Skip to main content

सात-आठ महिन्यांपासून स्टॉक मार्केटमध्ये महिना ८० हजार कमावलेत

लेखक कांदा लिंबू यांनी मंगळवार, 02/07/2024 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा: १. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. २. सदर धागा लेखक गुंतवणूक तज्ज्ञ वा बाजार सल्लागार नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास सदर धागालेखक वा हे संस्थळ जबाबदार असणार नाहीत. --- नमस्कार मिपाकर्स मित्र मैत्रिणींनो. खरडफळ्यावर झालेल्या संक्षिप्त चर्चेतून हा धागा काढत आहे. लिखाण विस्कळीत वाटू शकेल याची कल्पना आहे पण भावार्थ समजून घ्यावा ही अपेक्षा आहे. आपण नवीन वर्षाचे अनेक संकल्प करतो. त्यातले अगदी थोडे पूर्ण होतात तर बरेचसे काही अपूर्ण राहतात.

स्वप्नपूर्ती..!!

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 01/07/2024 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागते, कित्येक वेळा तुम्ही ती मिळवण्याच्या अगदी समीप जाता पण ती प्राप्त करनं तुम्हाला शक्य होत नाही. अशी गोष्ट जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो, माऊंट एव्हरेस्ट सर केल्याच्या feeling पेक्षा तो कमी नसतो. सेम feeling व आनंद शनिवारी भारतीय खेळाडू, क्रिकेटरसिक व संपूर्ण भारतवर्षाने अनुभवला..!! ११ वर्षांनंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली..!

Boys Played well..!

लेखक kool.amol यांनी सोमवार, 01/07/2024 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
हुश्श्श..शेवटी एकदाचा भारताने विश्वकप जिंकला! सामना कसा थरारक होता, कोण कसं खेळलं, कोणामुळे जिंकलो ही सगळी चर्चा बऱ्यापैकी करून झालीय, चालू सुद्धा आहे. थोड्या वेळासाठी असं वाटून सुद्धा गेलं की..झालं, खाल्ली माती ह्या संघाने परत एकदा. पण नंतर अगदी उलट झालं. क्रिकेट हा प्रचंड शक्यता असणारा खेळ आहे आणि अगदी क्षणाक्षणाला बदलत जाणारा खेळाचा balance ह्यात प्रचंड थरार निर्माण करतो. 20-20 फॉरमॅट मध्ये तर अजूनच जास्त! ग्रामपंचायत निवडणुका जास्त चुरशीच्या असतात म्हणे त्यासारखच काहीस म्हणता येईल. मला काही गोष्टी विशेषत्वाने जाणवल्या.

भेटीलागी जिवा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 30/06/2024 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
भेटीलागी जिवा दरवर्षीप्रमाणे पालख्यांचं पुण्यात आगमन होतं. त्याच्या काळजात कळ आणणारा दिवस . दरवर्षी आषाढवारीसाठी पालख्या पंढरपूरला जातात . तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून तर ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीमधून प्रस्थान ठेवते . मात्र पुण्यात त्या एकत्र येतात . एक दिवस थांबतात आणि पुढे मार्गस्थ होतात . वेगळ्या मार्गाने ! ... शहरात सगळीकडे उत्सवी वातावरण असतं . मांडव , पाण्याची - जेवण्याची व्यवस्था . एक ना दोन अनेक गोष्टी . धांगडधिंग्याची गाणी वजा असतात . मंडळाच्या कार्यकर्त्यांना कधी नाही ते भजनांची ओढ लागलेली असते . भेटीलागी जिवा लागलीसे आस ...

चहा!

लेखक श्रीगणेशा यांनी रविवार, 30/06/2024 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
चहा, जिव्हाळ्याचा विषय. चहा तयार करणं बऱ्याच अंशी एक कला आहे. थोडंसं गणित व शास्त्रही आहे म्हणा त्यात. चवीत सातत्य राखायचे असेल, तर त्यातील प्रत्येक घटकाची भूमिका, प्रमाण, आणि वेळ समजावून घेणं गरजेचं. एखादी सुंदर संगीत रचना जर करायची असेल, तर आधी तुम्हाला संगीत वाद्यांशी, प्रत्येक सुराशी समरस व्हावं लागतं, अगदी तसंच. चहापूड (पूड=पावडर) मधील अर्क शोषण्याचं काम पाण्याचं. चहापूड टाकण्याआधीच पाणी उकळतं असणं गरजेचं. आणि चहापूड उकळत्या पाण्यात टाकल्यावर, फक्त काही मिनिटेच थांबावं, नाहीतर कडवटपणा उतरण्याची शक्यता असते.

कृष्णाच्या गोष्टी-५

लेखक Bhakti यांनी शनिवार, 29/06/2024 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण बलरामांचे वृंदावनातील अनेक पराक्रम मथुराधीश कंसाच्या कानी गेले. प्रलंबवधानंतर कंस थोडा घाबरलेला होता. त्यातच मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत आणि यादवांच्या कुलगुरूंच्या म्हणजेच गर्ग ऋषींच्या भविष्याप्रमाणे वसुदेवाचा कृष्ण हा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. कंस वसुदेवावर भयंकर चिडला याबाबतीत काय करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी यादव,वृष्णी आणि भोज या कुलातील मांडलिक गणप्रमुखांची एक गुप्त सभा एका मध्यरात्री त्याने बोलवली.

ट-२० विश्वचषक अंतिम सामना

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 28/06/2024 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
कालच इग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ६८ धावांनी जिंकून भा

वाईचा कमळगड

लेखक चक्कर_बंडा यांनी गुरुवार, 27/06/2024 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते गर्द धुक्यातून डोकावणाऱ्या डोंगर-किल्ल्यांवर पावलांचे ठसे उमटवण्याचे. पण आठवडी सुट्टीच्या दिवशी जायचं तर एक तर प्रचंड गर्दी सहन करायची तयारी ठेवावी लागते व असं अनवट ठिकाण शोधावं लागतं जिथे केवळ पावसाळ्यात तयार होणारे निसर्गप्रेमी बेडूक सहसा येणे टाळतात. याचं उद्दिष्टातून, यावर्षीच्या वर्षाऋतू भ्रमंतीची सुरवात करण्यासाठी सापडलेला एक सुंदर किल्ला म्हणजे ”कमळगड”.

कृष्णाच्या गोष्टी-४

लेखक Bhakti यांनी बुधवार, 26/06/2024 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
*रासलीला अ कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.

पुस्तक परिचय: ययाति

लेखक श्रीगणेशा यांनी बुधवार, 26/06/2024 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
---- ययाति ---- वि. स. खांडेकर -- ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, मराठीतील पहिले साहित्यिक. ययाति -- वि. स. खांडेकरांनी १९५९ मधे लिहिलेली, पौराणिक संदर्भ आणि सामाजिक आशय असलेली कथा. या कादंबरीसाठी १९७४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ---- अगदी ओघवतं, प्रवाही लिखाण. साधे शब्द, पण तरीही कथेतून सामाजिक आशय अगदी प्रखरपणे मांडलेला. कथेच्या शेवटी मन विषण्ण, व्यथित होतं. कथा संपते, पण वाचकाला स्वतःशी संवाद करायला भाग पाडूनच. एवढं प्रभावी लिखाण दुर्मिळच. प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी भिन्न स्वभाव, आणि विचारांनी साकारलेली.