Skip to main content

माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

लेखक सचिन काळे यांनी शनिवार, 12/05/2018 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मायबोली संकेतस्थळावर आमचा एक गप्पांचा कट्टा आहे. तिथे एकदा सहज गप्पा मारता मारता तेथील अक्षय नावाच्या एका मित्राने सगळ्यांना 'माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं?' ह्या विषयावर एक निबंध लिहिण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून मी तेथे खालील निबंध लिहिला. आपल्या सर्वांच्या वाचनाकरिता तोच निबंध मी खाली देत आहे. विषय :- माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं. माझं लिहिणं कसं सुरू झालं, हे लिहिण्याअगोदर मला वाटतं की माझ्या वाचन कसं सुरू झालं, ह्यावर मी दोन शब्द लिहावं. कारण माझ्या लिखाणाचा प्रवास हा माझ्या वाचनानेच सुरू झालेला आहे.

ऊपदेश

लेखक शाली यांनी शनिवार, 12/05/2018 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त सासरे मंडळींसाठी- पोटी आल्या कन्येचा l योगे पिता ही ग्रहदशा भोगे l जामाताशी उपसर्गही न पोचे l तो तर दशमग्रह ll घेणं नास्ति, देणं नास्ति l त्या नाम जामात असती l अहोरात्र एकच ही पुस्ती l गिरवीत जावी ll समय प्रसंग ओळखावा l राग निपटून सांडावा l आला तरी कळो न द्यावा l जामाताशी ll गर्दभापुढे टांगावी गाजरे l मग तो चालो लागे साजरे l काम करून घ्यावे l गोजरे संयमाने ll वानराशी म्हणावे तुझीच लाल l आपली कळो न द्यावी चाल l मग खुशाल लादावी पखाल। हल्याच्या पाठी ll दिसामाजी शालजोडीतील हाणावी l मासामाजी ‘दे धरणी ठाय’ ताणावी l नयनी गोनेत्रातील करुणा आणावी l हेत साधताना ll जे पेटल्यावीन जाळीतसे l जे

मुसक्याबंद

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 12/05/2018 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
धक्क्याच्या कोप-यात (धक्का हे जुनं नाव, हल्ली त्याला जेट्टि म्हणतात.)आता जिथं कुरकुरे, भेळ , शोभेच्या वस्तुंचे स्टाॅल्स आहेत तिथं पूर्वी एक भिकारी रहायचा. भिका-याला थोडंच नाव असतं. आणि असलं तरी कोण त्याला ते आपुलकीनं विचारणार? पण त्याला सगळे " मुसक्याबंद" म्हणायचे. केस आणि दाढीच्या जटा वाढलेल्या, खोल गेलेले डोळे. अंगावर मळकट्ट कपडे. कपडे म्हणजे कधीकाळी तो शर्ट असावा, असं वाटणारा कपडा आणि खाली फाटकी पॅन्ट. ती सुद्धा दुस-या एका फडक्याने बांधून कमरेवर टिकवलेली. पावसात भिजला तरच आंघोळ. त्यामुळे त्याच्या अंगाला दुर्गंधी यायची.

चावट रश्श्यांची दुनिया !

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 11/05/2018 15:06 या दिवशी प्रकाशित केले.

काल खफवर रश्श्याची चर्चा वाचली.  लिहिणाऱ्याने रशियाची आठवण काढली होती आणि मालकांसहित सर्वांना तरतऱ्हेचे रस्से आठवू  लागले. त्यांची नावे वाचूनच जीवाचे (आणि जिव्हेचे) पाणी पाणी झाले. मग रश्श्यांच्या दुनियेत मनानेच फेरी मारली.

रस्सा हा तसा चावट किंवा खरं म्हटलं तर चाबरट खाद्य-प्रकार ! तामसी खाणे या क्याटेगरीत येणारा. मराठी माणसाला रस्सा भुरकण्याचा प्राचीन काळापासून नाद !

