Skip to main content

खुलं मैदान

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 30/07/2019 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर तिथं फारसं काही दिसत नव्हतं. मोकळं मैदान होतं मात्र. गावाच्या बरंच बाहेर. माळरान नुसतं. बारीक बारीक खड्यांची अथांग जमीन. भुरभुर वाहणारा गारठा वारा. आणि बऱ्याच दूरवर चमचमणारे वीजेचे दिवे. "साडेनऊ वाजल्या बे.." रमाकांत म्हणाला. रमाकांत म्हणजे भेकडी बाई. कशालाही काय घाबरायचं. साडेनऊ म्हणजे काय जगबुडी झाली? "बघ, चंद्रप्रकाश कसला भारीये.." मी बाटलीचं झाकण काढत म्हणालो. "गलास नाहीत की राव आपल्याकडं.." दोनचार चणे तोंडात टाकत तो पुटपुटला. "गलास कशाला पाहिजे? बाटलीनंच प्यायची, दोन आणल्यात." "चिअर्स" बाटल्या धडकवत आम्ही आरंभ केला. कधीतरीच प्यावी पण मोकळ्या मैदानात प्यावी अशी जाम ईच्छा होती.

युगांतर - आरंभ अंताचा भाग १५

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 30/07/2019 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
राजमाता..... अशक्य आहे हे!" "तु ही जाणतोस हे किती गरजेचे आहे." भीष्माचार्य काहीच बोलेनात. "तुझ्या प्रतिज्ञेनुसार तू हस्तिनापूर राजगादीच रक्षण करणार आहेस. हो ना?" "होय राजमाता. शब्द आहे माझा." "पण कसे भीष्म? हस्तिनापुरची राजगादी अशी रिक्त ठेवून?"' "राजमाता...." "राजवंश संपला तर राज्य विखरून जाईल. चालून येणाऱ्या शत्रूला कळले, की राजगादीला कोणी वारस नाही, ती रिकामी आहे, तर शत्रूपुढे हे हस्तिनापुर किती काळ टिकेल? सैन्य एका राजाची आज्ञा ऐकते भीष्मा. प्रजा देखील. राजघराण्याची आज्ञा नाही. ऱाजा नसेल तर कसली राजगादी आणि कसली त्या राजगादीला सांभाळण्याची प्रतिज्ञा?

पावसाच्या धारा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 30/07/2019 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या धारा -------------------------------------------------------------------------------- पावसाच्या धारा भन्नाट वारा टपटप टपटप पागोळ्या दारा पोरं घरामध्ये बसली अडकून वीज कडाडे ढगोबा धडकून लख्ख प्रकाश आकाश तडकून पावसाचा तोरा धिंगाणा सारा पावसाच्या धारा पाणी साठले त्यात खेळू या धबक धबक ते उडवू या पाण्यात होड्या चला सोडू या पाण्यात भोवरा फिरे गरागरा पावसाच्या धारा तुडुंब पाणी वाहते खळाळून चालावे कसे ? किती सांभाळुन ? कागदाच्या होड्या जाती गोंधळून पावसाचा जोरा तडमतडम नारा पावसाच्या धारा किती पडतो कसा पडतो कधी झरतो कधी दडतो कधी हळूच कधी वाढतो पावसाचा होरा कळे ना पोरा पावसाच्या धारा ------
काव्यरस

विळखा -४

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 29/07/2019 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
विळखा -४ डॉ पै यांच्या बाह्य रुग्ण विभागात येऊन सकाळी आठ वाजताच दाखल झालो.माझा एक वर्ग मित्र टाटा मध्ये विभागप्रमुख आहे त्याला फोनकरून सांगून ठेवले होते कि डॉ. पै यांच्याशी बोलून ठेव. नऊ वाजेपर्यंत तेथे १०० एक रुग्णांची गर्दी झाली. यथावकाश त्यांचे सहाय्यक तेथे आले आणि रुग्ण पाहायला सुरुवात केली. आमचा नंबर लवकर आल्यामुळे बराच लवकर लागला.

आणि भारत एका चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीराला मुकला.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 29/07/2019 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : हा लेख तद्दन फालतू आहे. आम्ही आमच्या बायकोवर, इथे हवे तितके लिहू शकतो. त्यामुळे स्त्रीमुक्ती वाल्यांनी खालील लेख नाही वाचला तरी चालेल तर अशाच एका शनिवारची गोष्ट आहे. आम्ही आमच्या बाबा महाराजांचे साप्ताहिक दर्शनासाठी गेलो होतो. अर्थात तीर्थ प्राशन करून मग घरी गेलो. तसे नौकानयन न करता, पंख लावूनच घरी गेलो आणि बघतो तर काय. ..घरी बरीच मंडळी जमलेली. आई-वडील तर होतेच, पण शिवाय बायकोची भावंडे पण होतीच. चपला काढून, जेमतेम बसतोय न बसतोय, तोच बायकोचा हुंदका कानावर आला. आता हिला काय झालं, म्हणून नजर वरती केली, तर मातोश्रींनी हातात एक कागद ठेवला. कसाबसा कागद वाचला.

