- एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.

अळु-वालाची आंबट गोड रसभाजी

लेखक लवंगी यांनी बुधवार, 01/10/2008 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
आईची अजुन एक मला आवडणारी डिश .. साहित्य - ३ वाट्या सोललेले वाल, ६-७ काड्या भाजीच अळु बारीक चिरलेल, १ बारीक चिरलेला छोटा कांदा , तेल, मीठ, गुळ, चिंच मसाला - ४ पाकळ्या लसूण, १ काडी दालचिनी, ३ हिरव्या मिरच्या कृती - पातेल्यात ३ मोठे चमचे तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परता. कांदा शिजल्यावर अळु-वाल घालून चांगली वाफ आणावी. वाल शिजत आले की मीठ आणि वाटलेला मसाला घालावा. बोराएवढ्या चिंचेचा कोळ घालावा. थोडे पाणी घालावे. एक चांगली उकळी आणून त्यात थोडा गुळ घालावा. मंद आचेवर ५ मिनिट शिजवावे. ही भाजी आपल्या आवडी प्रमाणाने गोड तिखट आंबट करता येते. वरुन कोथिंबीर पेरावी.