अनवट किल्ले ३२ : डेरमाळ ( Dermal )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 11/05/2018 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला म्हणजे कसमादे ( कळवण-सटाणा-मालेगाव-देवळा ) परिसरात काही अफलातून किल्ले आहेत. मात्र शिअवछत्रपतींच्या साम्राज्याचा इकडे विशेष विस्तार न झाल्याने, तसेच मुख्य मार्गापासून काहीसे आडबाजुला असल्याने हे गडकोट फारचे कोणाला माहिती नाहीत. अगदी क्वचितच दुर्गप्रेमी इथे भेट देतात. यापैकी एक म्हणजे, "डेरमाळ". नुकतीच आपण गाळणा किल्ल्याची ओळख करुन घेतली. या परिसरातील गाळणा हा महत्वाचा किल्ला असल्याने या सर्व डोंगराना गाळणा टेकड्या म्हणतात. मालेगावच्या इशान्येला, नामपुर-ताहराबाद रस्त्याजवळ या गाळणा टेकड्यात एक दुर्गरत्न विसावलेले आहे, "डेरमाळ".

आयुष्य म्हणजे काय रे भाऊ?...

लेखक अबोलघेवडा यांनी शुक्रवार, 11/05/2018 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदरीत काहीतरी philosophical लिहायचा मूड झाला आज. सोसायटीची मीटिंग झाली. त्याच त्याच चर्चा, तेच तेच विषय.. आयुष्यात नाईलाजास्तव करावी लागणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आपण राहतो त्या सोसायटी च्या कमिटी मध्ये काम करणं. परमेश्वर सगळी सुखं हात जोडून समोर उभी येऊ देत नाही. म्हणून जेव्हा आनंदाने मनस्वी जगायचं ठरवलं तेव्हा परमेश्वर म्हणाला थांब. अजून हिशेब चुकते करायचेत तुझ्या पापांचे. आणि मग मी सोसायटी चा सचिव झालो. दर दिवशी आपण जगत असतो. वास्तविक जगणं हे सहज सुलभ असलं पाहिजे. पण आपण जगण्यासाठी किती आटापिटा करत असतो! आपल्या देशात हा आटापिटा जरा जास्तंच असतो अमेरिका, इंग्लंड देशांच्या मानाने.

फुलांचा फोटो

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/05/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.

छत्रपती संभाजी महाराजांचे एक तथाकथित चित्र

लेखक मनो यांनी गुरुवार, 10/05/2018 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीराजांविषयी एक फेसबुक पोस्ट पाहण्यात आली. तिच्याबरोबर एक चित्रही होते. अर्थातच मी मोठ्या उत्सुकतेने लगेच उघडली. चित्र तर मी आजपर्यंत पाहिलेले नव्हते. छत्रपती संभाजीराजांची अगदी एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी चित्रे आजवर उजेडात आली असल्याने छत्रपती संभाजीराजांचे नवीन चित्र म्हणजे फार मोठा शोध होता. त्याला तितक्याच बारकाईने तपासून पाहायला हवे होते. पण दुर्दैवाने ते चित्र कुठले ते त्या पोस्टमध्ये काही लिहिलेले नव्हते. इंटरनेटवर बरेच शोधूनही मला काही ते चित्र मूळ कुठले ते सापडले नाही.

कोकण सफ़र भाग २ - दिवेआगर, आंजर्ले, हर्णे, पाळंदे

लेखक सतिश पाटील यांनी गुरुवार, 10/05/2018 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस दूसरा- सकाळी ७ ला उठून भरपेट नाश्ता करुन १० वाजता निघालो, आजचा प्रवास ८० किमी बागमांडलाची जलफेरी धरून.

स्वानंदासाठी

लेखक शाली यांनी गुरुवार, 10/05/2018 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
नारदमुनींना आज काही करमत नव्हते. बरेच दिवस झाले होते ‘ईकडची बातमी तिकडे’ करुन. देवलोकात, मृत्यूलोकात चक्क शांतता नांदत होती. शांतता असली की मुनीजी अशांत होत. “काय करावे?” या विचारात सगळे ‘लोक’ पायाखाली घालून झाले पण काही सुचेना. तसं म्हटलं तर ‘लावालावी’ करायला कितीसा वेळ लागतो? पण नारदांची तत्वे आड येत होती. पहिले म्हणजे कळ लावायची पण फक्त सत्याचा आधार घेऊन. ज्याला भडकायचे आहे त्याने स्वतःच बातमीचा गैरअर्थ काढून भडकावे. आणि दुसरे म्हणजे कळ लावल्याने मनोरंजन होत असले तरी फक्त मनोरंजन म्हणून कळ लावायची नाही. त्यातून काही तरी भले व्हावे, कुणाला तरी शिकायला मिळावे, धडा मिळावा.