Skip to main content

एका भारतीय पुरुषाची डायरी

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 20/08/2011 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांकः २० ऑगस्ट ४०११ कंटाळा आलाय! का काय विचारता? ऑफीसमधल्या राजकारणाने कंटाळा आला होता. माझी बॉस म्हणाली शनिवारी यावं लागेल. अस्सं डोकं फिरलं आणि लवकर निघालो. तसं डोकंही दुखत होतं. म्हटलं बाबांकडे चार घटका जावं, बाबांच्या हातच्या चहाने डोकंदुखीच काय पण जगातले सारे रोग दुर होऊ शकतात. पुन्हा एकदा आपल्या घरी गेलं की रोजचं जेवण करणं, पोरांचा अभ्यास, सासर्‍यांची काहि कामं वगैरे रोजची कामं आहेतच. तर बाबांकडे गेलो होतो. नेमकं मला राजनने बघितलं. आता हा सासर्‍यांना नक्की सांगणार. याला काय नोकर्‍या करायच्या नाहीत. बायको मोठ्या हुद्द्यावर आहे. घरी सिरीयल बघितल्या, मुलांना झोपवलं की झालं.

जन लोकपाल विधेयकाला काँग्रेसचा विरोध व राहुल गांधी चे भवितव्य.

लेखक तर्री यांनी शनिवार, 20/08/2011 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
जनलोकपाल विधेयका मध्ये "प्रधानमंत्री " समाविष्ट करण्यास अटल विहारींनी (स्व) संमती दाखवून , लोकसभे मध्ये हे विधेयक मांडले होते. राज्यसभे मध्ये एन.दि.ए. ला बहुमत नसल्याने ते संमत होवू शकले नाही. काँग्रेस ह्याला कदापी मान्यता देणे शक्य नाही . ऊध्या राहूल प्रधानमंत्री झाल्यावर , लोकपाल ने त्यांच्या व त्यांच्या पूर्वजांच्या (तथाकथीत) भ्रष्टाचारावर ताशेरे ओढले व पद सोड्ण्याची नामुष्की आली तर ? ह्या भय गंडातून तर हा विरोध नाही ना ? काय वाटते आपणास ?

सोन्याचे भाव

लेखक संजीव नाईक यांनी शनिवार, 20/08/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मा. मि.पा. हा खरोखरच विचार करण्या सारखी गोष्ट आहे ती म्हणजे कॉमोडीटी मार्केट मुळ मध्यम वर्गातील लोंक थोड्या पैशात एक किली सोने कागदावर खरेदि कारण्याचा विचार करत आहे. पण खरच सोने २४ ते २५ हजार रुपये तोळे होऊशकते काय? ह्याचा गंभीर पणे विचार करण्यास हवा? तु घेतले म्हणुन मी सुद्धा घेतले म्हाणून आज सोन्याला हा उंचाक मिळाला आहे. पण परिस्थिती नुसार कॉमोडीटी मार्केट मधुन खरे गुंतवणुकदार केव्हाच निघुन गेले आहेत फक्त उरला आहे तो मध्यम वर्ग.

अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 20/08/2011 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २                               भ्रष्टाचाराचा मुद्दा आता व्यापक प्रमाणावर ऐरणीवर आला असला तरी माणसाची भ्रष्टाचारी वृत्ती आता इतक्यातच किंवा गेल्या काही वर्षातच जन्माला आलेली नाही. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार अस्तित्वातच नव्हता असेही समजण्याचे कारण नाही.

अहो आण्णा ...

लेखक विश्वेश यांनी शनिवार, 20/08/2011 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
आण्णा, उपास करून करून एक होईल तुमची मान पाठ पिझ्झा खात उपोषण लाइव्ह बघाणार्यांशी तुमची गाठ ... फेसबुक वर लाईक करून तुम्हाला पाठींबा देणारी हि जमात निवडणुकीच्या लॉंग वीकएंडला पळते सहकुटुंब रानावनात ...

तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन- "मेड इन सिंगापूर"

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 20/08/2011 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १३ आणि १४ औगस्ट २०११ रोजी सिंगापुरात तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. त्या संमेलनात सादर केलेली ही माझी कथा. मोलकरीण- ही एक मोठ्ठी समस्या आहे असे जगातल्या सगळ्याच गृहिणींचे मत असते. समस्येचे नाव जरी तेच असले तरी, प्रत्येक ठिकाणची डोकेदुखी मात्र वेगवेगळी असते. सिंगापूरला मोलकरीणीला ’मेड’ म्हणतात. भारतातल्या सारख्या ह्या मेड्स दोन चार तासापुरत्या येऊन आपापली कामे करून जात नाहीत. तुमची मेड ही कुटुंबातलाच एक मेंबर होऊन तुमच्या घरात रहाते. ही गुणी-अवगुणी मेड मिळविणे जेवढे कठीण, तेवढेच झेपणे आणि संभाळणे देखील. जाऊ द्या झाले!

रानफुल

लेखक आनंदयात्री यांनी शनिवार, 20/08/2011 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
रानफुलाच्या पिवळसर पिंगट पाकळीला मी भुललो, तोच क्षण त्याचं अन माझं आयुष्य जोडणारा. मंतरलेल्या रानात रानफुल आणी मी, बघत होतो, प्रतिबिंबं, आमच्याच डोळ्यात तरारलेली. "तू आणि मी, आपण दोघं सारखेच !" उमलतो पण गंधाला पारखे. रानफुल सुखावलं .. रानफुल सुखावलं तेव्हा दिसली होती, माझ्याच प्रतिबिंबाची हलकी काळसर बेगडी किनार. रानफुलं रानातच उमलतात .. फुलतात .. असे म्हणत एकेदिवशी, मी परतलो .. जनरितीनुसार. जातांना फुल म्हणाले होते, सुकले तरी चालेल, पण ठेवशील ना मला डायरीत ? .. जनरितीनुसार ? - आनंदयात्री