Skip to main content

लक्ष्मीपूजन

लेखक सनातन यांनी मंगळवार, 28/10/2008 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आश्‍विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते. या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्‍त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. आज आपण लक्ष्मीपूजनासंदर्भात माहिती पाहूया. १.

येथे रोकडा भेटेल..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 28/10/2008 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
काय मंडळी, कसं वाटतंय मिपाचं मुखपृष्ठ? साला, इतर कुठल्या संस्थळाचं मुखपृष्ठ इतकं श्रीमंत आहे काय? हज्जार रुपिया अने काजू मिठाई, अने सुको मेवो! :) सू बोले छे? :) असो, हे लक्ष्मीपूजन सर्व मिपाकरांना मालामाल बनवो हीच शुभकामना...! :) मिपा व्यवस्थापनाकडून सर्वांना एक हजार सहाशे पंचाऐशी रुपये सप्रेम भेट! कृपया स्वीकार करावा! :) आपला, (पैसेवाला) तात्या.

`ब्लॉग माझा' विजेत्यांची यादी!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 27/10/2008 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
`स्टार माझा'नं अखेर वेबसाइटवर `ब्लॉग माझा'चा अधिक्रुत निकाल जाहीर केला आहे. एकदा शूटिंग रद्द झालं, आता बघू! या विषयावरची आधीची चर्चा : http://www.misalpav.com/node/3984

आठवण

लेखक अभिज्ञ यांनी सोमवार, 27/10/2008 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव करांच्या स्मृती प्रमाणे तात्या उर्फ विसोबा खेचर ह्यांनी ह्या दिवाळित रौशनी चे पुढील भाग द्यावयाचे कबूल केले होते. तरि संबधितांना त्याची आठवण करून द्यावी म्हणून हा खटाटोप. :)

निःशब्द होता सारा परिसर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 27/10/2008 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-रिझवी) जहाली असता अर्धी रात्र निःशब्द होता सारा परिसर दाहलेल्या मनाची ऐका रंजलेली ही नीतिकथा धुमसलेले उश्वास येती वणव्यातून चांदण्या सांगती डोळे मिचकावून लोळ हा धुराचा असेल आला धरतीवरून सांगुया ढगाना विझविण्या पाणी शिंपडून चंद्र सांगे चांदण्याना ऐकून हा कोलाहल नसे तसे काही जाहले त्या धरतीवर गोरगरीब बिचारे राहती त्यांच्या वस्तीवर घामाच्या दाहाने जाळ पेटती हृदयावर सांगती चांदण्या प्रवाही होण्या सागराला जलधारा ओसंडण्या सांगती त्या मेघाला सांगे चंद्रमा जेव्हा आग लागे हृदयाला अश्रूंच्या जलधारा विझवीती त्या आगीला श्रीकृष्ण सामंत

साध्‍वी प्रज्ञासिंह कोण?

लेखक विकी शिरपूरकर यांनी सोमवार, 27/10/2008 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. गेल्‍या काही दिवसांपासून भारतीयच नव्‍हे तर विदेशी प्रसार माध्‍यमांमध्‍येही चर्चिले जाणारे नाव. आजवर ज्ञात असलेली पहिली संशयित हिंदू दहशतवादी महिला. कट्टर हिंदुत्‍ववादी विचारांची प्रज्ञासिंह आज सर्वांच्‍या चर्चेचा विषय ठरलीय ते मालेगावच्‍या स्‍फोटात संशयित आरोपी म्‍हणून. प्रखर राष्‍ट्रवादी विचार, शब्‍दांना असलेली धार आणि परखड वक्‍तृत्‍वशैली असलेली ही साध्‍वी.

राजला मारायला आलेल्या बिहारीचे एन्काउंटर

लेखक इनोबा म्हणे यांनी सोमवार, 27/10/2008 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी इथे वाचा. या घटनेनंतर सर्व बिहारी नेत्यांनी एकत्र येऊन पोलिसांचा निषेध केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधांनांची भेट घेउन या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. बिहारी नेते 'राहूल चांगला मुलगा होता,तो कोणी अतिरेकी नव्हता व त्याला पोलिसांनी विनाकारण मारले' असा कांगावा करीत आहेत. झी चोवीस तास या वाहीनीवर राहूल राज च्या पराक्रमाचा विडीओ दाखवला जात आहे. या विडिओमधे हा तरुण बसच्या खिडकीतून बाहेर गोळ्या झाडताना स्पष्ट दिसतो आहे तरीही लालूप्रसाद हा मुलगा निर्दोष असल्याचे सांगत आहेत.

बापू सोनावणे..!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 27/10/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन रेषेवरील, रेषेखालील, २००७-२००८ वगैरे वगैरे इत्यादी कुठल्याही अक्षरात मोडत नाही याची मला कल्पना आहे! आपल्याला नाय जमत बा तुमची ती रेषेवरची उभी की आडवी अक्षरे!

दिवाळीतले चमत्कार-४

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 27/10/2008 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
राणेंची लगीनघाई ---------- सकाळी सकाळी निवांत "प्रहार' वाचत बसलेल्या नारायण राणेंना नीलिमाताईंनी हलवलं. ""अहो उठल्या उठल्या पेपर काय वाचत बसलाय? चला, अंघोळ उरकून घ्या!'' ""अगं, आज दिवाळीचा पहिला दिवस. कॉंग्रेसमध्ये आल्यावर माझ्या मुख्यमंत्रिपदाची सुद्धा ही पहिली दिवाळी. आणि तू अंघोळ वगैरे काय म्हणतेस? "अभ्यंगस्नान' म्हणावं! आणि "पेपर' काय म्हणतेस? "प्रहार' म्हणावं! काही फरक आहे की नाही?'' राणे जरासे चिडक्‍या स्वरात म्हणाले. ""अहो, इथपर्यंत पोचण्याआधी तुम्ही कुणाकुणाच्या नावानं अंघोळ करत होता ना, म्हणून तेच डोक्‍यात बसलंय.'' ""असो. चला, आटपा लवकर. छान सुगंधी उटणं लावते. गरम पाणी काढून ठेवलंय.

दिवाळीतले चमत्कार-३

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 27/10/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
ओवाळिते भाऊराया! ------ तासगावातल्या आपल्या घरी दिवाळीसाठी गेलेल्या आर. आर. पाटलांना तिथेही चैन नव्हताच. आपल्या अनुपस्थितीत गावात कुठे काही गैरप्रकार सुरू झालेले नाहीत ना, याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी गावातून फेरफटका मारला. आबा गावात असले, की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावात "तीन पत्ती' खेळायला सुद्धा बंदी होती. गावातले गुत्ते बित्ते तर केव्हाच बंद झाले होते. एवढंच नव्हे, तर आबांसमोर तंबाखू खायचीही कुणाची टाप नव्हती. गृहमंत्रिपद हाती घेतल्यापासून कधी नव्हे एवढा तणाव त्यांनी गेल्या वर्षभरात अनुभवला होता.