त्रैराशिक ....
आठवत नाही ध्येया मी कधीचे तुझ्या मागे धावतो आहे
तू पुढे कि मी माहित नाही पण सवय म्हणून जगतो आहे
न तुला थकायची सवय राहिली न मला थकायची सवड
एकमेकांभोवती फिरता फिरता होते दोघांचीही परवड
जगण्याची हि युद्ध नीती मी शिकलो आईच्या पोटात
उमगले नाही मलाच कधी शिरलो ऐहिकाच्या गोटात
मिळाले भरभरून सगळे तरीही मी अजून मागतो आहे ...
मन मारून केलेल्या सौद्यांना अन वचनांना जागतो आहे
आज उमगले खरं तर,
जगण्याच्या त्रेराशिकात मी सुखाला उपभोगाने भागतो आहे
मिसळपाव
१९९२ सालच्या "रिओ वसुंधरा शिखर परीषदेच्या" (Earth Summit) निमित्ताने २१ व्या शतकातील पर्यावरणीय समस्यांबद्दल बराच उहापोह झाला. त्यातील पर्यावरणीय बदलासंदर्भात प्रथमच घेतलेल्या काही निर्णयांमुळे ही परीषद जास्त लक्षात राहीली. याच परीषदेत "जागतीक जल दिन" चालू करण्यासंदर्भात सुचवण्यात आले आणि १९९३ पासून, दरवर्षी २२ मार्च हा "जागतिक जल दिन" म्हणत साजरा केला जाऊ लागला.