Skip to main content

मायकेल जॅक्सन गेला

लेखक पक्या यांनी शुक्रवार, 26/06/2009 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच (गुरुवार दुपार ) समजले की पॉप संगीताचा बादशाह समजला जाणारा मायकेल जॅक्सन गेला. राहत्या घरीच श्वास बंद पडून त्याचे निधन झाले. http://news.yahoo.com/s/ap/us_obit_michael_jackson

मृगजळ - १

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 25/06/2009 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
"आबाऽऽऽऽऽ... लवकर चल!!!!!!!!! माय कशी तरीच करतीया... चल रं.. चल लवकर..." राणीनं गळा काढला. "ए... सटवे... चल जा इथून. तुज्याशी आणि तुझ्या मायशी काय बी संबंद न्हाय माझा..! **** ची औलाद!!! चल चालती हो..." आबा करवादून म्हणाला. तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत स्वतःच्या मिठीत असलेल्या चंदाला तो आणखीनच बिलगला. त्याला तशा आवस्थेत पाहणे राणीसाठी नविन नव्हते. तिला समजायला लागल्यापासून ती बहुतेक रोज दुपारी म्हणजे ज्यावेळी दारू पिण्यार्‍यांची अड्ड्यावर गर्दी कमी असायची तेव्हा दारूच्या भट्टीच्या मागं असलेल्या एका अडगळीच्या खोलीत, ती हेच दृष्य पहात आली होती.

विशिष्ट ओळख योजना

लेखक चिरोटा यांनी गुरुवार, 25/06/2009 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज केंद्र सरकारने विशिष्ट ओळख योजनेचे(Unique Identification Scheme) मुख्य म्हणुन इन्फोसिसचे नंदन निलेकणी ह्यांची नियुक्ती केली आहे. या योजनेप्रमाणे प्रत्येक भारतियाला विशिष्ट ओळख अंक दिला जाईल्.बर्‍याचश्या प्रगत देशात प्रत्येक नागरिकाला असा अंक दिला जातो.ओळखपत्र कार्ड स्वरुपात दिले जाणार असुन त्यावर फोटो,बायोमेट्रिक माहिती असेल. हा अंक मग स्थानिक्,राज्य्,राष्ट्र स्तरावरच्या सर्व सरकारी विभागाना जोडला जाईल.

व्हाय मेन डोन्ट लिसन अ‍ॅण्ड विमेन कान्ट रीड मॅप्स

लेखक शितल यांनी गुरुवार, 25/06/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे जगातील अनेक भाषेत अनुवादन झाले आहे. मराठीत त्याचे अनुवादन अ‍ॅड.शुभदा विव्दांस यांनी केले आहे. पुस्तकातील माहिती अचूक व परिपुर्ण असावी यासाठी अ‍ॅलन आणि बार्बरा पीस दोघे ही भरपूर मेहनत घेतात. त्यासाठी ते देशोदेशीच्या एक्स्पर्टसना भेटतात, लोकांच्या मुलाखती घेतात, सेमिनार्स घडवुन आणतात. या पुस्तक निर्मीतीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत पुस्तक वाचताना वाचकांच्या लक्षात येते. या पुस्तकात अनेक स्त्रीयांच्या मनात असलेले पुरूषां बद्दल प्रश्न जसे, पुरूष असे का वागतात ? मनातील गोष्टी बोलुन का दाखवत नाहीत?

यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालीका सज्ज

लेखक विकि यांनी गुरुवार, 25/06/2009 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
खास मिपाकर वाचकांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या कार्याबाबत माहीती.अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा मुंबई देशाची आर्थिक राजधानी.लोकसंख्या १ कोटी २२६० एवढी प्रचंड .लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पाचव्या क्रमांकाचे शहर.शहरात तसेच उपनगरात अनेक लोक झोपडपट्या,चाळी यांतून दाटीवाटीने राहतात.

मदत हवी आहे.

लेखक जागु यांनी गुरुवार, 25/06/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझे नेट कनेक्शन खुप स्लो झाले आहे. प्रतिसाद द्यायला अथवा कोणताही दुवा उघडण्यासाठी एक ते दिड मिनीट लागतोय. जाणकारांनी उपाय सांगावा.

पडसे

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 25/06/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
दबस्कार बित्रादो पावसाळा आला हा हबखास सर्दीचा सीझद. आता कुडाला सर्दी जाली त्याचे दाक हमखास चोद्दते.दाक असे बद्द झाले की पच्चाइत होते. सर्दी झालेल्या दाकादे काहिही बोलले तरी त्याचे कै च्या कै ऐकले जाते. बघादा आता बला जदातले बदातले असे भडायचे होते.पड ते ऐकु येतादाच विचित्र ऐकु येते. पावसातली सहल भडली की बला त्या दत्तरचे दोद तीद दिवस असेच बोलावे लागते. सगळी सादुदासीक व्यज्ज्दे अशी बदबदीत होउद जातात बग ठरवतो की बोलतदा सादुदासीक शब्द टाळूद बोलायचे बी असेच एक दिवस भरपूर पावसात कोकडात गेलो होतो. गुहागरला. चिपळूडहूद रत्दागिरी रस्त्यादे द जाता आत जायचे .

बी एम एम अधिवेशन २००९

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 25/06/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
२ जुलै २००९ उजाडायला असे कितीसे दिवस राहिले आता? बघता बघता “बी एम एम”चं अधिवेशन जवळ आलंच की ! खरंच वाटत नाहीये, म्हणजे अजूनही खरंच वाटत नाहीये. दोन तारखेला बिझनेस कॉन्फरन्स आणि आशाताईंच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. तीन तारखेपासून अधिवेशन सुरू ! आत्ता तर अधिवेशनाच्या पहिल्या मीटिंगसाठी तासभर गाडी दामटवत एका मंदिरात गेलो होतो. त्याला जवळपास एक वर्ष झालं? आत्ता तर कुठे भारतातून आणायचे कार्यक्रम निवडण्यासाठी ’इंडिया प्रोग्रॅमिंग कमिटी’मधे आलो. त्याला जवळपास एक वर्ष झालं? आत्ता तर कुठे भारतातल्या कार्यक्रमांबद्दल शोधाशोध आणि चर्चा सुरू केली. त्याला जवळपास एक वर्ष झालं?

रेल्वे पोलीसांची स्वागतार्ह मोहीम

लेखक विकास यांनी गुरुवार, 25/06/2009 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत लोकलने कायम प्रवास करणार्‍यांपैकी बहुतांशी लोकांनी कधी ना कधी कुठल्यान कुठल्यास्थानकावर एका फलाटावरून दुसर्‍या फलाटावर जाण्यासाठी जिन्याऐवजी रुळाचा उपयोग केला आहे असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. मात्र त्यात ज्यांच्या केसाला कधी असल्या निष्काळजी वागणुकीने फट्का बसला नाही ते आपण सगळे सुदैवी असलो तरी अनेकजण आणि त्यांच्यापोटी त्यांचे कुटूंबिय यांना आयुष्याची शिक्षा झाली आहे ही दुर्दैवी वस्तुस्थितीपण आहे. आत्ताच म.टा.