Skip to main content

झटपट जळगावी भरीत

लेखक Bhakti यांनी रविवार, 23/01/2022 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
पार जळगावहून वांगी आले होते.ही वांगी आकाराने ओव्हल मोठी ,फिक्कट हिरवी असतात.यात बिया कमीअ असतात.२०१६ साली जळगावी वांग्यांना GI tag ही मिळाला आहे. शेवटी हे एकच राहिले होते.तेव्हा जळगावी भरीतची पाकृ लिहिण्याची आणि चित्रित करायचे ठरवले.हा पदार्थ हल्लीच शिकल्यामुळे करून खायला घालायला उत्साह वाटतो आणि झटपटीत होतो. १ साहित्य : १.पावशेर जळगावी वांगे २.एक वाटी कांद्याची पात (चिरलेली) ३.एक वाटी कच्चे शेंगादाणे ४.अर्धी वाटी भाजलेले शेंगादाणे ५.एक वाटी चिरलेला ओला कांदा ६.५-६ हिरव्या मिरच्या ७.७-८

कोकण प्रवास: प्रकाशचित्रे

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 22/01/2022 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
२० ते २२ नोव्हेंबर
कोकण पाहायचे दूरच, पण साधं "येवा कोकण आपलाच असा" हेही ऐकलं किंवा वाचलं नव्हतं. डिसेंबरची पर्यटनगर्दी अजून दूर होती. त्यामुळे चार-पाच दिवस हाताशी ठेऊन, खूप नियोजन न करता निवांत फिरण्याचं नियोजन होतं. नेहमीप्रमाणे कोणी तयार होणार नाही हे माहीत असूनही सगळ्यांना सोबत यायचा आग्रह करून झाला होता. अशा मोहिमांसाठी आवश्यक मानसीक तयारी, नवीन हवामानात रुळण्याची प्रक्रिया (acclimatization) बेस कॅम्पवर, अर्थातच सासुरवाडीत, पूर्ण झाली होती. कदाचित मनात आलं तर कोकणातच स्थायिक होता येईल अशा विचाराने सौं ने सामानाची बांधाबांध केलेली दिसत होती.

अमानुषता आणि माणुसकी

लेखक मार्गी यांनी शनिवार, 22/01/2022 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्व जण कसे आहात? सर्व जण ठीक असाल अशी आशा करतो. नुकतंच स्नेहालय संस्थेच्या कामाबद्दलचं 'अंधाराशी दोन हात' हे पुस्तक वाचण्यात आलं. हे पुस्तक अक्षरश: आपल्याला हादरवून सोडतं. थरकाप उडतो हे पुस्तक वाचताना. भारतामध्येही नाझी किंवा तालिबानी मानसिकतेचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत हे कळून अनेक धक्के बसतात. ते पुस्तक वाचल्यानंतरची प्रतिक्रिया ह्या लेखामधून व्यक्त करत आहे. आपल्यापैकी बरेचसे जण खूप प्रोटेक्टेड जगात राहतो, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना नसते. किंबहुना अनेकदा जाणूनबुजून आपण ह्या गोष्टी नजरेआड करत असतो. परंतु हे पुस्तक वाचताना ख-या आणि बीभत्स जगाचं दर्शन घडतं.

"त्या" सिनेमातून आपोआप दिसणारा "तो" काळ

लेखक मन यांनी शनिवार, 22/01/2022 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
"हम आपके है कौन" म्हणजे "नदीया के पार" चा remake हे अनेकांना माहीतच असेल इथं. तो बघताना काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणवल्या. त्यांची इथं नोंद,यादी करतोय. हम आपके है कौन १९९४चा. त्याचे बडजात्या निर्माते (राजश्री प्रॉडक्शन). हा बॉक्स ऑफिसवर सुपर्डुपर हिट असला तरी मुळात ह्याच राजश्री प्रॉडक्शनच्याच १९७०च्या काळात आलेल्या सिनेमाचा रिमेक आहे. तो मूळ सिनेमाही भारतभर गाजला. विशेषत: उत्तर भारतात किंवा इतरत्रही ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा,जाणीवांशी जोडून घेणारं पब्लिक जिथं आहे, अशा ठिकाणी. टीनेजरी,नवतरुण दिसणारा "सचिन" त्यात आहे (म्हणजे सध्याचे टि व्ही वरचे "महागुरु").

ध्रांगध्रा - १६

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 22/01/2022 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी तोंड उघडून जोराने " आ....." म्हणतो. अरेच्चा!!!!!!!! आला की माझा आवाज. मला माझंच हसू येतं म्हणजे मी मनातल्या मनात हाका मारतोय तर ! ते कसं ऐकू जाणार. त्या हसण्यानं मला जरा बरं वाटतं.... माणूस कितीही रागात , तणावात असला तरी थोड्याशा हसण्याने किती फरक पडतो नाही!.....
मागील दुवा ध्रांगध्रा - १५ http://misalpav.com/node/49796 माझा आवाज ऐकून आई आत येते. पाठोपाठ बाबाही. "काय रे काय झाले?". आई उशी शेजारच्या नॅपकीनने माझ्या कपाळावरचा घाम टिपते. तरी बरं त्या हसण्यामुळे मी थोडा तरी रिलॅक्स झालो होतो.

New Edge Entrepreneurs !

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 21/01/2022 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
New Edge Entrepreneurs ! चार समवयस्क, समविचारी मित्र खूप दिवसांनी भेटले की काही टिपिकल गोष्टी घडतात. मित्र पिणारे किंवा न पिणारे दोन्ही असू शकतात. किंवा त्यातले दोघे पिणारे आणि बाकीचे नुसता चखना संपवणारे पण असू शकतात. सगळे नोकरीवाले असले की नोकरीत दहा-पंधरा वर्षे घासून झालेली असते. EMI आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना नाकी नऊ आलेले असतात.दुनियाभराचे टेक्निकल स्किल्स आणि करियर ऍस्पिरेशन्स बाजूला ठेवून आपण केवळ आणि केवळ सर्व्हायवलसाठी खर्डेघाशी करतोय ह्याची जाणिव सगळयांना झालेली असते. या पार्श्वभूमीवर अधूनमधून मित्रांची भेट ही फार अनिवार्य असते. मित्र भेटतात. शिव्यांची देवाणघेवाण होते.

गोष्ट 95 वर्षांच्या संसद भवनाची

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 21/01/2022 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनाच्या उद्घाटनाला आता 95 वर्षे पूर्ण झालेली आहेत. रायसीना टेकडीच्या परिसरात वसलेले संसद भवन शंभरीकडे वाटचाल करत असतानाच त्याच्या शेजारीच नव्या संसद भवनाची उभारणी केली जात आहे. त्या नव्या इमारतीचे बांधकाम ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतीय लोकशाहीचा कारभार नव्या संसद भवनातून सुरू होईल. तरीही आधीच्या संसद भवनाने भारताच्या संसदीय वाटचालीला, स्वातंत्र्यलढ्याला अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या त्याचे महत्व कायम राहणार आहे.