समाधीवरचा गाव (एक भयकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 29/07/2019 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
'सावरगाव' जेमतेम हजार-दीडहजार लोकसंख्या असलेल छोटस गाव. तस पाहायला गेल तर, सभोवताली असलेल जंगल आणि त्यात असणाऱ्या प्राण्याशिवाय गावाला दुसरी काही ओळख नाही. उतरत्या छपराची घरे, समोर अंगण आणि त्याभोवती ताराचे कुंपण अशी साधारण घरांची रचना. जंगलातील प्राणी घरात घुसू नये म्हणून तारेचे कुंपण हमखास घराभोवती पहायला मिळत होते. जंगलातील प्राणी कधी घरात घुसून पाळीव प्राण्याचा, लहान मुलांच्या गळ्याचा घोट घेईल याची याची शाश्वती नसायची. गाव मधोमध जंगलात असल्यासारखे होता. तिन्ही बाजूला जंगल आणि उरलेल्या एका बाजूला नदी. त्यामुळे गाव जंगलात असल्यासारखेच भासायचे. शेती हा गावातील एकमेव व्यवसाय.

युगांतर आरंभ अंताचा भाग १४

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 29/07/2019 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
ऱथ महाली पोचला. भीष्म व्यथित मनाने आपल्या कक्षात जाऊन बसले. 'गुरुंनी केलेले शाब्दिक आघात, त्यांचा अपूर्ण राहिलेला न्याय, आपल्यामुळे दुखावलेली, उधवस्त झालेली अंबा..... ! हस्तिनापूरा, वचनबद्ध नसतो, तर गुरुंवर हत्यार चालवण्याचे महापाप करण्याआधीच इच्छामृत्यू घेतला असता मी!' विचित्रवीर्य तोल सांभाळत भीष्मांच्या कक्षाबाहेर आला, "भ्राता भीष्म...." त्याच्या हाकेने विचारांतून बाहेर पडत भीष्मांनी मागे वळून बघितले. उठून त्याला धरत आसनावर बसायला भीष्मांनी मदत केली,"युवराज, आपण का आलात? मला बोलावले असते....

युगांतर - आरंभ अंताचा भाग १३

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 28/07/2019 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
"भीष्म, सर्व कुशल आहे ना?" "होय राजमाता. काहीवेळा पूर्वीच नगरीत जाऊन येणे झाले. हस्तिनापुरी सर्व स्वस्थ आहे." "नाही भीष्म, मी नगरीबद्दल बोलत नाही." "मग राजमाता?" "विचित्रवीर्य च्या विवाहानंतर मी पाहातेय... तू अस्वस्थ दिसतो आहेस. सर्व ठिक आहे ना?" भीष्म काहीच बोलले नाहीत. सत्यवतीने तलम गुंडाळलेले संदेशवस्त्र त्यांच्या हाती दिले. भीष्मांनी उलगडून ते वाचले. 'अद्य शीघ्रंम् आगच्छतू!' "परशुरामांनी पाठवलेला संदेश दास घेऊन आला होता तू महालात नव्हतास तेव्हा." "आज्ञा असावी राजमाता. माझ्या गुरूंनी मला बोलावलेले आहे." सत्यवतीने मान होकारार्थी हलवली. भीष्माचार्यांचा रथ गुरुनिवासाजवळ थांबला.

४_किलबील किलबील पक्षी बोलती.

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 28/07/2019 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
रंगीत, उठुन दिसणारं ठळ्ळक, शिट्टी सारखं हव?...….. लाल..... हिरवा... पिवळा... नीळा....नील. हां नील. चमकदार , रंगीत उठून दिसणारे ठळ्ळक आहे. लांबून आईने " ए नी.........ल" अशी हाक मारली तर कोणीतरी शिट्टी वाजवतंय असं च वाटेल. " " व्वा काका छान नाव दिलंत मला. मस्त रंगीत नाव " " आणि माझं नाव काय हो काका" मला पण छानसं नाव द्या . पण नुसत्या एखाद्या च रंगांचं नको. सगळे रंग यायला हवेत त्यात" मागील दुवा
मागील दुवा http://misalpav.com/node/44930 रेघवाल्या मुलीचा नावासाठी हट्ट चालूच होता. हीच्यासाठी काहितरी नाव शोधायलाच हवं.